"आम्हाला धमकावलं जातंय"; धनंजय देशमुखांचा गंभीर आरोप

    14-Feb-2025
Total Views | 26

beed
 
बीड : (Dhananjay Deshmukh) 'आम्हाला धमकावलं जातंय', असा गंभीर आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. बीडमध्ये वाल्मिक कराडची बी टीम सक्रिय असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. धनंजय देशमुख आपले भाऊ दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाचा सातत्याने पाठपुरावा करताना दिसत आहेत. अशातच आता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे.
 
काय म्हणाले धनंजय देशमुख?
 
संतोष देशमुख हत्या प्रकरणात बोलताना धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले आहे की, "जर धनंजय मुंडे हे दोषी नसतील तर त्यांच्यावर कारवाई करू नका, पण आरोपींना मदत करणारे जे लोक अद्याप बाहेर मोकाट फिरत आहेत ते कुणाचे कार्यकर्ते आहेत, हे पण शोधा. आम्ही कधीच निर्दोष लोकांवर कारवाई करा असे म्हणालो नाहीत आणि म्हणणार ही नाही. पण ज्यांचा दोष आहे हे आम्ही तुम्हाला पुराव्यानिशी सांगत आहोत, त्या लोकांवर सुद्धा अद्याप कारवाई का झाली नाही? किंबहुना बीडची बी टीम कोण चालवतंय? या बी टीमने विष्णू चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा सांगळे यांच्यासह अन्य आरोपींना पळून जाण्यासाठी मदत गेली. त्यांनी आरोपींना गाडी आणि पैसे पुरवले, तसेच इतर मदतही केली. मात्र, बीड पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही."
 
"आम्हाला धमकावलं जातंय"
 
"आम्ही कशात दोषी आहोत, तुम्ही आम्हाला भीती दाखवत आहात, दडपणाखाली आणत आहात. तुम्ही आम्हाला धमक्या देत आहात. आम्ही वेळोवेळी सांगितले आहे की आम्हाला कसं धमकावलं जातंय, आमच्या गावाचा काय दोष आहे? आरोपींना न्यायालयात नेलं जातं त्यादिवशी बी टीम त्या अवतीभवती असते. हे लोक आरोपीचे समर्थन करतात", असे धनंजय देशमुख यांनी म्हटले आहे.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121