मानसिक आजार आणि होमियोपॅथीची व्याप्ती भाग-७

    08-Feb-2022
Total Views | 84

homeopathy
 

जर आपण सर्वांच्या वाईट गोष्टींनाच पाहत राहिलो, तर कधीही आपण लोकांना जोडू शकत नाही. त्यामुळे लोकांमधील चांगले गुणधर्मच पाहणे, ही सकारात्मकता! लोकांशी लबाडी न करता वागणे हीच सकारात्मकता! 
 
मानवी मनाची भीती किंवा नकारात्मकता दूर करण्यासाठी मनाच्या सामर्थ्याची व सकारात्मक विचारांंची फार आवश्यकता असते. आता सकारात्मक विचार करणे म्हणजे काय? सकारात्मक विचार करणे म्हणजे ‘डे ड्रिमिंग’, हवेत इमले बांधणे नव्हे. सकारात्मक विचार म्हणजे त्या-त्या वेळच्या परिस्थितीला अनुसरून केला गेलेला चांगला विचार! म्हणजेच समोर असलेल्या व सुखद नसलेल्या घटनांचा वा घडामोडींचा सदसद्विवेक बुद्धीने केला गेलेला विचार व प्रत्येक अडथळ्यातून सकारात्मक मार्ग काढण्याची इच्छाशक्ती म्हणजेच ‘पॉझिटिव्ह थिंकिंग.’ म्हणजे यातही मन-बुद्धी-इच्छाशक्ती व सदसद्विवेकबुद्धी यांचा योग्य प्रकारे केला गेलेला वापर हे सकारात्मकतेचे मुख्य गमक आहे. प्रत्येक गोष्टीमध्ये चांगली गोष्ट शोधणे हीच सकारात्मकता! उदाहरणार्थ, आपल्याला जगात अनेक प्रकारची माणसे भेटत असतात. प्रत्येक माणसाचा स्वभाव हा वेगळा असतो. अनेक प्रकारच्या व्यक्ती आणि वल्ली आपल्या नजरेस पडतात. प्रत्येक माणूस हा परिपूर्ण अजिबात नसतो. प्रत्येकात काहीना काहीतरी उणिवा किंवा दोष असतातच. त्याचप्रमाणे प्रत्येकात काहीना काहीतरी चांगल्या गोष्टीदेखील असतात. जर आपण सर्वांच्या वाईट गोष्टींनाच पाहत राहिलो, तर कधीही आपण लोकांना जोडू शकत नाही. त्यामुळे लोकांमधील चांगले गुणधर्मच पाहणे, ही सकारात्मकता! लोकांशी लबाडी न करता वागणे हीच सकारात्मकता! इतर लोकांची लबाडी कळण्याइतपत सतर्कता असणे म्हणजेच सकरात्मकता असणे होय. आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून चांगल्या गोष्टी अनुभवणे ही देखील सकारात्मकताच! ज्यावेळी एखादा माणूस सतत काहीना काही कारणांनी इतरांना दोष देत असतो किंवा नावे ठेवत असतो, त्यावेळी आपण समजून जायचे की, ते सर्व गुण त्या माणसामध्ये कुठेतरी आतमध्ये खोलवर गेलेले आहेत. म्हणूनच समाजाला आपण सुधारायला जाऊ नये. सुधारायचे असेल तर सुधारण्याची प्रक्रिया ही प्रथम स्वतःपासून सुरू करावी. स्वतः सुधारण्याचा प्रामाणिक प्रयत्न तर प्रत्येकाने केला, तर आपोआपच सर्व समाज सुधारेल, यालाच ‘सकारात्कता’ म्हणतात.
 
आता आपण हे सकारात्मक विचार कसे काय आणायचे? तर स्वतःशी बोलूनच ते आणता येतात.
प्रत्येक माणसाच्या मनात सतत चांगले व वाईट विचार सतत येत असतात. चांगले विचार किंवा वाईट विचार हे आपोआप येत असतात, पण जेव्हा आपण स्वतःशी बोलतो, तेव्हा आपले विचार हे ‘लॉजिक’ आणि ‘रिझनिंग’शी निगडित असले तरल मात्र ते सकारात्मक असतात व जर हे विचार कुठल्या तरी संकल्पना मनात धरून केलेले असतील, तर ते कदाचित नकारात्मक होऊ शकतात. म्हणूनच सकारात्मक विचार करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे समाजाला ओळखण्यापेक्षा स्वतःला आधी नीट ओळखणे. ’First you understand yourself then only you can understand others.’ यापुढे आपण याबाबतच माहिती पाहूया.
- डॉ. मंदार पाटकर
(लेखक एमडी होमियोपॅथी आहेत.)
९८६९०६२२७६
अग्रलेख
जरुर वाचा
भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

भारतीय जनता पार्टी द्वारे शासकीय दाखले शिबिर संपन्न

वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील दहावी व बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना विविध शासकीय दाखल्यांची अत्यंत गरज भासत असते. त्यासाठी त्यांना व त्यांच्या पालकांना शासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. वसई तहसीलदार ऑफिसला जाणे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शक्य होत नसल्याने ही गैरसोय टाळण्यासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे वसई तहसील कार्यालयाकडील उत्पन्न दाखले, अधिवास दाखले, क्रिमिलेअर दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले, रेशन कार्ड ऑनलाइन करून घेणे अशा विविध कामकाजाचे शिबिर शनिवार १४ जून रोजी कातकरीपाडा, चंदनसार..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121