२०३६ ‘ऑलिम्पिक’साठी भारताची ‘गॉलिम्पिक’ तयारी!

    28-Feb-2024
Total Views | 75
Olympics 2036

२०३६ साली ऑलिम्पिकचे यजमानपद भारताला मिळावे, यासाठी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी विशेषत्वाने प्रयत्नशील आहेत. ऑलिम्पिकच्या आयोजनासाठी गुजरातमधील अहमदाबाद शहरामध्ये ‘गॉलिम्पिक’ या सरकारी यंत्रणेच्या माध्यमातून विकासकामांची तयारीही वेगाने सुरु आहे. तेव्हा, ऑलिम्पिक सोहळ्याचे २०३६ साठीचे यजमानपद भारताला मिळालेच, तर त्यासाठी ‘गॉलिम्पिक’ने आजवर केलेल्या अहमदाबादमधील विकासकामांचा आढावा घेणारा हा लेख...

आतापर्यंत प्राप्त माहितीनुसार, एका नावाजलेल्या आंतरराष्ट्रीय, २०१२ साली लंडनच्या ऑलिम्पिक सोहळ्याच्या संपूर्ण बांधकामाचे नियोजन केलेल्या सल्लागाराकडून भारताने ऑलिम्पिकच्या प्रस्तावाचा पूर्ण आराखडा, नियोजन आताच तयार करुन घेतले आहे. त्याअंतर्गतच २०३६ मध्ये अहमदाबाद व गांधीनगरमध्ये ऑलिम्पिक सोहळा आयोजित करण्याच्या हालचालींना आता वेग आला आहे.ऑलिम्पिकचे नियोजन व संचालन करण्यासाठी गेल्या वर्षीच भारताने विशेष अशा समितीचे (special purpose vehicle) गठन केले आहे. ही समिती ऑलिम्पिक दर्जाच्या पायाभूत तत्वांचे पालन करून अहमदाबाद व गांधीनगरमध्ये विकासकामे करणार आहे. एकूण ३०० एकर भूखंडांमध्ये अहमदाबादच्या मोटेरामध्ये सहा हजार कोटी रुपये खर्चून सरदार वल्लभभाई पटेल स्पोर्टस एन्क्लेव्हकरिता मुख्य आराखड्याचा प्रस्ताव राबविणार आहे. भारताने ऑलिम्पिकचे पूर्ण नियोजन व आराखडा, ऑस्ट्रेलियन डिझाईन आणि आर्किटेक्चर कन्सल्टंटकडून तयार करुन घेतले आहे. त्यानिमित्ताने उभारल्या जाणार्‍या नव्या सहा स्टेडियममध्ये एक लाखांहून अधिक प्रेक्षकांना सामावून घेण्याची क्षमता असणार आहे. शिवाय स्पोर्ट्स एन्क्लेव्हकरिता अस्तित्वात असलेल्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये १.१ लाख प्रेक्षक सामाहून घेण्याची क्षमता आहे. हे स्टेडियमसुद्धा ऑलिम्पिकसाठी वापरले जाईल.

गुजरातमधील ‘गुजरात ऑलिम्पिक प्लॅनिंग अ‍ॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर कार्पोरेशन लिमिटेड’ (गॉलिम्पिक) या संस्थेचे अधिकारी व ऑलिम्पिक दर्जा राबवणार्‍या पायाभूत संस्थेकडून दोन किमीच्या दुसर्‍या टप्प्याचे साबरमती नदीच्या काठावरचे बांधकाम सध्या सुरू झाले आहे.ऑलिम्पिक खेळांकरिता वापरण्यात येणार्‍या सात स्टेडियममध्ये प्रेक्षकांची क्षमता खालीलप्रमाणे असेल.अहमदाबाद महानगरपालिकेचे आयुक्त, मुख्य संचालक आणि ‘गॉलिम्पिक’चे आयुक्त थेन्नारसन यांनी सांगितले की, “ऑलिम्पिककरिताचा मुख्य आराखडा (मास्टर प्लॅन) हा आमच्याकडून जवळ जवळ तयार झाला आहे. या आराखड्यात इतर संचालकांकडून काही सूचना वा बदल केल्यानंतर आम्ही तो कायम अंतिम करणार आहोत.”अहमदाबाद नगर विकास संस्थेचे (AUDA) जी संस्था ऑलिम्पिकच्या संचालनामध्ये सामील होणार आहे, त्या ‘ऑडा’चे मुख्य संचालक डीपी देसाई म्हणतात की, “ऑलिम्पिकच्या स्पोर्ट्स एन्क्लेव्हची प्ररचना करणे (design) व ती अमलात आणणे, ही कामे सध्या सुरू केलेली आहेत. सहा स्टेडियम बांधण्यासाठी निविदा तयार करून त्यासंबंधी बोली मागविल्या गेल्या आहेत. ऑलिम्पिक बांधण्यासाठीचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कन्सल्टन्ट या कामामध्ये रस घेऊन कामाला लागले आहेत. स्पोर्ट्स एन्क्लेव्हची पायाभूत कामे आम्ही लवकरच पूर्ण करणार आहोत. ठरविलेल्या ऑलिम्पिक गाववस्तीकरिता राहण्याच्या व इतर सुखसोयी स्पोर्टस एनक्लेव्हच्या बोली नक्की झाल्यानंतर अमलात आणल्या जातील.” देसाई पुढे असेही म्हणतात की, “एकीकडे ही ऑलिम्पिकसाठीची विकासकामे चालू ठेवली असताना, आम्ही २०३६चे ऑलिम्पिकचे यजमानपद नेमके कोणत्या देशाकडे जाणार, या निर्णयाची आम्ही आतुरतेने वाट बघत आहोत. पण, साधारणपणे हा निर्णय २०२६-२७ या पूर्वी ऑलिम्पिक मुख्य अधिकार्‍यांकडून नक्की केला जाईल, असे वाटते.”

गुजरातच्या नगर विकास, नागरी गृहखात्याचे मुख्य सचिन आणि ‘गॉलिम्पिक’चे सदस्य आश्विनी कुमार म्हणतात की, “प्ररचना अमलात आणणे याकरिता आम्ही निविदा बोली मागविल्या आहेत. सिव्हिल इंजिनिअरिंगच्या निविदा बोली नक्की झाल्यानंतर ही कामे साधारणपणे ऑक्टोबर २०२४ पासून सुरू केली जातील व साडेतीन वर्षांत ती कामे पूर्ण केली जातील. अशातर्‍हेने अहमदाबाद शहर ऑलिम्पिक सोहळ्याकरिता भारताची राजधानी बनणार आहे.”सहा स्टेडियममध्ये प्रेक्षकांच्या बसण्याच्या क्षमतेविषयी ‘गॉलिम्पिक’चे अधिकारी म्हणतात की, फुटबॉल स्टेडियमची क्षमता ५३ हजार इतकी राहील. बास्केटबॉल स्टेडियमची बसण्याची क्षमता पाच हजार असेल. अनेक आंतरक्रीडा स्पर्धा आयोजित करण्यासाठी बांधण्यात येणार्‍या स्टेडियमची क्षमता १८ हजार होईल. टेनिस स्टेडियमची क्षमता १५ हजार असेल. व्हॉलीबॉल स्टेडियमची १२ हजार आणि अ‍ॅक्वेटिक क्रीडा स्टेडियमची क्षमता १२ हजार असणार आहे.‘गॉलिम्पिक’चे एक ज्येष्ठ अधिकारी म्हणतात की, सुरतसारख्या दुसर्‍या शहरांची देखील ऑलिम्पिक सोहळ्याकरिता निवड केली होती. परंतु, आता शेवटी फक्त लक्ष अहमदाबादकडेच लागलेले आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून वा ‘भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन’कडून अजून कोठलेही शहर ऑलिम्पिक क्रीडा सोहळ्याकरिता नक्की झालेले नसले, तरी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नुकतेच अहमदाबाद शहराचे नाव ऑलिम्पिकसाठी सूचविले आहे व त्याकरिता काही बैठकांमध्ये गुजरातच्या अधिकार्‍यांशीही त्यांनी चर्चा केली आहे.

स्पोर्ट्स एनक्लेव्हविषयी मुख्य आकर्षण म्हणजे ‘ऑडा’चे मुख्य अधिकारी देसाई म्हणतात की, “‘ रिंग ऑफ युनिटी’ हे आकर्षण राहणार आहे. अहमदाबाद शहरात रिंग बांधकामाचे फार महत्त्वाचे आकर्षण राहील.”या ‘रिंग ऑफ युनिटी’करिता करमणूक व इतर बाबींकरिता चार एकर भूखंडाची आवश्यकता आहे. त्यात १५०मीच्या व्यासाची वर्तुळाकार जागा असेल. ही वर्तुळाकार रिंगची जागा सांस्कृतिक व सामाजिक घटनांकरिता, विविध सणांकरिता आणि व्यापारविषयक समारंभांकरिता वापरली जाईल. या रिंग स्टेडियममध्ये बसण्याची क्षमता पाच हजारांपर्यंत असेल. शिवाय याच्या बाजूला तात्पुरत्या बसण्याच्या व्यवस्थेमध्ये जास्तीची १२ हजार माणसे बसू शकतील. इतर करमणुकीसाठी बाहेरील अ‍ॅम्फी थिएटरमधील कार्यक्रमसुद्धा आयोजित करता येतील.रिंग स्टेडियम अशा प्रकारे प्ररचित केलेले आहे की, रोज बदलणार्‍या प्रेक्षकांनाही हे स्टेडियम खुले राहणार आहे. बाहेरच्या जागेत अ‍ॅम्फी थिएटरसारख्या बसण्याच्या सोयीसुद्धा नियोजनामध्ये रोजच्या बदलणार्‍या प्रेक्षकांकरिता ठेवल्या आहेत. ज्या दिवशी ऑलिम्पिकच्या क्रीडा स्पर्धा असतील, तेव्हा या जागेवर मोठ्या पडद्याचा वापर केला जाईल व बाहेरच्या प्रेक्षकांना ती दृष्ये बघण्याकरिता बंद केली जातील व फक्त अधिकृत प्रेक्षकांसाठी ती दृष्ये बघता येतील.गॉलिंपिकचे एक ज्येष्ठ अधिकारी म्हणतात, या जागेवर मोकळी जागा, रस्ते व एक मनोरा इमारत बांधली झाणार आहे तेथून नदी किनार्‍याची विहंग दृष्ये लोकांना बघता येतील.
 
या रिंग स्टेडियमच्या जागेजवळ अनेक विविध खाण्याचे पदार्थ व सरबते इत्यादी जिन्नस विक्रीकरिता ठेवलेले असतील व तेथे येणारे प्रेक्षक वा बाहेरील लोक या सुखसोयींचा लाभ घेऊ शकतील. नदी किनार्‍याजवळ गाड्या ठेवण्याकरिता बेसमेंट पार्किंगची व्यवस्था केलेली असेल. ही जागा मेट्रो स्थानकांच्या जवळच व सोयीची अशी ठेवली जाणार आहे.अहमदाबाद व गांधीनगर अशी जुळी शहरे आहेत की, तेथील चार महत्त्वाच्या जागांवरून ऑलिम्पिकच्या २० ठिकाणच्या चालू असलेल्या क्रीडास्पर्धा अनुभवता येतील. या शहरांच्या वारसा व विकासाच्या घटनांकडे लक्ष देऊन ३० मिनिटांत येथे पोहोचू शकणार्‍या जागेवर ऑलिम्पक गाव प्रेक्षकांसाठी वस्तीकरिता तात्पुरते उभारले जाईल. या ऑलिम्पिक गावात अ‍ॅथलेट्सकरिता पुरेशा सोयी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.एका दुसर्‍या ज्येष्ठ ‘गॉलिम्पिक’च्या अधिकार्‍यांचे म्हणणे आहे की, ते ऑलिम्पिकच्या प्ररचनेमध्ये थोडासा बदल आणि जास्ती खर्च करून ऑलिम्पिक सोहळा प्रसारित करण्यासाठी एक तात्पुरता ‘ब्रॉडकास्टिंग हब’ तयार करणार आहेत. त्यातून म्हणजे आंतरराष्ट्रीय ब्रॉडकास्टिंग (IBC) केंद्रामधून छोट्या छोट्या खेळांचे दर्शन सर्व ठिकाणी दाखविता येईल.गुजरात सरकारने अशी सूचना केली आहे की, गांधीनगरमधील महात्मा मंदिर कन्व्हेन्शन केंद्र वा हेलीपॅड जागा या दोन्ही जागा ‘आयबीसी’ कामासाठी वापरता येतील. गुजरात सरकारकडून सार्वजनिकत वाहतूक प्रणाली पण पुरेशी कार्यक्षम अशी बनविली जाणार आहे. साबरमती नदीजवळ कार्यक्षम अशी अहमदाबाद-मुंबई मेट्रो टर्मिनल, पश्चिम रेल्वे व्यवस्था व अहमदाबाद बस सेवा ट्रान्स्पोर्ट प्रणाली उभारली जाणार आहे. प्रेक्षकांना या सर्वांचा लाभ घेता येईल.त्यामुळे आता इतकी व्यापक पातळीवर सुरु केली असल्यामुळे, २०३६चे ऑलिम्पिकचे यजमानपद भारताच्या पदरात पडावे आणि ‘जी २०’ प्रमाणेच हा सोहळादेखील वैश्विक पातळीवर संस्मरणीय व्हावा, हीच इच्छा.


-अच्युत राईलकर



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121