मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेची गोलमेज परिषद

आमदार निरंजन डावखरेंनी केले परिषदेचे आयोजन

Total Views | 16



ठाणे : 
ठाणे जिल्ह्यातील रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी व त्यावर उपाययोजना काय करता येईल या साठी रेल्वे प्रवासी संघटनेची गोलमेज परिषद शनिवार, दि.१४जून रोजी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार निरंजन डावखरे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.

या परिषदेत ठाणे विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय केळकर, शहराध्यक्ष संदीपजी लेले, मनोहर डुंबरे, तसेच ठाणे रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष नंदकुमार देशमुख सचिव सुधाकर पतंगराव, उपनगरीय प्रवासी महासंघाच्या अध्यक्ष लता अरगडे, माजी अध्यक्ष मनोहर शेलार, मुंबई महासंघाचे मधु कोटियन, दिवा रेल्वे प्रवासी संस्थेचे आदेश भगत, कल्याण कसाराचे अध्यक्ष राजेश घनगाव, वंदना सोनावणे, संजय मिस्त्री उपस्थित होते.

यावेळी रेल्वे प्रवासादरम्यान मुंब्रा दिवा येथील पाच प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला. तसेच, गर्दीच्या वेळी प्रवाशांना अनेकदा लटकत प्रवास करावा लागतो. यातूनच दिवसाला ७ ते ८ प्रवासी मृत्युमुखी पडतात. यासर्व बाबींवर ठोस उपाय करण्यात याव्या अशी मागणी या रेल्वे प्रवासी संघटनांनी केली. यावर उपाय म्हणून ठाणे कर्जत कसारा शटल सेवा चालू करण्यात यावी. गाड्यांची फ्रिक्वेन्सी वाढवण्यात यावी. सर्व लोकल या १५ डब्याच्या करण्यात याव्या तसेच महिलांची सुरक्षितता करण्यासाठी जीआरपी रेल्वे पोलीस यांची प्रत्येक स्टेशनवर उपस्थिती असावी अशा उपाययोजना सुचविण्यात आल्या. यावेळी कामकाजाच्या वेळा बदलण्यात याव्या जेणेकरून गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल. एसी लोकल ही लोकल सेवेच्या दरातच चालवण्यात यावी अशा अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या. अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात ही गोलमेज परिषद पार पडली, अशी माहिती मुंबई रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष मधू कोटियन यांनी सांगितले.

या परिषदेमध्ये उपनगरीय रेल्वे प्रवाशांना भेडसावणाऱ्या समस्यांवर सखोल चर्चा झाली. प्रवाशांना असणाऱ्या अपुऱ्या सुविधा, सुरक्षेच्या बाबतीत त्रुटी, वेळापत्रकातील विस्कळीतपणा, गर्दीचे नियोजन, मंजूर प्रकल्प बाबतीत रेल्वे प्रशासनाकडून होणारी हेळसांड यावर व्यावहारिक व सर्वसमावेशक सूचना मांडण्यात आल्या. या चर्चेमधून तयार होणाऱ्या ठोस मागण्या लवकरच रेल्वे मंत्रालयाकडे सादर केल्या जाणार आहेत. रेल्वे प्रवाशांच्या हितासाठी एकत्र येऊन सकारात्मक कृती घडवून आणणारी ही परिषद दर तीन महिन्यांनी भरवून प्रवासी संघटनांच्या मागण्यांच्या पाठपुराव्याचा मागोवा घेतला जाईल.

- निरंजन डावखरे, आमदार, कोकण पदवीधर मतदार संघ



गायत्री श्रीगोंदेकर

मूळची अहिल्यानगर येथील. 'राज्यशास्त्र' विषयातील पदवी. रानडे इन्स्टिट्यूट मधून (सा.फु.पुणे विद्यापीठ) 'एमजेएमसी' विषयात पदव्युत्तर शिक्षण. २०१९मध्ये मुंबई तरुण भारतमध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' या पदावर रुजू. सद्यस्थितीत 'इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट' विशेष प्रतिनिधी म्हणून कार्यरत. राज्यातील पायाभूत सुविधांविषयी फिल्ड रिपोर्ट आणि लेखनात रस.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121