मुंबई : २०१४ मध्ये मुख्यमंत्री झाल्यापासूनच देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् करण्याचे काम करत आहेत. २०१४ मध्ये लोकसहभागातून सुरु केलेल्या जलयुक्त शिवार योजनेने महाराष्ट्रातील अनेक गावांना दुष्काळाच्या दृष्टचक्रातून बाहेर काढले आहे. त्यातच आता आणखी एका मोठ्या प्रकल्पाची भर पडली आहे.
गुरूवार, २६ ऑक्टो. रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते निळवंडे धरणाचे जलपूजन आणि कालव्याचे लोकार्पण करण्यात आले. निळवंडे धरणाच्या या प्रकल्पाला १९७० मध्ये मंजुरी मिळाली होती. ९ वर्षांनंतर प्रकल्पाचे स्थलांतर करण्यात आले पण ५३ वर्षाच्या प्रतीक्षेनंतर आता धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याचा शुभारंभ झाला आहे.
नगर जिल्ह्यातील दुष्काळी भागासाठी धरण बांधण्यात यावं अशी मागणी १९७० दरम्यान पुढे आली होती. त्यानंतर निळवंडे धरणाला १९७७ साली मंजूर देण्यात आली होती. मात्र १९७७ ते १९९१ पर्यंत धरणाची जागा निश्चित झालेली नव्हती. ज्याठिकाणी जागा निश्चित होत होती, तिथे प्रंचड विरोध होत होता. अकोला तालुक्यातील निळवंडे परिसरात १९९१ साली धरण बांधण्यात सुरूवात झाली आणि २०१२ साली या धरणाचं बांधकाम पूर्ण झालं.
मात्र या धरणातील पाण्याचा योग्य तो उपयोग करण्यासाठी बांधण्यात आलेल्या कालव्याचं काम पूर्ण होण्यासाठी २०२३ उजडावे लागले. मधल्या काळात विविध गोष्टींची कमतरता असल्याने या कालव्याचं बांधकाम रखडले होते. मात्र आज महाष्ट्रातील युती सरकारच्या प्रयत्नाने डाव्या कालव्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उजव्या कालव्याचे बांधकाम सुद्धा अंतिम टप्यात आले आहे. या कालव्याचे काम देखील लवकरच पूर्ण होईल.
या कालव्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहाता, राहुरी आणि कोपरगावसह नाशिक जिल्ह्यातील १८२ गावांना वरदान ठरणार आहे. या धरणामुळे आणि दोन कालव्यांमुळे १८२ गावातील ६८००० हेक्टर जमिन सिंचनाखाली येणार आहे.