आसाममध्ये १ लाख अवैध घुसखोरांची ओळख पटली

३० हजारांहून अधिक निर्वासित राज्यातून हद्दपार

    20-Feb-2025
Total Views | 29

1 lakh illegal immigrants identified in Assam
 
दिसपुर : आसाममध्ये (Assam) १ लाख ६६ हजार अवैध घुसखोरांची ओळख पटली आहे. यामध्ये ३० हजार १०० हून अधिक राज्यातील निर्वासितांना राज्यातून हद्दपार करण्यात आले आहे. आसाम कराराच्या अंमलबजावणीबाबत काँग्रेसचे आमदार अब्दुल रहीम अहमदने या संबंधित प्रश्न केला होता. त्यापार्श्वभूमीवर आता मंत्री अतुल बोराने या प्रकरणाची माहिती मिळवली. ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत असामच्या अवैधपणे १ लाख ६५ हजार ५३१ घुसखोरांबाबत माहिती समोर आली.
 
आसाम राज्य सरकारकडून बोराने सांगितले की, यामध्ये ३२ हजार ८७० लोक हे १९६६ आणि १९७१ सालादरम्यान, १ लाख ३२ हजार ६६१ लोक हे १९७१ सालानंतर आले आहेत. मंत्र्यांनी सांगितले की, असामसंबंधित सेवानिवृत्त असलेले न्यायमूर्ती बिप्लब शर्मा समिकीच्या एका अहवालानुसार, ६७ शिफारसीनुसार, ज्यात ५२ राज्य सरकारच्या अधिकार क्षेत्राच्या अंतर्गत आहे.
 
सांगण्यात येत आहे की, १९८५ मध्ये आसामच्या करारावर स्वाक्षरकी करण्यात आली होती. या करारात इतरही तरतुदीनुसार सांगण्यात आले की, २५ मार्च १९८५ मध्ये आसामच्या करारावर स्वाक्षरी करण्यात आली होती. या करारादरम्यान, इतरही तरदुत करण्यात आली. २५ मार्च १९७१ रोजी किंवा आसाममध्ये आलेल्या सर्व परदेशी लोकांना ओळखले जाईल आणि मतदार यादीतून त्याचे नाव वगळले जाईल. अशातच त्यांना हद्दपार करण्यासाठी पावले उचलली जातील.
 
भारत-बांगलादेश सीमेवर काटोरी तारांचे कुंपण बसवण्याबाबत एका वेगवेगळ्या प्रश्नाचे उत्तरही मंत्री अतुल बोरा यांनी दिले. बांगलादेशसोबतच्या एकूण २६७.५ किमीच्या आंतरराष्ट्रीय सीमेपैकी २२८. ५४१ किमीपर्यंत कुंपण घालण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121