आपलेच निघाले, 'घर के भेदी'! ४० कोटींचे कर्ज पोहोचले; ८५ कोटींवर बँकेने केले घर जप्त

    02-Jul-2025
Total Views | 41

Loan of 40 crores reached; Bank seized the house for 85 crores
 
 
मुंबई : मुंबईतील एका कापड व्यावसायिकाच्या कौंटूंबिक वादातून ४० कोटींचे कर्ज ८५ कोटींवर पोहचल्याची घटना उघड झाली आहे. कुटूंबातील कटुता आणि आर्थिक वादाच्या कलहातून हा प्रकार घडला. कापड व्यावसायिक असलेल्या अलोककुमार कासलीवाल यांचे पेडर रोडवरील घर बँकेने आता जप्त केले आहे.
 
अलोककुमार कासलीवाल यांनी पेडर रोडवरील सदनिका जे सी फ्लॉवर्स बिल्डींगमधील २ बीएचके अर्पांटमेंट खरेदी करण्यासाठी बँकेकडून ४० कोटींचे कर्ज घेतले होते. परंतू; कुटूंबाच्या वादात कासलीवाल यांचे हे कर्ज ८० कोटींवर पोहचले. बँकेने आता अलोककुमार कासलीवाल यांच्यावर कारवाई करत त्यांचे २ बीएचके अर्पांटमेंट जप्त केले आहे.
 
कारवाई बाबत बोलताना कासलीवाल म्हणाले की, " १९६३ पासून आम्ही येथे राहत आहोत. माझा सावत्र भाऊ अभयकुमार कासलीवाल याची दोन्ही मुले वारीज आणि अंबुज हे दोघांनीही दुसरे कर्ज मिळवण्यासाठी मला न सांगता फसवून जप्त करण्यात आलेल्या माझ्या घराचा उपयोग हा तारण म्हणून केला, त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड न केल्यामुळे परिणामी, माझी थकबाकी ८५ कोंटीवर पोहचली."
 
कासलीवाल यांचा बँकेविरुद्ध खटला
 
कासलीवाल यांना हे कर्ज येस बँकेने मंजूर केले होते. बँकेने जप्त केलेल्या घरासंबंधी अलोककुमार कासलीवाल यांनी बँकेविरुद्ध खटला दाखल केला आहे. जो अजूनही न्यायालयात प्रलंबित आहे, परंतू खटल्याचा निर्णय येण्यापुर्वीच बँकेने ही कारवाई केल्याचा दावा कासलीवाल यांनी केला आहे. मुंबईच्या कापड उद्योगातील एकेकाळी प्रमुख नावांपैकी एक असलेले कासलीवाल कुटुंब आता मालकी आणि थकबाकीच्या कायदेशीर लढाईत अडकले दिसत आहे.
 
 
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

वसईत योगेश्वर भावकृषी लागवडीसाठी शेतात स्वाध्यायींचा भक्तिमय भावार्थ , बालसंस्कार केंद्रातील मुलेही रमली चिखलात

परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले प्रेरित स्वाध्याच्या अनेक प्रयोगातील योगेश्वर भावकृषिचा प्रयोग म्हणजे ईश्वराच्या भक्ती बरोबर सर्वांनी मिळून सामाजिकता जपण्याचे भान ठेवणारा अनोखा प्रयोग . याप्रमाणे वसई तालुक्यातील अनेक गावांत सद्ध्या योगेश्वर भावकृषि लागवड सुरू असून स्वाध्यायींचा श्रमभक्तिमय भावार्थ यातून दिसून येतो.वसई पूर्वेतील एका गावात अश्याच प्रकारच्या भावार्थाने स्वाध्यायीं भातशेती लागवडीसाठी रविवारी कृषिवर एकत्र आले होते.यामध्ये बालसंस्कार केंद्रातील मुलेही समाविष्ट झाली होती.यावेळी मुलांची ..

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

वंशावळीतून वगळणे ही फसवणूकच; सर्वोच्च न्यायालयाचा बहिणींना दिलासा

बेंगळुरू मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (बीएमआरसीएल) कडून ३३ कोटी रूपयांची भरपाई मिळवण्यासाठी वंशावळ आणि विभाजन करारात खोटेपणा करून पाच बहिणींना संपत्तीतून वगळल्याच्या आरोपावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन आरोपीविरुद्ध फौजदारी खटला चालवण्याचे निर्देश नुकतेच दिले आहेत. याबाबतीत न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्या. पी.बी. वराले यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, “प्रथमदर्शनी पुरावे असे दर्शवतात की संबंधित कागदपत्रे मुद्दाम खोटी तयार करण्यात आली असून, त्याचा उद्देश दिवंगत के. जी. येल्लप्पा रेड्डी यांच्या पाच मुलींना ..

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केट संचालकावर राजीनामा देण्याची आली वेळ - प्रशासकाच्या मनमानी कारभारा विरोधात संचालकांचा संताप

कल्याणच्या एपीएमसी मार्केटमधील भूखंड लक्ष्मी मार्केट व्यापारी संघटनेला दिल्यानंतर एपीएमसीमधील संचालक प्रशासकावर चांगलेच संतापले आहे. हा भूखंड नियमबाह्य पद्धतीने दिला गेला असल्याचा आरोप करीत आमच्या संचालकांच्या चालत नाही तर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन राजीनामा देण्याचे विधान केल्याने राजकीय वर्तूळात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मी मार्केटच व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. घेतलेला भूखंड हा कायदेशीर आहे. एपीएमसीमधील काही लोक आर्थिक फायद्यासाठी हे सगळे करीत आहे. या वादामुळे एपीएमसी व्यापारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121