मुंबई, दि.१७: प्रतिनिधी गेल्या दहा वर्षांत उत्तर पूर्व मुंबईत मोठ्या प्रमाणात विकास झाला आहे.भांडुप, कांजूरमार्ग आणि विक्रोळीसह आजूबाजूच्या परिसरात सुमारे एक लाख कोकणी बांधवांसाठी मुलुंडमध्ये रेल्वे टर्मिनस बांधण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघ महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी जाहीर सभेत सांगितले. "कोकणी गावाला वर्षात किमान चारदा कोकणात जाता. ट्रेन दिव्यातून सुटतात. रात्री एक वाजता दिवा स्टेशनला जाऊन बसावं लागते. साडेतील तास बसल्यानंतर कोकणची ट्रेन सुटते. मी तुम्हाला वचन देतो जर मी निवडून आलो तर देवेंद्रजींच्या आशीर्वादाने मुलुंड येथील रेल्वेच्या भूखंडावर मुलुंड टर्मिनस उभारण्यासाठी पूर्ण प्रयत्न करेल. येथून पहिली गाडी जी सुटणार ती कोकण एक्स्प्रेस असणार", अशा विश्वास महायुतीचे उमेदवार मिहीर कोटेचा यांनी व्यक्त केला.