पूर्वकल्पना देऊनही काँग्रेस सरकार बेफिकीर ; बंगळुरु चेंगराचेंगरीपूर्वी वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने लिहिलेल्या पत्रात खुलासा

    09-Jun-2025
Total Views | 4

Congress government unconcerned despite giving preconceptions
 
बंगळुरु : ‘रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु’च्या संघाने ‘आयपीएल’ स्पर्धेत मिळवलेल्या विजयाचा उत्सव साजरा करताना एम. चिन्नास्वामी स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरी होऊन 11 जणांचा मृत्यू झाला. याबाबत एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने काँग्रेस सरकारला पत्र लिहून गर्दीच्या सुरक्षेबद्दल चिंता व्यक्त केली होती आणि विधान सौधा येथे साजरा केल्या जाणार्‍या विजयाच्या उत्सवावर आक्षेप घेतल्याचे समोर आले आहे.
 
डीसीपी (विधान सौधा सुरक्षा) एम. एन. करिबासवन गौडा यांनी दि. 4 जून रोजी ‘डिपार्टमेंट ऑफ पर्सोनल अ‍ॅण्ड अ‍ॅडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म’च्या सरकारी सचिवांना पत्र लिहून यासंबंधीच्या धोक्यांबद्दल पूर्वकल्पना दिली होती. गौडा यांनी दहा मुद्द्यांच्या आधारे सुरक्षेसह महत्त्वाच्या इमारतींची व्यवस्था लावण्यासाठी लागणारा वेळ आणि त्यांना असलेला धोका याबद्दलचा उल्लेख या पत्रात केला होता. “विधान सौधा येथे लाखो क्रिकेट चाहते येण्याची शक्यता आहे.
 
सुरक्षा कर्मचार्‍यांची कमतरता असल्याने बंदोबस्त ठेवणे कठीण जाईल,” असे गौडा यांनी ‘डीपीएआर’च्या सचिव जी. सत्यवती यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले होते. तसेच, कार्यक्रमाच्या ठिकाणाची संवेदनशील स्थिती आणि अपुरे सीसीटीव्ही कव्हरेज हेदेखील चिंता आहे. मात्र, इतके स्पष्ट इशारे देऊनही विजयोत्सवाचा कार्यक्रम नियोजित ठिकाणीच घेण्यात आला.
 
चेंगराचेंगरी होण्याच्या काही तास आधी, सत्यवती यांनी वाढत असलेली गर्दी पाहून चाहत्यांना “विधान सौधा येथे येण्याऐवजी स्टेडियममध्ये जावे,” असे जाहीर आवाहन केले. मात्र, स्टेडियममध्ये उत्सव साजरा करण्यापूर्वी विधान सौधा येथे संघाचा सत्कार करण्यात आला. त्यामुळे बंगळुरुमधील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला कर्नाटकचे काँग्रेस सरकारच जबाबदार असल्याचे दिसून येते.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

गोरेगाव-मुलुंड जोड रस्त्याच्या भुयारी कामाला वेग राष्ट्रीय उद्यानातील वन खात्‍याची १९.४३ हेक्‍टर जागा बीएमसीकडे वळती - केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता

मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्वाकांक्षी गोरेगाव - मुलुंड जोड रस्ता प्रकल्प (तिसरा टप्पा) अंतर्गत बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या बांधणीला आता गती मिळणार आहे. प्रत्येकी ४.७ किलोमीटर अंतराच्या आणि ४५.७० मीटर रुंदीच्‍या जुळ्या बोगद्यासाठी आवश्‍यक असलेली १९.४३ हेक्‍टर वनजमीन बृहन्‍मुंबई महानगरपालिकेकडे वळती करण्‍यास केंद्रीय पर्यावरण, वन व वातावरणीय बदल मंत्रालय यांची अंतिम मान्‍यता मिळाली आहे. त्‍यानुसार, अटी व शर्तींचे अनुपालन तसेच पूर्ततेची ..

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

राज्यातील १८ हजार शाळांमध्ये पटसंख्या २० पेक्षा कमी

१ हजार ६५० गावांमध्ये प्राथमिक, तर ६ हजार ५५३ गावांमध्ये उच्च प्राथमिक शाळा नाहीत राज्यातील एक लाखांहून अधिक शाळांपैकी सुमारे १८ हजार शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या २० पेक्षा कमी आहे. तर १ हजार ६५० गावांत प्राथमिक आणि ६ हजार ५५३ गावांत उच्च प्राथमिक शाळा उपलब्ध नाहीत. विद्यार्थी संख्येत घट झाली असली, तरी त्या शाळा सुरूच राहतील आणि त्या ठिकाणी शिक्षणात अडथळा येणार नाही, याची संपूर्ण काळजी घेतली जाईल. ज्या ठिकाणी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे, तेथे अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करण्यात येत असल्याची माहिती ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121