महाराष्ट्रातही वेगाने भाजपची सदस्यसंख्या वाढत असून, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईत आशिष शेलार यांनी कानाकोपर्यात पक्षाचा विस्तार केला आहे. पक्षाच्या आजच्या ४३व्या स्थापना दिनानिमित्ताने सर्व भाजप कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.
भारताचे यशस्वी पंतप्रधान व बलाढ्य नेतृत्व नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डाजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या प्रयत्नाने भाजपची जगभरातील सदस्यसंख्या ही १८ कोटींवर पोहोचली. भाजपने मारलेली ही गगनभरारी ही पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याला अभिमानास्पद व गौरवपूर्ण आहे.आज देशातील १६ राज्यांमध्ये भाजपची सत्ता आहे. या सत्तेच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला सुख-समृद्धी देण्याबरोबरच भाजप संकटात मदत करण्यासाठी कार्यरत आहे. ‘सेवाभावी पक्ष’ अशा जनमानसातील प्रतिमेमुळेच जगभरात भाजपच्या नावलौकिकात सातत्याने वाढ होत आहे. महाराष्ट्रातही वेगाने भाजपचीसदस्यसंख्या वाढत असून, माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यापाठोपाठ प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि मुंबईत आशिष शेलार यांनी कानाकोपर्यात पक्षाचा विस्तार केला आहे. पक्षाच्या आजच्या ४३व्या स्थापना दिनानिमित्ताने सर्व भाजप कार्यकर्ते, हितचिंतक आणि नागरिकांना हार्दिक शुभेच्छा.
देशातील प्रत्येक गरीब व्यक्ती व कुटुंबांपर्यंत विकास पोहोचावा, यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली भाजप प्रयत्न करीत आहे. ‘कोविड’पासून भूकंप आणि पूरपरिस्थितीच्या वेळी सरकारी यंत्रणांच्या खांद्याला खांदा लावून कार्य करणारे भाजप कार्यकर्ते सर्वत्र पाहावयास मिळतात. ‘कोविड’ आपत्तीत रुग्णांवर प्राथमिक उपचारांपासून कुटुंबाला पुरेसे अन्न देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते अथक कार्यरत होते. भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये सामान्यांच्या प्रगतीची कळकळ व आत्मियता दिसून आल्यामुळेच भाजपला २०१४ पासून सातत्याने यश मिळत आहे. यापुढील काळात राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन लक्षात घेता भाजपपुढील जबाबदारी सातत्याने वाढत आहे. आज जगासमोर एक असा भारत आहे, जो कोणत्याही भीती किंवा दबावाशिवाय आपल्या हितासाठी ठाम आहे. जेव्हा संपूर्ण जग दोन विरुद्ध ध्रुवांमध्ये विभागले गेले, तेव्हा भारताकडे मानवतावादावर ठामपणे बोलणारा देश म्हणून पाहिले जात आहे. या काळात नवीन भारत घडविण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांना जनतेचीही साथ मिळत आहे. भाजपनेच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रुपात विश्वगुरूपदी आरूढ होणारे नेतृत्व जगाला दिले आहे, ही अभिमानाची बाब आहे.
भाजप हा भारतातील प्रत्येक हिंदू व्यक्तीची अस्मिता जपणारा एकमेव हिंदुत्ववादी पक्ष आहे. काही पक्षांकडून हिंदुत्ववादी असल्याचा दावा केला जातो. पण, प्रत्यक्षात हिंदूंसाठी भाजपच कायम उभा राहिलेला आहे. भाजपच्या सक्षम नेतृत्वामुळेच अयोध्येतील श्री राम मंदिर साकारले गेले. काशिविश्वनाथ, उज्जैन महाकाल मंदिर कॉरिडोरने नवा अध्याय रचला गेला. देशातील आणखी प्राचीन व भव्य मंदिरांचा विकास केला जात आहे. भारतीयांना सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा देणार्या या स्थानांच्या विकासासाठी भाजपनेच पुढाकार घेतला.जागतिक स्तरावर अनिश्चिततेच्या काळात भारतानेअमृत कालात प्रवेश केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दूरदर्शी, निर्णायक आणि कृती केंद्रित नेतृत्वाखाली देश पुढे चालत असताना, भारताने स्वीकारलेले ‘जी २०’ अध्यक्षपद हा सुयोग आहे.त्यादृष्टीने जगात सर्वोच्च स्थान भारताला मिळवून देण्यासाठी आजच्या भाजप दिनानिमित्ताने प्रत्येक कार्यकर्ता व नागरिकाने संकल्प करावा. महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या महाराष्ट्राची पिछेहाट करण्याच्या कारकिर्दीनंतर राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार स्थापन झाले आहे. राज्याचे कर्तृत्ववान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सातत्याने भाजपने ठरविलेली जनहिताची धोरणे राबविण्यास सर्वोच्चप्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे अडीच वर्षांच्या कालावधीत राज्यात मरगळलेले प्रशासन, उद्योगांना नव्याने उभारी आली आहे.
भाजपच्या ध्येयधोरणांमधून समाजालाही प्रेरणा मिळत आहे. पक्षाचे देशभरात लाखो सक्रिय कार्यकर्ते आहेत.पक्षाच्या सक्रिय कार्यकर्त्यांप्रमाणेच १८ कोटी सदस्यांमध्ये बहुतांशी सामान्य नागरिक आहेत.त्यामुळे जनतेच्या गरजा व अपेक्षांचे प्रतिबिंब हे भाजपच्या कारभारात उमटते. या अपेक्षांना मूर्त स्वरुप देण्याचे कार्य पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात युतीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून केले जात आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र व राज्य सरकारकडून राबविलेल्या विविध योजना समाजातील तळागाळात पोहोचविण्याबरोबरच राष्ट्रभक्तीचा पुरस्कारही केला जात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, काश्मीरपासून कन्याकुमारी आणि कच्छपासून कोहिमापर्यंत भारतीयांना एकत्र करणारा ‘एक भारत श्रेष्ठ भारत’चा संकल्प, कोरोना काळापासून गरजू कुटुंबांना मोफत धान्य, दुर्गम भागासह शहरांमधील घराघरांत ‘हर घर जल योजने’द्वारे पाणीपुरवठा, ‘अटल पेन्शन योजना’, महाराष्ट्रातील शेतकर्यांना वार्षिक १२ हजार रुपये, मोफत घर योजना, शहरातील कुटुंबांना घरासाठी दोन लाख रुपयांचे अनुदान, ‘स्मार्ट सिटी योजना’, ग्रामीण भागातील मजुरांना कामाची हमी देणारी ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’, मोफत उपचारासाठी ‘आयुष्मान भारत योजना’, तरुण व स्वयंरोजगार करणार्या तरुणांसाठी ‘कौशल्य विकास योजना’, गृहिणींसाठी ‘प्रधानमंत्री उज्वला योजना’ आदी योजना भारताबरोबरच आपलीकुटुंबे आर्थिक व सामाजिकदृष्ट्या भक्कम करीत आहे.
स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा कार्यकाळ वगळता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कारकिर्दीत प्रथमच एवढ्या मोठ्या संख्येने जनकल्याणकारी योजनांची अंमलबजावणी सुरू झाली अन् ते केवळ भाजपच्या राजवटीमध्येच शक्य झाले. त्यामुळे प्रत्येक कुटुंबांच्या विकासासाठी भाजपकडे देशाचे नेतृत्व ही सामान्यांची गरज झाली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वामध्येच भारत हा जगातील पाचवी अर्थव्यवस्था झाला. अवघ्या एका दशकापूर्वी ११व्या क्रमांकावर असलेल्या भारताने मोदींच्या नेतृत्वात पाचव्या क्रमांकावर झेप घेतली. जागतिक उत्पादनातील (जागतिक जीडीपी) भारताचावाटा साडेतीन टक्क्यांवर गेला. त्यामुळे देशातील सामाजिक-आर्थिक परिवर्तनात क्रांती आणणारा भारतीय जनता पक्ष हा एकमेव पक्ष ठरला आहे.राज्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमृतकाळातील यंदाच्या अर्थसंकल्पात ‘पंचामृत’ ध्येय ठेवली आहेत. समृद्ध शेतकरी, महिला-आदिवासी-मागासवर्ग-ओबीसींसह सर्व समाजघटकांचा सर्वसमावेशक विकास, पायाभूत सुविधा, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरणपूरक विकासाच्या माध्यमातून समृद्ध व बलाढ्य महाराष्ट्राची उभारणी सुरू होईल.
शेतकर्यांना एक रुपयांत पीकविमा, महिलांना एसटीच्या भाड्यात ५० टक्के, ज्येष्ठ नागरिकांना ७५ टक्के सवलत, आगामी काळात सर्वसमावेशक महिला धोरण, नोकरदार महिलांसाठी ५० वसतिगृहे, निराधार योजनेतील अर्थसाह्यात वाढ, दहा लाख घरांचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम, ‘महात्मा जोतिराव फुले जनारोग्य योजने’त पाच लाखांपर्यंत मोफत उपचार आदींची तरतूद केली आहे. या अर्थसंकल्पामुळे सामान्यांचे जीवन सुखकर होईल. भाजपच्या सत्तेमुळेच हे साध्य झाले.पक्षाच्या स्थापना दिनानिमित्ताने गुरुवार, दि. ६ एप्रिलपासून शुक्रवार, दि. १४ एप्रिलपर्यंत सामाजिक न्याय सप्ताह राबविला जाणार आहे. त्यात गरीब, वंचित नागरिकांबरोबरच दलित नागरिकांसाठी कल्याणकारी उपक्रम राबविले जातील. त्याचबरोबर ठिकठिकाणी स्वच्छता मोहीम राबविण्यात येईल. या माध्यमातूनही जनतेची सेवा करण्याचा पक्षाचा संकल्प आहे. या कार्यक्रमांमध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा.
-आ. अॅड. निरंजन डावखरे