'अफजल खानला मारण्यास शिवरायांनी वाघनखे वापरली नाहीत' जितेंद्र आव्हाडांचा खळबळजनक दावा!

    01-Oct-2023
Total Views | 563
NCP MLA Jitendra Awad On Waghnakh

मुंबई :
राज्य सरकारने छत्रपती शिवरायांची वाघनखे इंग्लंडच्या व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयातून आणण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे आ. जितेंद्र आव्हाड यांची एक पोस्ट चर्चेत आली आहे. या पोस्टच्या माध्यमातून जितेंद्र आव्हाडांनी अजब दावा केला आहे. यापोस्टमध्ये आव्हाडांनी इतिहासकार गजानन मेहंदळेंचा दाखला दिला आहे.

जितेंद्र आव्हाडांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गजानन मेहंदळे या थोर इतिहासकाराने आपल्या श्री राजा शिवछत्रपती या पुस्तकामध्ये पान क्र. १२३८ वर स्पष्टपणाने लिहिलं आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खान ला मारण्यासाठी वाघनखे वापरली हे कुठेही स्पष्ट होत नाही. म्हणजे त्याचा अर्थ असा निघतो की, अफजल खान ला मारताना छत्रपती शिवाजी महाराजांनी वाघनखे वापरलीच नाहीत, असे आव्हाडांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता गजानन मेहंदळे हे सरकारचे मार्गदर्शक आहेत. सरकार ह्यावर काही विशेष टिपण्णी करेल का, असेही आव्हाड म्हणाले. तसेच, आव्हाडांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आल्याचं पहायला मिळत आहे.

अग्रलेख
जरुर वाचा
अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

अनुसूचित जाती-जमातींना सरसकट १३ आणि ७ टक्के आरक्षणाची शिफारस करणार; अनुसूचित जाती जमाती आयोग; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत निर्णय

महाराष्ट्र शासनाने ज्या पद्धतीने इतर मागासवर्ग समाजाला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये २७ टक्के आरक्षण दिले आहे, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातींकरिता सर्व महानगरपालिका, नगर पालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये सरसकट १३ व ७ टक्के आरक्षण द्यावे, अशी शिफारस राज्य शासनाकडे करण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाच्या उपाध्यक्ष धर्मपाल मेश्राम यांनी मंगळवार, दि. १० जून रोजी याबाबत माहिती दिली...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121