
आयएमएफकडून भारताला 'प्रोत्साहन' पर सल्ला
नवी दिल्ली: भारत सरकारने २० जुलैला बिना बासमती तांदुळाच्या निर्यातीवर बंदी घातली होती. देशांतर्गत पुरेसा पुरवठा होण्यासाठी हे पाऊल सरकारने उचलले होते.सणासुदीच्या काळात किरकोळ बाजारात किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी हे प्रयोजन होते.परंतु याच धर्तीवर इंटरनॅशनल मॉनेटरी फंडाने भारताला तांदूळ निर्यातीवरील निर्बंध काढण्यासाठी भारताला साद घातली आहे.जगभरातील महागाईवर नियंत्रण आणण्यासाठी हा आय एम एफ चे हे प्रोत्साहन आहे.भाताच्या या प्रकारच्या तांदूळाचे परदेशात तुलनेने मोठ्या संख्येने निर्यात केली जाते.आंतरराष्ट्रीय बाजारात मागणी पुरवठा यांचा समतोल न राखता आल्याने संख्यात्मक दृष्ट्या अन्नधान्य महाग झाले ज्यात नुकतेच टोमॅटो भारतीय बाजारपेठेत महाग झाले होते.
आंतरराष्ट्रीय मुद्रा निधी ( इंटरनॅशनल मॉनेटरी फंड)चे मुख्य अर्थशास्त्री पिरे ओलिवर गुरीनचास यांनी पत्रकार परिषदेत बोलताना 'अशा निर्यातीवरील बंदी मुळे जगात अन्नधान्याची किंमत अस्थिर झाली आहे. अशा निर्णयाने त्याचे पडसाद वैश्विक स्तरावर उमटत असतात.'असे सांगितले.भारतातील बिना बासमती तांदूळाची निर्यात ही २०२२ -२३ मध्ये ४.२ मिलियन इतकी होती जी त्या आधील आर्थिक वर्षात २.६२ मिलियन इतकी होती. मुख्यत्वे युएस, थायलंड, इटली ,स्पेन, श्रीलंका याठिकाणी भारताकडून मोठ्या प्रमाणात तांदूळ निर्यात होते.निर्यातीवरील २० टक्के सूट योजना ही सरकारने काढली आहे आणि बिना बासमती तांदूळ निर्यात बंदी केली आहे. इंटरनॅशनल मॉनेटरी फंडचा अपडेट्स नुसार भारत ६.१ टक्के विकास दराने मार्गक्रमण करेल असा अंदाज वर्तविण्यात आला आहे.