गुवाहाटी: आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी राज्यातील स्थलांतरित मुस्लिमांना ''आदर्श कुटुंब नियोजन” पद्धतीचे आचरण करण्याचे आवाहन केले. राज्यातील गरिबी आणि निरक्षरतेसारख्या गोष्टी हद्दपार करण्यासाठी हे कुटुंब नियोजन गरजेचे असल्याचेही ते म्हणाले.
ते म्हणाले,“जर आसाममध्ये स्थायिक झालेल्या मुस्लिमांनी कुटुंब नियोजनाचा अवलंब केला, तर आसाममधील अनेक वाईट प्रथा आणि समस्यांवर आपण मात करू शकतो. माझे त्यांना आवाहन आहे. त्यांचं दारिद्रय संपवण्यासाठी मुस्लिम महिलांनी शिक्षित होणं गरजेचे आहे. लोकसंख्या नियंत्रणात आणणे गरजेचे आहे. मी मुस्लिम संघटनांना सरकारसोबत मिळून काम करण्याचे आवाहन करतो. सरकार आपल्या सगळ्यांसाठी आहे. महिलांना सुशिक्षित करण्यासाठी आणि त्यांची गरिबी संपवण्यासाठी आहोत. पण,जोपर्यंत आपण लोकसंख्येवर नियंत्रण आणणार नाहीत. तोपर्यंत गरिबी जाणार नाही,” असेही मुख्यमंत्री सरमा म्हणाले.
“लोकसंख्या स्फोट नियंत्रित करण्यासाठी आम्हाला अल्पसंख्याक मुस्लिम समुदायाबरोबर काम करायचे आहे. लोकसंख्या स्फोटात गरीबी आणि जमीन अतिक्रमण यासारख्या सामाजिक धोक्यांमुळे त्यांचे मूळ आहे. ते परप्रवासी मुस्लिम सभ्य कौटुंबिक रूढी अवलंबू शकले तर आपण अनेक सामाजिक समस्यांचे निराकरण करू शकतो. हे माझे त्यांना आवाहन आहे,”असे ते म्हणाले. ते पुढे म्हणाले, “लोकसंख्येच्या वाढीसह राहण्याच्या जागेची समस्या निर्माण होईल आणि यामुळे संघर्ष चालू होईल. लोकशाही पद्धतीने निवडलेल्या सरकारने लोकांना मंदिर आणि वनजमिनींवर स्थायिक होऊ देण्याची अपेक्षा केली पाहिजे.”
आसाममधील एकूण मुस्लिम मुस्लिम लोकसंख्येपैकी केवळ २% अल्पसंख्याक वगळता, उर्वरित लोक बांग्लादेशी स्थलांतरित मुस्लिम आहेत,जे बंगाली भाषिक आहेत. राज्यातील मुस्लिम लोकसंख्या एकूण ३.१३ कोटी लोकसंख्येच्या ३५ टक्के आहे. राज्याच्या १२६ विधानसभा जागांपैकी ३५जागांवर त्यांचे बहुमत आहे. भाजपने आत्ताची विधानसभा निवडणूक आसाममधील भूमिपुत्रांची जमीन, संस्कृती आणि ओळख यांच्या संरक्षण आणि संवर्धन करण्याच्या मुद्द्यांवर लढवली आहे.
“आसाम सरकार भेदभाव न करता सर्वांच्या विकासासाठी काम करणार आहे. पण सरकारलाही समुदायांचं समर्थन मिळणं आवश्यक आहे.सरकारवर ” असं मुख्यमंत्री सरमा म्हणाले. मूळ बंगाली असलेल्या आणि आसाममध्ये स्थायिक झालेल्या मुस्लिम समुदायाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या बदरुद्दीन अजमल यांच्या नेतृत्वाखाली एआययूडीएफ आणि अल्पसंख्याक विद्यार्थी संघटन असलेल्या ‘एएएमएसयू’चं प्रतिनिधित्व करणाऱ्या राजकीय आणि बिगर राजकीय संघटनानीही लोकसंख्या नियंत्रणाबद्दल विचार करावा, असं आग्रह सरमा यांनी यावेळी बोलताना केला.