रिझन: ‘शून्य अपघात’ संकल्पना

    25-Jul-2023
Total Views |
Article On Reason Traffic Foundation

पुणे शहरात वाहनांच्या अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढते आहे. अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, यासाठी सरकार आणि प्रशासन उपाययोजना करत असते. काही स्वयंसेवी संस्थाही ‘शून्य अपघात’ संकल्पनेसाठी काम करतात. अशीच एक संस्था म्हणजे ‘रिझन ट्रॅफिक फाऊंडेशन.’ या संस्थेच्या कार्याचा आढावा या लेखात घेतला आहे.

'रिझन ट्रॅफिक फाऊंडेशन’ नावाने सिंहगड रोड भागात कार्यरत आहे. पूर्वी ही संस्था ‘सिंहगड रोड वाहतूक समस्या निवारण मंच’ या नावाने कार्यरत होती. ही संस्था म्हणजे जनमानसातून उभारलेली जनसभागातून उभारलेली चळवळ आहे. पुण्यात वाहतुकीची समस्या भीषण आहे. त्यामुळे सामान्य नागरिकांना होणारा मनस्ताप, त्रास कुठेतरी थांबला पाहिजे, त्यासाठी काहीतरी केले पाहिजे, या विचाराने सिंहगड रस्ता परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेऊन ‘वाहतूक समस्या निवारण मंचा’ची स्थापना केली. मंचाचा उद्देश वाहतूक समस्या निवारण आणि प्रबोधन करणे आहे.

कारण, जसजशी लोकसंख्या वाढत आहे तसतसे वाहनांची संख्या त्याच प्रमाणात वाढत आहे. लोकसंख्या आणि वाहनांची संख्या यांचे प्रमाण आता समान झाले आहे. तसेही सर्वसामान्य पुणेकर सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर अवलंबून राहत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस वाहनांचे प्रमाण वाढतच राहणार आहे. दुसरीकडे पुण्यातील रस्त्यांची अवस्था ही दयनीय आहे. रस्त्यावरील खड्डे (खड्डे न सापडणे हा संशोधनाचा विषय आहे), कोणत्याही सिग्नल न पाळणे, विरुद्ध बाजूंनी वाहन चालवणे, वाहन चालविताना मोबाईलवर बोलणे, वाहतूक पोलिसांची असणारी अनास्था (म्हणजे हप्ते गोळा करण्यासाठी रस्त्याच्याकडेला लपणे) यासारख्या अनेक प्रश्नांमुळे पुण्यातील अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

प्रत्येक घरी पूर्वी दोन ते तीन दुचाकी असायच्या. आता बहुतांशी घरात एकापेक्षा जास्त चारचाकी वाहने असतात. पुण्यात आज रोजी ४३,४०,६७६ नोंदणीकृत वाहने आहेत त्यापैकी ३२,२३,१३५ नोंदणीकृत दुचाकी वाहने पुण्यात आहेत. एकंदरीत सगळ्या बाबींचा विचार करता अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. याला जशी जशी तांत्रिक चुका व नैसर्गिक आपत्ती कारणीभूत आहेत, तशा मोठ्या प्रमाणावर मानवी चुका व निष्काळजीपणा यामुळे अपघात प्रमाण वाढतेच आहे. एकंदरीत खालीलप्रमाणे पुणे शहरातील अपघातांची संख्या याबाबत नोंदी दिसत आहेत.या साठी मंचाच्या कार्यकर्त्यांनी पोलीस उपायुक्त वाहतूक शाखा पुणे शहर यांना निवेदन देऊन कार्यालयात सुरुवात केली. ‘शून्य अपघात’ संकल्पनेतून वाहतूक नियोजन व प्रबोधनाची सेवा रोज सकाळी ९.३० ते १०.३० आणि संध्याकाळी ७.३० ते ८.३० या वेळेत राबवली जाते. दि. ३ ऑगस्ट, २०१५ ला वाहतूक विभागाचे निरीक्षक मुरलीधर करपे यांच्या हस्ते मंचाच्या उपक्रमांचे औपचारिक उद्घाटन झाले. मंचा च्यावतीने भा. द. खेर अर्थात आनंदनगरच्या चौकात नागरिकांसाठी सूचना पेट्या बसविण्यात आल्या. त्याचे उद्घाटन परिसरातील ज्येष्ठ नागरिक वसंतराव घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. काही नागरिक हे उपजत समाजसेवक करत असतात.

नोकरीच्या वेळात समाजसेवा आपल्या आवडत्या गोष्टी, छंद, प्रवास यांना मनाजोगता वेळ देता येत नाही. मात्र, निवृत्तीनंतरचा वेळ समाज प्रबोधनाच्या कार्यात देता येतो याकरिता ज्येष्ठ व्यक्ती अग्रेसर राहतात. त्याचप्रमाणे वसंतराव घुगे यांनी निवृत्तीनंतर २० वर्षांपासून अधिक काळ वाहतूक नियमन व प्रबोधन करत आहेत. हे सर्व जण ‘वाहतूक नियमन आणि प्रबोधन’ या उपक्रमात आवर्जून मदत करतात.स्मार्ट चँम्पस अकॅडमी, सीप अबॅकस आणि ब्रेन जिम यासारख्या विविध संस्थांतील शिक्षक, कर्मचारी, १५ ते २० विद्यार्थी हे ‘वाहतूक नियमन आणि प्रबोधन’ या उपक्रमात सहभागी झाले. याच उपक्रमाला विविध शाळांच्या बस आणि व्हॅनचालक, मालकांनी सक्रिय पाठिंबा दिला. गणेशोत्सवादरम्यान मंचाच्या आवाहानाला विविध सार्वजनिक मंडळांनी प्रतिसाद दिला. माणिकबाग सिंहगड रस्ता येथे श्री शिवतेज मित्र मंडळाचे कार्यकर्ते जनजागृती मोहिमेत सहभागी झाले होते. सनसिटी रस्ता येथील सुंदर सहवास फेज एक आणि माणिक बाग सिंहगड रस्ता येथील शिवसागर फेज एक या सहकारी गृहनिर्माण सोसायटीतील बालवृद्धांनी या उपक्रमात सहभाग घेतला. त्यामुळे लहान मुलांना वाहतूक नियमनाचे बाळकडूच मिळाले.

रस्ता सुरक्षा सप्ताह आणि संक्रांतीच्या निमित्ताने सिंहगड रस्तावरील विविध चौकात वाहतूक नियमन आणि प्रबोधन करण्यात आले. यावेळी वाहतूक शिस्त पाळणार्‍या नागरिकांना तीळगूळ देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमात प्रामुख्याने विठ्ठलवाडी येथील तू. गो. गोसावी विद्यालयातील आठवी व नववीचे सुमारे २५० विद्यार्थी सहभागी झाले होते.तसेच संस्थेच्या उपक्रमास वाहतूक पोलिसांचाही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्यावतीने विद्यार्थ्यांना शाळेत वाहतुकीच्या नियमाबाबत चित्रफीत दाखवण्यात येऊन जागर करण्यात आला. वाहतूक पोलीस निरीक्षक श्री. म. ग. काळे यांच्या व इतर वाहतूक पोलिसांच्या सहकार्याने हा उपक्रम राबवण्यात आला.

आषाढी पंढरपूरची वारी हा महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सण आहे. यावेळी वाहतूक नियमन करून ‘वारकरी बांधवांची सेवा’ हा उपक्रम मंचातर्फे राबविण्यात आला. प्रति पंढरपूर म्हणून समजल्या जाणार्‍या विठ्ठलवाडी येथे आषाढी एकादशीला भक्तांचा महासागर लोटत असतो. अशावेळी मंचातर्फे वाहतूक नियमन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत करण्यात येते. तसेच, राखी पौर्णिमेस वाहतूक नियम तोडणार्‍या दुचाकी, चारचाकी वाहनचालक, बसचालक, रिक्षाचालक व पादचारी यांना राखी बांधून वाहतूक नियमांची जाणीव करून घेण्यात आली. मंचाने ‘वाहतूक जनजागृती दिन’ या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घेतला. वाहतूक नियम पाळण्यासंदर्भात जनजागृती करणारे १२०० स्टिकर्स विविध वाहनांवर चिकटविले. ‘रस्ता सुरक्षा अभियाना’अंतर्गत वे टू अ‍ॅम्ब्युलन्स रुग्णवाहिकेस प्राधान्यक्रम असा अभिनव उपक्रम धायरी फाटा ते सावरकर चौकपर्यंत राबवण्यात आला.

मंचाच्या या कार्याला सिंहगड रोड येथील डॉक्टर्स असोसिएशनने ही सक्रिय पाठिंबा दिला. या उपक्रमासाठी अर्पण वृद्धाश्रमाचे डायरेक्टर डॉक्टर दीपक शिंदे यांनी रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली.संस्थेच्या या उपक्रमात अध्यक्ष अश्विन शिंदे, उपाध्यक्ष धनंजय मुळे, विश्वस्त जागृती कुलकर्णी, नीळकंठ कुरीले, अशोक वेल्हाळ कार्यरत आहेत यांच्या साथीला समीर रूपदे, वैशाली शेकदाळ, प्रसाद गाजरे, सचिन मोटे, उज्वल पासलकर, अनिकेत दिवेकर यासारख्या कार्यकर्ते सक्रिय सहभाग देत असतात.‘रिझन’ संस्था ‘शून्य अपघात’ संकल्पना राबवते. मात्र, संस्थेच्या प्रयत्नांना प्रत्येकाने वैयक्तिक जोड द्यावी, तरच हे उपक्रम यशस्वी होतील आणि अपघाताचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. ‘रिझन’च्या ‘शून्य अपघात’ संकल्पना वास्तवात उतरो हीच सदिच्छा.

सचिन साठ्ये
९१४६८६८४२५
website: reaason.org


अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121