साठ्ये महाविद्यालयत भरणार प्राचीन काळातील अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तूंचे प्रदर्शन

    17-Dec-2024
Total Views | 163
 
exibihition
 
मुंबई : पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठये महाविद्यालय (स्वायत्त), प्राचीन भारतीय संस्कृती व पुरातत्त्व विभाग, बौद्धविद्या विभाग , प्राणिशास्त्र विभाग, पुरातत्त्व विभाग, मुंबई विद्यापीठ, पर्यटन मंत्रालय , भारत सरकार, लब्धी विक्रम जनसेवा ट्रस्ट, अहमदाबाद, इन टू द पास्ट हेरिटेज, मराठी देशा फाऊंडेशन, पुरासंस्कृती, आणि अश्वमेध प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने चार दिवसीय पुरातत्त्व भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १९ डिसेंबर ते २२ डिसेंबर २०२४ या कलावधीत ‘पार्ले टिळक विद्यालय असोसिएशनचे साठये महाविद्यालय (स्वायत्त), विलेपार्ले (पूर्व)’ येथे सकाळी ९ ते सायं. ६ या वेळेत हे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. नुकत्याच पार पडलेल्या भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे शिल्पकार डॉ. ह. धी. सांकालिया यांच्या जन्मदिवसाचे औचित्य साधून हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे.
 
दहाव्या शतकाच्या काळातील अप्रतिम शिल्पे, रामायण आणि महाभारताची हस्तलिखिते, तसेच जुन्या काळातील नाणी आणि शिलालेख, प्राचीन भांडी आणि दुर्मिळ पुराजैवशास्त्रीय नमुने अशा प्राचीन काळातील अनेक दुर्मिळ आणि मौल्यवान वस्तू या प्रदर्शनात पाहायला मिळतील. अभ्यासकांपासून सामान्यांपर्यंत हे प्रदर्शन आहे. प्राचीन इतिहासाला जिवंत अनुभवण्याची इतिहास प्रेमींसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहील. यासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही.
अग्रलेख
जरुर वाचा
मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा, गावठाणनिर्मितीसाठी सर्वेक्षण होणार

मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा, गावठाणनिर्मितीसाठी सर्वेक्षण होणार

गेल्या ३५-४० वर्षांपासून वन जमिनीवरील हक्काच्या घरांसाठी संघर्ष करणाऱ्या मोखावणे-कसारा ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी मोखावणे-कसारा गावात गावठाण निर्मितीसाठी वन, महसूल आणि रेल्वे विभागाच्या जमिनीचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला आहे. त्याचबरोबर या जमिनीवरील रहिवाशांना नोटीसा बजाविल्या जात असल्या, तरी त्यांच्याबाबत राज्य सरकारला सहानुभूती असल्याची ग्वाही वन मंत्र्यांनी दिली. माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील व माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्या पुढाकाराने ही बैठक झाली...

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

पंतप्रधान मोदींमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली

“पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत हे जागतिक स्तरावरील एक आगळे समीकरण झाले असून, मोदी सरकारच्या कारकिर्दीमुळे भारताची जगातील प्रतिष्ठा वाढली आहे. गेल्या ११ वर्षांत मोदी सरकारच्या विविध योजनांमुळे देशातील गरीब, महिला, युवक, दलित, वंचित आणि समाजाच्या सर्व स्तरांतील जनतेच्या जीवनात आमूलाग्र बदल झाला. देशाला अभूतपूर्व प्रतिष्ठा प्राप्त करून दिल्याबद्दल मी मोदी सरकारचे आणि व्यक्तिशः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो व आभारही मानतो”, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोदी सरकारच्या तिसऱ्या ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121