"केजरीवालांमुळे अण्णा हजारे..." अमित शाह यांचे मोठे वक्तव्यं
12-Jan-2025
Total Views | 45
नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजले असून, प्रचारसभा, दौरे यांना उधाण आलं आहे. दिल्लीमध्ये आम आदमी पक्ष, काँग्रेस, भाजप अशी तिरंगी लढत होणार असल्याची चर्चा आहे. अशातच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका करत म्हटले की आज अण्णा हजारे यांनी दिल्लीतील लोकांपेक्षा जास्त पश्चाताप होत असेल केजरीवालांनी अण्णांसारख्या संत माणसाला पुढे आणून सत्ता हस्तगत केली. या केजरीवालांनी इतका भ्रष्टाचार केला की त्यांनी देशातील सर्व सरकारांचे रेकॉर्ड मोडले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह बोलताना म्हणाले की केजरीवाल दिल्लीला भ्रष्टाचार मुक्त प्रदेश बनवणार होते. परंतु त्यांच्या सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांपासून ते आमदारांपर्यंत अनेकांना तुरूंगवास भोगावा लागला. अमित शाह म्हणाले की अण्णा हजारे सुद्धा विचार करीत असतील की मी असा कुठला प्रोडॅक्ट बनवला जो इतका भ्रष्ट आहे. अमित शाह म्हणाले की भाजपचे सरकार सत्तेत आल्यावर कुठल्याही प्रकारच्या जनकल्याण योजना बंद होणार नाही. या दरम्यान त्यांनी दिल्ली सरकारच्या कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल यांच्यावर ताशेरे ओढले. अमित शाह जनतेशी संवाद साधताना म्हणाले की दिल्लीचे नेते आतापर्यंत २५०० हून अधिक झोपड्यांमध्ये जाऊन आले. त्यावेळी त्यांच्या सर्वेक्षणात असे लक्ष्यात आले की देशातील सर्वात प्रदूषीत शहर म्हणून आता दिल्लीकडे बघितले जातं. यासाठी अमित शाह यांनी आम आदमी पक्षाच्या सरकारला जबाबदार धरले आहे.