‘सिव्हिल 20’ परिषद आणि विचारमंथन...

    26-Apr-2023
Total Views | 190
 
Civil 20 Conference
 
 
विवेकानंद केंद्र कन्याकुमारी, ठाणे शाखा आणि व्हीपीएम्स जोशी-बेडेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जी 20’ अंतर्गत आज ठाण्यात ‘सिव्हिल 20’ परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. सदर परिषदेतील विषय हे विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदरभाव असे असून हा कार्यक्रम जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या कात्यायन सभागृहात सकाळी 9 ते दुपारी 1 या वेळेत संपन्न होणार आहे. त्यानिमित्ताने हा विशेष लेख...
 
2022च्या अखेरीला भारताकडे ‘जी 20’चे अध्यक्ष पद आल्याची बातमी आली आणि ‘जी 20’विषयी उत्सुकता निर्माण झाली. दि. 1 डिसेंबर, 2022 ते दि. 30 नोव्हेंबरपर्यंत भारत ‘जी 20’ समूहाचा अध्यक्ष राहणार आहे. फेब्रुवारीच्या सुमाराला ‘जी 20’ परिषदेचे प्रतिनिधी विविध शहरांना भेटी देणार म्हणून शहरांचे सुशोभीकरणही झाले आणि ‘जी 20’ भारतातील जनसामान्यांना जवळची वाटू लागली. भारताकडे पहिल्यांदाच ‘जी 20’चे अध्यक्ष पद आल्याने सध्या सगळीकडे एक वेगळाच उत्साह सध्या जाणवतो आहे.
 
काय आहे ‘जी 20’? ‘जी 20’ म्हणजे जगातील 20 देशांचा एक गट. या गटाची स्थापना 1999 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेच्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यासाठी झाली. उदयोन्मुख बाजारपेठ असलेल्या देशांना जागतिक अर्थव्यवस्थेच्या प्रशासनाच्या गाभ्यामध्ये सामावून घेण्यासाठी ‘जी 20’ची निर्मिती झालेली आहे. या 20 देशांमध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय धोरणे तसेच सहकार्य याविषयी नियमित संवाद सुरू झाला. या संवादामुळे आंतरराष्ट्रीय आर्थिक विकास आणि स्थिरता अपेक्षित आहे. ‘जी 20’चे सदस्य देश आहेत - अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, युरोपियन युनियन, फ्रान्स, जर्मनी, भारत, इंडोनेशिया, इटली, जपान, मेक्सिको, रशिया, सौदी अरेबिया, दक्षिण आफ्रिका, कोरिया प्रजासत्ताक, तुर्की, युनायटेड किंगडम आणि युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका.
 
याखेरीज काही देशांना शिखर परिषदेत निमंत्रित केले जाते. यावर्षी अतिथी देश म्हणून संयुक्त अरब अमिराती, बांगलादेश, इजिप्त, मॉरिशस, नेदरलॅण्ड्स, नायजेरिया, ओमान, सिंगापूर आणि स्पेनला आमंत्रित केलेले आहे. संयुक्त राष्ट्र संस्था, जागतिक आरोग्य संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा आंतरराष्ट्रीय संघटनांचे प्रमुखदेखील परिषदेसाठी निमंत्रित असतात.
 
माजी आणि आगामी ‘जी 20’ अध्यक्षांच्या साहाय्याने ‘जी 20’चे वर्तमान अध्यक्ष सर्व कार्यवाही पार पाडतात. इंडोनेशिया आणि ब्राझील यांच्या समवेत यावर्षी भारत अशीच जबाबदारी पार पाडत आहे.
 
जगातील निम्म्याहून जास्त लोकसंख्या या 20 देशात सामावलेली आहे. तसेच, जागतिक व्यापारातील जवळपास तीन चतुर्थांश व्यापार या देशात चालतो, तर वैश्विक ‘जीडीपी’मध्ये जवळपास 85 टक्के सहभाग ‘जी 20’ सदस्यांचा आहे, हे लक्षात घ्यायला हवे.
 
‘जी 20’ची सुरुवात आर्थिक विषयांपासून झाली. परंतु, हळूहळू व्यापार, जागतिक तापमान वाढ, विकास, ऊर्जा, स्वास्थ्य, कृषी, पर्यावरण, भ्रष्टाचार विरोध इत्यादी विषयांवर चर्चा व संवाद होऊ लागला.
 
यावर्षीच्या चर्चेचे विषय असतील - भ्रष्टाचारविरोध, पर्यावरण, जागतिक तापमान वाढ, डिजिटल अर्थव्यवस्था, रोजगार, संस्कृती, ऊर्जा संक्रमण, आपत्ती व्यवस्थापन, आरोग्य, समग्र विकास, व्यापार आणि गुंतवणूक, कृषी, प्रेक्षणीय स्थळे, शिक्षण. ‘जी 20’मध्ये होणार्‍या चर्चांना आणि निर्णयांना पाठबळ पुरवण्यासाठी वेगवेगळ्या समूहांची स्थापना केली जाते. ‘बिझनेस कम्युनिटी- ’इ 20’, सिव्हिल सोसायटी- ’उ 20’, लेबर युनियन- ’ङ 20’, सायंटिस्ट- ’ड 20’, थिंकटँक- ’ढ 20’, अर्बन सिटी- ’ण 20’ आणि युथ- ’ध 20’ इत्यादी समूहांची स्थापना करण्यात आली आहे.
 
या अनेक गटातील ‘सी 20’ हा एक गट आहे, जो जगभरातील नागरी संस्था संघटनांना एक व्यासपीठ उपलब्ध करुन देतो, त्यांच्या पुढील समस्या, त्यांचे संकल्प, त्यांच्या आशाआकांक्षा जागतिक नेत्यांपर्यंत पोहोचवतो. सामान्य जनतेच्या चिंतांना, समस्यांना जागतिक पातळीवर पोहोचवण्यासाठी, त्याचे उत्तर शोधण्यासाठी व निराकरण करण्यासाठी हा मंच काम करतो. सामाजिक आणि आर्थिक विकासाच्या जागतिक दृष्टिकोनात जनसामान्यांचे प्रतिबिंब उमटावे यासाठी ‘सी 20’ प्रयत्न करतो. यावर्षी ‘सी 20’ मध्ये माता अमृतानंदमयी विश्वविद्यापीठ यांच्या अध्यक्षतेखाली रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी, युथ फॉर सेवा, विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि इतर अनेक संस्था काम करत आहेत.
 
सर्व विविधता व मतभेद लक्षात घेऊनदेखील आपण सारे एक आहोत, हे विश्व एक आहे आणि जीवनाचा, विकासाचा अधिकार प्रत्येकाला आहे, असा विश्वास आणि व्यवहार ठेवला तरच जीवन सुखद आणि कल्याणकारी होणार आहे, असे भारतीय संस्कृती मानते. प्रत्येकाच्या अस्तित्वाचा अधिकार, परंपरांचे पालन करण्याचा अधिकार, संस्कृतीचा अधिकार, विकासाच्या संधींचा अधिकार, विकास प्रक्रियेत सहभागी होण्याचा अधिकार मान्य करत ‘सी 20’चे काम सुरू आहे.
 
2022च्या ‘सी 20’ परिषदेत असे लक्षात आले होते की, वैश्विक समस्यांवर उपाय शोधायचा असेल, त्याच्यावर काही कार्यवाही करायची असेल, तर संघटन आवश्यक आहे. जगभरातील विविध संस्था, गट एकत्र येणे आवश्यक आहे. सत्ता संतुलन, संस्कृतीतील विविधता, विविध सिद्धांत या सर्वांपेक्षा जास्त महत्त्वाचा आहे ते एक विश्व म्हणून आपण सगळे जोडलेले आहोत हा विचार आणि तथ्य, परस्परांशी संबंधित असलेल्या अस्तित्वाच्या एकात्मतेचे सत्य. म्हणूनच यावर्षीचे ‘जी 20’ बोधवाक्य आणि बीजमंत्र आहे ‘वसुधैव कुटुम्बकम्.’ विश्व एक परिवार आहे. एक पृथ्वी, एक परिवार आणि एक भविष्य. जगभरातील विविधता आणि समावेशकतेला परस्पर सन्मानाचा आधार असेल, तरच मानवी समाजात शांतिपूर्ण सहअस्तित्व शक्य आहे.
 
2022च्या ‘सी 20’चे बोधवाक्य होते,‘रिकव्हर टुगेदर.’ ‘मी आणि ते’ असा दृष्टिकोन न ठेवता ‘मी आणि आम्ही’ अशा दृष्टीने जगाकडे पाहिले, तर सगळाच समाज बलशाली होऊ शकेल, विकास करू शकेल.
 
भारतीय संस्कृतीत समाजाला महत्त्व आहे. लोकसहभागाला महत्त्व आहे. सर्वांचा मिळून विकास होईल, तर समाजाचे कल्याण होईल, यावर आमचा विश्वास आहे. राजकीय शक्तीपेक्षाही समाज बलशाली आहे, आत्मनिर्भर आहे. राज्य, समाज, बाजारपेठ, कुटुंब आणि व्यक्ती यांच्यातील परस्पर संबंध, त्यातील विविधता आणि सहयोग, एकमेकांविषयी उदार दृष्टिकोन यावर ’‘सी 20’ काम करत आहे.
 
स्वयंसेवी सामाजिक संघटना, संस्था हा या कामातील अत्यावश्यक बिंदू आहे. ‘समाज माझा आहे,’ ही भावना विकसित झाली पाहिजे. आपुलकी आणि नि:स्वार्थ सेवा ही स्वयंसेवी संस्थांच्या कामाचे समाजावर सकारात्मक परिणाम होण्यासाठी आवश्यक आहे. सगळी जबाबदारी केवळ सरकारवर न टाकता, प्रत्येक व्यक्ती जर का राष्ट्रीय कल्याण ही आपली जबाबदारी आहे, असे लक्षात घेईल, तर निश्चितच आपण विकासाच्या दिशेने अनेक पावले पुढे जाऊ.
 
भारतातील नागरी समाज संस्कृती महात्मा बसवेश्वर, दयानंद सरस्वती, रामकृष्ण परमहंस, ईश्वरचंद्र विद्यासागर, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महान व्यक्तिमत्त्वांनी आकाराला आणलेली आहे. अनेक संस्था, संघटनांनी स्वयंप्रेरित प्रयत्नांचा पाया घातलेला आहे. स्वातंत्र्योत्तर भारतात ही परंपरा पुढे चालू ठेवत विनोबा भावे, महर्षी कर्वे, बाबा आमटे आणि सुंदरलाल बहुगुणा यांनी स्वयंसेवी संस्था संघटनांचा वारसा दिलेला आहे.
 
‘उ 20 खपवळर 2023’ चा लोगो आशा, स्वयंप्रेरणा आणि नि:स्वार्थ सेवेच्या ज्योतीचे प्रतीक आहे. ’र्धेी रीश ींहश श्रळसहीं’ हे ’उ 20 खपवळर 2023’चे बोधवाक्य आहे. हे वाक्य म्हणजे नागरी समाजातील प्रत्येक सदस्याला एकत्र येण्याचे, स्वतःचा कल्याणकारी मार्ग तयार करण्याचे, समस्यांवर उपाय शोधण्याचे आणि सामूहिक प्रयत्न करण्याचे आवाहन आहे. लोकांच्या दैनंदिन जीवनाला स्पर्श करणार्‍या सामाजिक आणि आर्थिक बाबींचे निराकरण करण्यावर ‘सी 20’ भर देईल ज्यात शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, तंत्रज्ञान आणि सेवेची भावना यांचा समावेश असेल. ’सी 20 इंडिया’ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नागरी सामाजिक संस्था आणि संघटनांच्यासोबत नियमित सल्लामसलत करेल. नागरी समाजाच्या आवाजाचे आणि आकांक्षांचे पुरेसे प्रतिनिधित्व व्हावे, यासाठी नियमित संवाद असेल. समाजाच्या विविध क्षेत्रात आणि थरात काम करणार्‍या संघटना समाजाची नस ओळखू शकतात आणि म्हणूनच त्यांचे मत महत्त्वाचे ठरते. विविध क्षेत्रांत काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था-संघटनांशी चर्चा करून मुद्दे सुनिश्चित होतील आणि मग सगळ्यांचा एकत्र सारांश ‘सी 20’ परिषदेत जुलै 2023 मध्ये सादर होईल. ‘सी 20’च्या धोरण शिफारसी वर ‘जी 20’ काम करेल, आपल्या धोरणांची दिशा ठरवेल.
 
या वर्षी 12 विषय निवडण्यात आलेले आहेत. Integrated holistic health, Mind, body and environment, Sustainable and resilient communities, Climate environment and net zero targets, Education and digital transformation, Gender equality and disability, Technology, Security and transparency, Lifestyle for environment, Preservation and conservation of traditional arts, craft and culture, Traditional and innovative ways of livelihood and employment, Human rights as human values, Revival of rivers and water management, Seva -sense of service, Philanthropy and volunteerism, Vasudeva kutumbakam- world is one family, Diversity, inclusion and mutual respect, SDG 16 + and promoting civic space, Delivering democracy, retrospect and prospects, Disability, equity and justice असे ते 12 विषय आहेत. विविध संस्था त्या विषयांचा अभ्यास आणि विचार करत आहेत.
 
विवेकानंद केंद्र, कन्याकुमारी ही संस्था भारतातील ‘सी 20’चा प्रमुख सभासद आणि काम करणारा गट आहे. ‘वसुधैव कुटुम्बकम्’ आणि विविधता, समावेशकता आणि परस्पर आदर या मुद्द्यांवर विवेकानंद केंद्र अभ्यास आणि काम करीत आहे.
याचाच एक भाग म्हणून विवेकानंद केंद्रातर्फे देशभरात 120 ठिकाणी विविध सामाजिक संस्था, संघटनांना बोलावून त्यांचे विचार, त्यांचे काम, त्यातील अडचणी आणि यश समजावून घेतले जाणार आहे. त्याची माहिती एकत्रित केली जाणार आहे. या सर्व परिषदांतून व्यक्त होणार्‍या विचारांचा सारांश ‘जी 20’ समूहाला सादर होईल आणि वैश्विक स्तरावर या सारांशाचा विचार होईल. त्यातील जे विचार आणि मार्ग ‘जी 20’ परिषदेत मान्य होतील, ते या 20 देशांतील सामाजिक संस्थांद्वारे त्या त्या देशांत राबवण्यात येतील. ठाण्याला अशी एक परिषद आयोजित करण्याचा बहुमान मिळाला आहे. ठाणे येथे विवेकानंद केंद्र आणि व्हीपीएम्स जोशी-बेडेकर कला व वाणिज्य महाविद्यालय, ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवार, दि. 27 एप्रिलला एक ‘सी 20’ परिषद आयोजित करण्यात आली आहे.
 
Diversity, Inclusion and Mutual respect (विविधता, सर्वसमावेशकता आणि परस्पर आदर) ही त्याची संकल्पना आहे. विविधता आणि सर्वसमावेशकतेला जर का परस्पर सन्मानाचा पाया असेल, तरच शांततापूर्ण कल्याणकारी सहअस्तित्व शक्य आहे, हा या परिषदेमागचा विचार आहे. या परिषदेसाठी विविध विषयांत काम करणार्‍या संस्था, संघटनांना आमंत्रित करण्यात आले आहे. या सर्व संस्थांना जागतिक स्तरावर आपले विचार पोहोचवण्याची ही एक संधी यानिमित्ताने मिळत आहे.
भारताला अध्यक्षपद मिळाल्याने ‘जी 20’विषयी जनसामान्यांना आपुलकी वाटतेच आहे आणि आता ‘सी 20’च्या निमित्ताने जनसामान्यांच्या जीवनाचे, समस्यांचे आणि आशा आकांक्षांचे प्रतिबिंब ‘जी 20’ समूहासमोर उमटणार आहे. हे एक आश्वासक पाऊल आहे.
 
 
- वृंदा टिळक
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121