मुंबई, भारतीय रेल्वेने मोठा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगर भागातून येणाऱ्या सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावले जाणार आहेत. लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. दिवा ते मुंब्रा रेल्वे स्थांनकांजवळ ही घटना घडली आहे. रेल्वे प्रवासी एकमेकांना घासलेगेल्यांने ही घटना घडली आहे. गेल्या २० वर्षांत मृत्यू झालेल्यांचा ही रेकॉर्ड आहे.
भारतीय रेल्वेने स्वयंचलित दरवाजे लावण्याचा मोठा निर्णय सोमवारी ९ मे रोजी घेतला आहे. कसारा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या लोकल ट्रेनमध्ये प्रवास करणाऱ्या एकूण आठ प्रवाशांचा अपघाती मृत्यू झाला आहे. अशे अपघात टाळण्यासाठी मुंबई उपनगर भागातून येणाऱ्या सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावले जाणार आहेत. या सुविधेमुळे कोणत्याही प्रकारची जीवित हाणी होणार नाही याची काळजी भारतीय रेल्वे घेत आहे.
मुंबई शहराची लोकसंख्या जास्त आहे. फक्त बारा ड्बयांची ही लोकल लाखो प्रवाश्यांना वेळेत पोहोचवण्याच काम करते. आता पर्यंत याच मुंबई लोकलमध्ये अनेक अपघात घडले आहेत. अनेकांचा जीव ही गेला, मात्र हा अपघात थोडा आगळावेगळा होता. मुंब्रा आणि दिवा स्थानका जवळ दोन लोकल ट्रेन एकाचवेळी क्रॉस होत असताना प्रवाशी दरवाजाला लटकत असल्या कारणामुळे एकमेकांना घासलेगेले, आणि ही घटना घडली. अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली आहे.
मुंबईमध्ये गेल्या २० वर्षांत, ५१,८०२ जणांचा मृत्यू झाला आहे. हा आता पर्यंतचा लोकल ट्रेनमधील घडलेल्या घटनांचा रेकॉर्ड आहे. हा आकडा अजून वाढत्ता कामानये म्हणून भारतीय रेल्वेने मुंबई उपनगर भागातून येणाऱ्या सर्व लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे लावण्याचा निर्णय घेतला आहे. जेणे करुण प्रवासी दरवाज्यायावर उभे राहून प्रवास करणार नाहीत.