‘जनजाती कल्याण आश्रमा’ची वाटचाल

    25-Dec-2022
Total Views |
जनजाती कल्याण आश्रम


आज महाराष्ट्रात ज्याला ‘जनजाती कल्याण आश्रम’ असे म्हटले जाते, त्याचेच अखिल भारतीय स्तरावर ‘वनवासी कल्याण आश्रम’ हे नाव आहे. या जनजाती कल्याण आश्रमाची वाटचाल, स्थापनेपासूनचा इतिहास आपण संक्षिप्तपणे लक्षात घेण्याचा प्रयत्न या लेखात करीत आहोत.


‘वनवासी कल्याण आश्रमा’ची स्थापना


आता ‘वनवासी कल्याण आश्रम’ स्थापनेला ७० वर्षे झाली आहेत. या प्रदीर्घ वाटचालीत वनवासी कल्याण आश्रमाचा विकास कसा झाला, त्याला कोणकोणत्या प्रतिकूल परिस्थितीला तोंड द्यावे लागले, वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांची तपस्या आणि त्याग या बळावर आपले स्वतंत्र स्थान ‘वनवासी कल्याण आश्रम’ कसे निर्माण करू शकला आणि वनवासी समाज आणि या भारत राष्ट्रावर, महाराष्ट्रावर त्याचा केवढा प्रभाव पडला हे जाणून घेणे उपयुक्त ठरणार आहे.तत्कालीन मध्यप्रांत आणि बरारमध्ये सन १९४७च्या मुख्यमंत्री यांच्या जशपूर क्षेत्रातून झालेल्या प्रवासात त्यांना राष्ट्रविरोधी शक्ती यांच्याबरोबर सामना करावा लागला, हा त्यांनी दिलेला सामना अचानक आणि अकल्पनीय होता. या समस्येच्या निवारणासाठी यांच्या मार्गदर्शनाने एक शासकीय योजना तयार करण्यात आली होती. त्यासाठी मागासवर्गीय यांच्यासाठी कल्याण विभागाचा प्रारंभ सुरू करण्यात आला होता. त्याचे प्रांत संचालक होते ठक्कर बाप्पांचे शिष्य आणि श्रेष्ठ कार्यकर्ते पांडुरंग गोविंद वणीकर.

जशपूरच्या समस्याग्रस्त आणि उग्र विरोधी वातावरणासाठी कार्यकुशल होते आणि परत राष्ट्रभक्तीने भारलेल्या व्यक्तीची नियुक्ती करणे, त्यासाठी आवश्यक होते. त्यांच्या परिचयाचे रमाकांत के. देशपांडे, अधिवक्ता, या कार्यासाठी सर्वार्थाने सुयोग्य होते. त्यांना उलट आग्रहपूर्वक या वनवासी क्षेत्रात काम करण्यासाठी नियोजित केले होते.बाळासाहेब देशपांडे म्हणजेच रमाकांत केशव देशपांडे. बाळासाहेब देशपांडे हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा संघचालक होते. त्यावेळी तहसील संघचालक उपाधी होती. गांधी वधानंतर संघावर अकारण बंदी लावली गेली होती. बाळासाहेब देशपांडे त्यावेळी अटकेच्या वॉरंटची प्रतीक्षा करत होते. परंतु, शासनाने त्यांना क्षेत्रीय अधिकारी म्हणून नियुक्तीपत्र दिले. यावरून हे लक्षात येते की, संघावर प्रतिबंध याचा उद्देश घोषित, आरोपापेक्षा वेगळाच होता. बाळासाहेब देशपांडे यांनी संघाचे प्रचारक रामभाऊ जामगडे यांच्याकडून हे शासकीय कार्य करण्याची अनुमती मिळवली होती. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनासाठी त्यांना कारावास भोगावा लागला. आपल्या विद्यार्थीदशेतच त्यांनी रामकृष्ण, विवेकानंद यांच्या विचारांच्या अनेक ग्रंथांचे अध्ययन केले होते. यावरून त्यांच्या कार्याची पार्श्वभूमी आपल्या सहज लक्षात येते.
बाळासाहेब देशपांडे यांनी शासनाकडून स्वीकारलेल्या योजनांपेक्षा दसपट, बारापट योजना यशस्वी करून दाखविल्या. त्यामुळे वणीकर आणि इतर सर्व आश्चर्यचकित झाले. अनेक विरोधाला आणि अडथळ्यांना न जुमानता बाळासाहेबांनी हे कार्य पूर्ण केले. वयोवृद्ध ठक्कर बाप्पा यांनी १९४९ मध्ये जयपूरच्या दुर्गमक्षेत्रात प्रवास केला आणि हे बाळासाहेबांचे कार्य पाहून समाधान व्यक्त केले.आता ‘भारत माता की जय’ ही घोषणा दुमदुमू लागली. ख्रिश्चन मिशनर्‍यांच्या राष्ट्रविरोधी कारवाया यांना त्यांनी बंद केले होते. परंतु, दुर्भाग्य म्हणजे सरदार वल्लभाई पटेल आणि ठक्कर बाप्पा यांचे देहावसान झाले आणि राष्ट्रविरोधी तत्त्वांना मोकळीक मिळाली. याचा परिणाम म्हणजे बाळासाहेब देशपांडे यांच्या कार्याला पुन्हा विरोध होऊ लागला. तेव्हा शासकीय सेवेत राहून राष्ट्रासाठी हितकारक काम करता येणार नाही, म्हणून १९५२ मध्येचत्यांनी शासकीय सेवेचे त्यागपत्र दिले आणि जशपूर येथेच त्यांनी बाळासाहेबांनी वकिली सुरू केली. त्याचबरोबर वनवासी क्षेत्राच्या गरजेनुसार कार्य करण्याची योजनाही त्यांनी तयार केली.

संघाचे खंडवा विभागाचे प्रचारक डॉ. हेडगेवार यांच्या तालमीत तयार झालेले स्वयंसेवक मोरूभैया केतकर यांनी त्यांच्याबरोबर ऑक्टोबर १९५२ मध्ये काम सुरू केले. बाळासाहेब देशपांडे यांच्या कार्यात साहाय्यक म्हणून ते जशपूर नगरला आले. दि. २६ डिसेंबर,१९५२ ला या केतकर, बाळासाहेब देशपांडे यांच्यासह राजा विजय भूषण सिंह देव यांच्या पुरातन राजमहालात धार्मिक विधीबरोबरच पाचवीपर्यंतच्या वर्गाची, माध्यमिक पाठशाळा आणि छात्रावास सुरू झाला.ही होती वसतिगृहाची सुरुवात. पहिल्याच वर्षी फक्त १२ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. या संस्थेचे नामकरण ‘राजा साहेबांची अगुबाई’ आणि नव्या महालाच्या सभेत उपस्थित निमंत्रित नागरिकांनी सर्वानुमते नाव ठरवले ‘कल्याण आश्रम.’ यावेळी जशपूरमध्ये दहा-बारा मिशनर्‍यांची केंद्रं होती. साधारणपणे २०० नन आणि पाद्री होते. त्यात ४०-५० विदेशी होते. गावोगावात त्यांचे कार्यकर्ते होते. जवळपास १५० मान्यताप्राप्त व अन्य शाखा त्यांच्या होत्या. अनेक वाहने त्यांच्या दिमतीला होती. त्यातून तेल, दूध पावडर, धान्य वाटप होत होते. त्यांचे सुमारे दहा छात्रावास होते. एक मोठे हॉस्पिटल होते.
या तुलनेत आपल्या वनवासी कल्याण आश्रमाच्या शाळेत फक्त १२-१३ मुले होती, त्यांच्या देखरेखीसाठी केवळ दोनच व्यक्ती होत्या. आणि बाळासाहेब त्यांना वकिली करून जी प्राप्ती मिळत होती, त्यातला काही अंश ते आश्रमाच्या कार्यासाठी देत असत. कधी कधी केतकर हे तर माघारी परतण्याचा विचार करत होते. परंतु, दैवी प्रेरणा आणि आत्मिक बल यामुळे ते जशपूरलाच ठाम राहिले. जशपूरलाच ठाम राहिले आणि संघटन शक्ती, शुद्ध आध्यात्मिक प्रेरणा आणि उच्च आदर्श त्यांनी बाळगल्यानेच, खरे कार्य फुलते,हे वनवासी कल्याण आश्रमाच्या कार्याने सिद्ध केले.एके दिवशी राजेसाहेब यांनी बाळासाहेब देशपांडे आणि आणि मोरूभैया केतकर यांना घरी बोलावले आणि आश्रमाच्या कार्यासंदर्भात माहिती घेतली. एखाद्या व्यक्तीला किती दान देता आले पाहिजे, यावर चर्चा होती. बाळासाहेब देशपांडे सहज उद्गारले, आपल्या उत्पन्नाचा दहावा हिस्सा दिला पाहिजे. यावर मग राजेसाहेब म्हणाले, “मला जे प्रीविपर्स मिळते, त्याचा दहावा हिस्सा यापुढे कल्याण कार्याला मी देईन.” वस्तुत: राजेसाहेब हेच कल्याण आश्रमाचे पहिले दानदाता होते. यानंतरच कल्याण आश्रमाच्या कार्यकर्त्यांनी बाहेरून दान निधी देणगी प्राप्त करण्यास सुरुवात केली.


भवानीशंकर नियोगी तपास आयोग\



१९५४च्या मे महिन्यात मध्य प्रांत आणि बरार विधानसभामध्ये एका तपासणी आयोगाची सदस्यांनी मागणी केली. ख्रिश्चन मिशनरी यांच्या कारवायांसंदर्भात गंभीर आक्षेप बहुतेक सदस्यांनी व्यक्त केले होते. त्यांच्या या हालचालीच्या तपासणीसाठी विद्वान व प्रसिद्ध जस्टीस भवानी शंकर नियोगी यांच्या अध्यक्षतेखाली तपासणी समितीनिर्माण केली. त्यात काही काँग्रेस आणि एक ख्रिश्चन सदस्य होता. प्रारंभी मिशनरी यांनी आयोगाला सहयोग दिला. पण नंतर ही तपासणी आयोगाची आपल्या विरोधात जाईल व आपल्यालाच बाधक होईल म्हणून त्यांनी सहयोग बंद केला.वनवासी कल्याण आश्रमामध्ये प्रविष्ट कार्यकर्त्यांनी बाळासाहेब देशपांडे यांच्या आदेशानुसार आयोगाला अमूल्य सहकार्य केले.त्यांनी अनेक दस्तावेज आणि साक्षीदार आयोगाकडे सादर केले. त्यामुळे हे दस्तावेज महत्त्वाचे मानले गेले. जस्टीस नियोगी यांनी स्पष्ट रूपात मिशनरी कारवाया देशहिताच्या आणि आपल्या देशाच्या अखंडतेला हानिकारक, बेकायदेशीर आणि नैतिकतेच्याही विपरीत आहेत. शासनाने त्यांच्यावर, ख्रिश्चनांवर आपला अंकुश ठेवला पाहिजे, हेदेखील लक्षात आणून दिले. शिवाय उत्पन्नाचे स्रोत आणि त्याचा विनियोग याच्यावर नियंत्रण ठेवणे आयोगाला आवश्यक वाटले.

त्यासाठी आयोगाने काही सूचनादेखील केल्या.परंतु, अनेक कारणामुळे व आंतरबाह्य दबावामुळे आयोगाच्या शिफारसी लागू झाल्या नाहीत. आज आपण पाहतो की, जेथे मिशऩर्‍यांच्या कारवाया प्रबळ आहेत. तेथे देश विभाजक, दहशतवादी, हिंसक यांची आंदोलने चालू आहेत. याचा परिणाम राष्ट्रीय धन आणि विकास कार्यावर विपरित होत आहे. वनवासी कल्याण आश्रमाने आयोगाला संपूर्ण सहयोग दिला होता. म्हणूनच जस्टीस भवानी शंकर नियोगी यांनी बाळासाहेब देशपांडे यांना धन्यवाद दिले आणि कृतज्ञता व्यक्त करणारे पत्रही पाठवले होते.

वनवासी कल्याण आश्रमाने पाठशाळा आणि छात्रावासाने आपल्या कार्याचा शुभारंभ केला. विद्यालय आणि वसतिगृह ही त्यावेळची गरज होती. आता तर देशभरात वनवासी कल्याण आश्रमाने विद्यालय, छात्रावास वसतिगृह काढले आहेत. वाचनालयही काढलेत. त्यातून अनुशासन व राष्ट्रभक्तीचे संस्कार दिले जात आहेत. आज वनवासी कल्याण आश्रमाचे उद्दिष्ट सफल होताना दिसत आहे. या छात्रावासातून आदर्श, स्वावलंबी, क्रियाशील, शिस्तबद्ध, देशभक्त विद्यार्थी घडत आहेत. ते देशाचे नेतृत्व करण्यासही समर्थ होत आहेत. त्याचप्रमाणे आरोग्यसेवा सर्वच वनवासी भागात देण्याचा प्रयत्न होत आहे. त्यासाठी प्रभावी आरोग्य रक्षक योजना यशस्वीपणे राबविली जात आहे.

इसवी सन १९६५ मध्ये मार्च महिन्यात परमपूजनीय श्रीगुरुजी एक निवृत्त संघ प्रचारक नारायणराव पुराणिक यांना घेऊन जशपूरला आले होते. ते स्वतः वैद्य होते. त्यावेळी श्रीगुरुजींच्या बरोबर इंदौरचे सुप्रसिद्ध वैद्य पंडित नारायण शास्त्री होते, तसेच मुंबईचे एकनाथ गोरे यांच्या साहाय्याने स्वास्थ्य सेवेचा आयाम त्यांनी बळकट केला होता. वनवासी कल्याण आश्रमाने, ‘अंबर चरखा परिश्रमा’ला सुरूवात केली. त्यातून विणकामाचे शिक्षण दिले. आर्थिक विकासाच्या हेतूने ही कामे कल्याण आश्रमात सुरू करण्यात आली होती. त्याचप्रमाणे मधुमक्षिका पालन प्रशिक्षण वनवासींना देऊ केले होते. त्यामुळे ते मधाची विक्री करू लागले. शिक्षण, स्वास्थ्य, आर्थिक निर्भरता, पर्यावरण रक्षण, सामाजिक समरसता, परंपरागत धर्म आणि संस्कृतीची जोपासना, सुरक्षा व संवर्धन, राष्ट्रीय भावनात्मक एकता, या दृष्टीने ग्राम विकसित करण्याचे प्रयत्न झाले.


ग्राम निर्व्यसनी करण्याचा प्रयत्न यातून वाढीला लागला. १९६१-६२ पासून श्रद्धा जागरण या अभियानाला सुरुवात झाली. १९५७-५८ सालीच बृहत् यज्ञाचे आयोजन केले होते. याच वेळी खेलकूद केंद्राची स्थापना झाली. त्यातून अखिल भारतीय वनवासी क्रीडा, प्रतियोगिता यांचे आयोजन झाले. सुप्रसिद्ध धावक मिल्खा सिंग यांनी समक्ष उपस्थित राहून प्रेरणा दिली. त्यातून राष्ट्रीय आणि जागतिक यशाचा मार्ग वनवासींना खुला झाला. पुढे ग्रामीण पुरुषांच्या, त्याचप्रमाणे महिलांच्या समित्याही कार्यरत झाल्या. यातून मग वनवासींसाठी हितरक्षा हा आयाम स्थिरावला. शोषित, पीडित वनवासींना सर्व प्रकारे अभय या हितरक्षा आयामाने देऊ केले आहे.एवढे प्रयत्न चालू असूनही आजही समाजाने तन-मन-धनाने वनवासी विकासासाठी कार्यरत राहिले पाहिजे. आज त्याची अजूनही विशेष गरज आहे. वनवासी विकासाची ही प्रक्रिया आपण चालू ठेवली पाहिजे.



भास्कर गिरधारी
(लेखक जनजाती कल्याण आश्रम, पुणे महानगर उपाध्यक्ष)
(प्रमुख संदर्भ - ‘वनवासी कल्याण आश्रम का विकास’ डॉ. प्रसन्न सप्रे यांचा लेख)


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121