तमिळनाडूतून नव्या विंचवाच्या जातीचा शोध!

पश्चिम घाटातल्या अगस्त्यामलाई शिखरावरुन नामकरण.

    22-Jun-2022
Total Views | 56
\scorp1
 
  
 
 
 
मुंबई(प्रतिनिधी): तमिळनाडूमधून नव्या विंचवाच्या प्रजातीचा शोध लावण्यात आला आहे. नव्याने सापडलेली प्रजाती ही हॉरमुरीडी कुळातल्या चिरोमॅचेटस या जातीमधील आहे. या बाबतचा शोधनिबंध हा निबंध दि. २२ जून रोजी अमेरिकेच्या मार्शल विद्यापीठाच्या 'युस्कॉर्पिअस' या आतंरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित करण्यात आला आहे. ठाकरे वाईल्डलाईफ फाउंडेशनच्या अक्षय खांडेकर; तेजस ठाकरे; स्वप्निल पवार; सत्पाल गंगलमाले; आणि विवेक वाघे यांनी संयुक्त पणे हा शोध लावला आहे.
 
 
'अगस्त्यामलाई' शिखराजवळ हा विंचु आढळून आला म्हणून त्याचे नामकरण (चिरोमॅचेटस अगस्त्यामलाएनसीस) असे करण्यात आले आहे. ही जाती चिरोमॅचेटस जात ही भारतीय द्विपल्कासाठी प्रदेशनिष्ठ असून त्यात आतापर्यंत पाच प्रजाती विज्ञानाला ज्ञात होत्या, आता नव्याने शोध लागलेल्या प्रजातीमुळे ही संख्या सहावर गेली आहे. पाच मधील तीन प्रजाती या महाराष्ट्र, एक केरळ, आणि एक आंध्रप्रदेश मधून ज्ञात होत्या, तमिळनाडूत 'चिरोमॅचेटस' या जातीची ही पहिलीच नोंद आहे. ही जाती तमिळनाडूमधील तिरुनेवेली जिल्ह्यातील अगस्त्यामलाई शिखराजवळ समुद्रसपाटीपासून ९०० ते ११५० मीटर उंचीवर एप्रिल २०२१ मध्ये आढळून आली होती. या प्रजातीच्या नमुन्यांवर साधारण वर्षभर संशोधन केल्यानंतर ही प्रजाती अगोदर ज्ञात असलेल्या कुठल्याही प्रजाती पेक्षा वेगळी असल्याचे लक्षात आले. आणि नंतर त्यासंबंधीचा संशोधन निबंध सादर करण्यात आला. आतंरराष्ट्रीय विंचुतज्ञानी सदर संशोधनाबाबतची पडताळणी करून पुष्टि केल्यानंतर हा निबंध २२ जून रोजी अमेरिकेच्या मार्शल विद्यापीठाच्या युस्कॉर्पिअस या आतंरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतून प्रकाशित करण्यात आला.
 
 
रंग, नांगीच्या विविध भागांच्या लांबी आणि रुंदी यांची गुणोत्तरे, पेक्टीनल टीथची संख्या यासह इतर अनेक वैशिष्ट्यांसह ही प्रजाती आपल्या जातीतील इतर प्रजातीपेक्षा वेगळी ठरते. नवीन प्रजाती इतर विंचवांप्रमाणेच निशाचर असून ती अगस्त्यामलाई डोंगरात सदाहरित प्रकारच्या जंगलातील मोठाले दगड आणि खडकांच्या कपरींमध्ये आढळून येते. पश्चिम घाट जैवविविधतेने संपन्न असून मागील अनेक दशकांपासून संशोधकांची मोठी फळी यावर काम करीत आहे, पण अजूनही विज्ञानाला माहित नसलेल्या प्रजातींचा शोध लागत आहे. या मुळे पश्चिम घाट आणि एकूणच भारतीय पर्यावरणीय संशोधनाची गरज मोठी आहे, हेच अधोरेखित होते.
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121