सनातन विचारधारेच्या आधारे राष्ट्राचे पुनरुत्थान हेच संघाचे कार्य : पराग कंगले

कोकण प्रांतच्या "संघ शिक्षा वर्ग" प्रकट समारोप

    24-May-2025
Total Views | 43
नातन विचारधारेच्या आधारे राष्ट्राचे पुनरुत्थान हेच संघाचे कार्य : पराग कंगले
मुंबई : "सनातन विचारधारेच्या आधारे राष्ट्राचे पुनरुत्थान हेच संघाचे कार्य आहे. हिंदू समाज हाच राष्ट्रीय समाज आहे. तो टिकला तर राष्ट्र टिकेल.", असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिति महाराष्ट्र राज्य संघटन मंत्री पराग कंगले यांनी केले.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ कोकण प्रांतच्या 'संघ शिक्षा वर्ग'चा प्रकट समारोप शनिवार, दि. २४ मे रोजी संध्याकाळी ६.१५ वाजता आयईएस राजा शिवाजी विद्यालय, हिंदू कॉलनी, दादर (पू) येथे संपन्न झाला. यावेळी वर्गात झालेल्या प्रशिक्षणाचे प्रात्यक्षिक (दंड युद्ध, नियुद्ध, खेळ, घोष वादन, समता) शिक्षार्थीनी सादर केले. दरम्यान प्रमुख अतिथी म्हणून भारतीय गीतकार आणि कवी मनोज शुक्ला (मुंतशिर) उपस्थित होते.
उपस्थितांना संबोधत पराग कंगले पुढे म्हणाले, संघाला विरोध करणाऱ्यांचा संघाने कधी द्वेष केला नाही. उलट त्यांच्याशी मैत्रीचे संबंध वाढवले. त्यांना संघ समजावून सांगितला आणि ते ही संघ समर्थक बनले. संघ व्यक्तिनिर्माण करतो म्हणजे काय तर, ज्या व्यक्ती मध्ये हिंदू अस्मितेची समज आणि गर्व जागृत आहे, त्याचे वैयक्तिक राष्ट्रीय चारित्र्य उज्ज्वल आहे, त्याचा स्वभाव प्रखर देशभक्तीचा आहे. अशी व्यक्ती घडवण्याचे काम संघ करतो."
सेवा, सामाजिक सद्भाव, सामाजिक समरसता हे तीन आयाम समोर ठेऊन स्वयंसेवकांना समाजात जाऊन कार्य करायचे आहे. याच मार्गाने चालत समाजातील एकरस शक्ती मजबूत करायची आहे, असे मत पराग कंगले यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक वर्ग कार्यवाह दिपक शाह यांनी केले. दि. ९ मे पासून सुरू झालेल्या या वर्गात १८ ते ४२ वयोगटातील एकुण ४२ शिक्षार्थी उपस्थित होते.
हिंदू कधीच हिंसक होऊ शकत नाही
देशसेवेची भावना संघामध्ये मूर्त रूपात दिसून येते. 'तेरी मिट्टी' हे गीत मी संघात राहून संघ जगलो त्यामुळे लिहिणे संभव झाले. हिंदुत्वातले गांभीर्य ज्यांनी मुळापासून ओळखले नाही, ते लोक हिंदुत्वाला सेक्युलरिझमशी जोडण्याचा प्रयत्न करतात. त्यांना योग्य रस्ता दाखवण्याची वेळ आली आहे. हिंदू कधीच हिंसक होऊ शकत नाही. हिंदू आणि भारतीय वेगळे नसून त्यांचे मूळ सिद्धांत समान आहेत.
- मनोज शुक्ला (मुंतशिर), भारतीय गीतकार आणि कवी

अग्रलेख
जरुर वाचा
पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

पुणे, चंद्रपूर, नंदुरबार, धाराशीव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार

शिवसेनेचे मुख्य नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाने प्रभावित होत आज महाराष्ट्रातील पुणे, चंद्रपूर, नंदुरबार आणि धाराशीव जिल्ह्यातील उबाठा पक्षाच्या माजी नी आज शिवसेनेत प्रवेश केला. यामुळे या चार जिल्ह्यांत उबाठा गटाला खिंडार पडले आहे. तसेच मध्य प्रदेशातील जबलपूर, विदीशा या जिल्ह्यांमधील उबाठा पदाधिकाऱ्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत धनुष्यबाण हाती घेतला. मुंबईत आयोजित पक्ष प्रवेश सोहळ्याला मंत्री उदय सामंत, विधान परिषद उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे, माजी आमदार ज्ञानराज चौगुले..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121