जनगणना आणि जातगणनेस २०२७ पासून प्रारंभ, दोन टप्प्यात होणार जनगणना

    04-Jun-2025
Total Views | 15
जनगणना आणि जातगणनेस २०२७ पासून प्रारंभ, दोन टप्प्यात होणार जनगणना
नवी दिल्ली, देशात २०२७ ची जनगणना दोन टप्प्यात आणि जातींची गणना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २०२७ च्या जनगणनेसाठी संदर्भ तारीख १ मार्च २०२७ रोजीची असेल.

लडाख आणि जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशासाठी आणि हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या राज्यांच्या समक्रमित नसलेल्या बर्फाळ प्रदेशांसाठी संदर्भ तारीख १ ऑक्टोबर २०२६ रोजीची असेल. १९४८ च्या जनगणना कायदाच्या कलम ३ च्या तरतुदीनुसार, वरील संदर्भ तारखांसह जनगणना करण्याच्या हेतूची अधिसूचना १६.०६.२०२५ रोजी अधिकृत राजपत्रात प्रकाशित केली जाईल.

जनगणना २०२१ देखील अशाच प्रकारे दोन टप्प्यात करण्याचे प्रस्तावित होते, पहिला टप्पा एप्रिल-सप्टेंबर २०२० दरम्यान आणि दुसरा टप्पा फेब्रुवारी २०२१ मध्ये. जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे. २०२१ मध्ये होणारी जनगणना पूर्ण झाली आणि १ एप्रिल २०२० पासून काही राज्ये/केंद्रशासित प्रदेशांमध्ये क्षेत्रीय काम सुरू होणार होते. तथापि, देशभरात कोविड-१९ साथीच्या आजाराचा प्रादुर्भाव झाल्यामुळे जनगणनेचे काम पुढे ढकलावे लागले.

'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मितीला वेसण घालण्याची गमावलेली संधी?

इराणसारख्या आपल्या कट्टर शत्रूदेशाने अण्वस्त्रे विकसित करु नये, म्हणून आताच नाही तर गेल्या काही दशकांपासून इस्रायलने आक्रमकपणे रणनीती अवलंबली. आजही इस्रायलने तितक्याच त्वेषाने इराणला अण्वस्त्रनिर्मितीपासून रोखण्यासाठी सर्व ताकद एकवटलेली दिसते. परंतु, दुर्दैवाने पाकिस्तानच्या अण्वस्त्रनिर्मिती प्रक्रियेला कायमस्वरुपी अंकुश लावण्यात भारताचे तत्कालीन काँग्रेस नेतृत्व अपयशी ठरले. पण, त्याच काँग्रेसी नेतृत्वाचे राजकीय उत्तराधिकारी असलेले राहुल गांधी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी अमेरिकेच्या दबावाखाली असल्याच्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121