संविधानातील भारत साकार करण्यास कटिबद्ध नेतृत्व

    09-Oct-2021
Total Views | 62

aathvle 2_1  H
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त दि. १७ सप्टेंबर ते ७ ऑक्टोबरपर्यंत देशात ‘सेवा-समर्पण सप्ताह’ नुकताच संपन्न झाला.दि. ७ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संवैधानिक पदाच्या कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्याचा केलेला हा गौरव...

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान जगातील सर्वश्रेष्ठ संविधान आहे. यावर अतूट विश्वास ठेवणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी संविधानाचे पूजक आहेत. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड बहुमताने विजय मिळाल्यानंतर मोदीजी सर्व खासदारांसमोर संविधानाला मनःपूर्वक नतमस्तक झाले होते. संविधानातील समता तत्त्वानुसार पंतप्रधान मोदींनी ‘सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास’ जिंकण्याची त्रिसूत्री जाहीर केली. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी देशातील सर्व घटकांच्या विकासासाठी प्रयत्नशील आहेत. त्यात त्यांना चांगले यश लाभले आहे. संयुक्त राष्ट्र संघात आणि सार्‍या जगात भारताची चांगली दखल घेतली जात आहे. पाकिस्तानचे दहशतवादी इरादे ‘सर्जिकल स्ट्राईक’द्वारे खाक करून टाकणारे भारतीय सैन्य चीनलासुद्धा चारीमुंड्या चित करण्यास सज्ज आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात आंतरराष्ट्रीय स्तरावर आज आपल्या देशाचा सर्वच क्षेत्रांत गौरव होत आहे. जगात प्रथम क्रमांकाचे लोकप्रिय नेतृत्व म्हणून भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव जाहीर झाले आहे. जगातील अव्वल नंबर एकचा नेता म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नाव जाहीर होणे, ही खरेच अभिमानाची आणि कौतुकाची बाब आहे.‘कलम ३७० ’ रद्द करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लागू केल्यामुळे जम्मू-काश्मीरचा विकास होणार आहे. जम्मू-काश्मीर खर्‍या अर्थाने भारतातील इतर राज्यांशी जोडले गेले आहे. इतर राज्यांतील व्यापारी जम्मू-काश्मीरमध्ये आता जमीन खरेदी करून तेथे उद्योग सुरू करू शकतील. तिथे रोजगारनिर्मिती होईल. दहशतवादी संघटनांना कोणी बेरोजगार तरुण सावज म्हणून सापडणार नाही. जम्मू-काश्मीरमध्ये विकासाचे वारे वाहू लागतील. शांती, समाधान जम्मू-काश्मीरच्या लोकांना लाभेल, ही किमया नरेंद्र मोदी यांनी हिंमत करून ‘कलम ३७० ’ रद्द केल्यामुळे होईल. हळूहळू जम्मू-काश्मीरचा विकास होत आहे, हे नक्की. ही कामगिरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आहे. मागील ६५ वर्षांत नरेंद्र मोदी पंतप्रधान होईपर्यंत काँग्रेसच्या काळातील कोणत्याही पंतप्रधानांनी ईशान्य भारताच्या दुर्गम भागाकडे जेवढे लक्ष दिले नाही, तेवढे लक्ष यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी देत आहेत. ईशान्य भारताच्या बिकट प्रांतांचा त्या भागातील सातही राज्यांचा विकास करण्याचा निर्धार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. स्वातंत्र्याच्या सात दशकांच्या कालावधीमध्ये कोणत्याही पंतप्रधानांनी ईशान्य भारताच्या विकासाकडे एवढे लक्ष दिले नाही, तेवढे पंतप्रधान मोदींनी दिले आहे. त्यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळातील सहकारी राज्यमंत्री म्हणून आम्हाला ईशान्य भारताचा दौरा करण्याच्या सूचना पंतप्रधानांनी दिल्या आहेत. त्यानुसार मी नेहमी आसाम, त्रिपुरा, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मिझोराम, मेघालय या राज्यांचा दौरा करीत आहे. सर्व केंद्रीय मंत्री ईशान्य भारतात दौरा करून त्या भागाच्या विकासाच्या योजना राबवित आहेत. ईशान्य भारत विकसित होत आहे. जम्मू-काश्मीर आणि ईशान्य भारतातील राज्ये विकासापासून दूर राहिली होती, त्यांना विकासाच्या प्रवाहात, देशाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व यशस्वी ठरले आहे.


नरेंद्र मोदी यांची गुजरातचे मुख्यमंत्री ते पंतप्रधानपदाची कारकिर्द यशस्वी, तेजस्वी, सेवाभावपूर्ण देशासाठी समर्पित कारकिर्द ठरली आहे. त्या कारकिर्दीमुळे संपूर्ण विश्वात लोकप्रिय द्रष्टे ‘विश्वलीडर’ ठरले आहे. गुजरातचे मुख्यमंत्रिपद तीन वेळा भूषविणारे नरेंद्र मोदी भारताच्या पंतप्रधानपदी दोन वेळा विराजमान झाले. जनतेच्या आशीर्वादाने पंतप्रधानपदाचीही हॅट्ट्रिक नरेंद्र मोदी नक्की मारतील, असा मला विश्वास वाटतो. आगामी २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत मोदी यांच्या नेतृत्वात ‘एनडीए’चा विजय होईल. मोदी तिसर्‍यांदा भारताचे पंतप्रधान होतील, हे निश्चित! पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील सात वर्षांत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. जगातील सर्वात मोठी लोकशाही असणार्‍या आपल्या भारत देशाला नरेंद्र मोदी यांचे लाभलेले नेतृत्व आज जगात नंबर एकचे लोकप्रिय गुणवत्तापूर्ण नेतृत्व आहे. याचा आपल्याला अभिमान वाटला पाहिजे. मागील सात वर्षांत पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी भारत बलशाली घडविण्याचे काम केले आहे. पंतप्रधान म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात करताना त्यांनी संविधानासमोर माथा टेकला आहे. संसदेला वंदन केले आहे. त्यामुळे मोदींच्या नेतृत्वात संविधान मजबूत राहणार आहे. संविधानाला कोणताही धोका नाही. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारानुसार काम करणारे पंतप्रधान मोदी आहेत. जगातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ डॉ. बाबासाहेब आंबेडकर होते आणि त्यांनी सांगितलेल्या नदीजोड प्रकल्पाचा विचार केंद्र सरकार करीत आहे. डॉ. बाबासाहेबांनी दर दहा वर्षांनी चलन बदलण्याचा उपदेश देशाला दिला आहे. त्यानुसार मोदींनी ‘नोटाबंदी’चा निर्णय घेतला. त्यानंतर देशात एकच कर असला पाहिजे. ‘एक देश, एक कर’ या प्रणालीसाठी देशात ‘जीएसटी’ कायदा आणण्यात आला. सर्व समाजघटकांचा विश्वास जिंकण्यासाठी मोदींनी मुस्लीम महिलांच्या हितासाठी ‘तीन तलाक’ पद्धत कायदा करून बंद केली आहे. ‘जन-धन योजना’, ‘मुद्रा योजना’, ‘मेक इन इंडिया’, ‘उज्ज्वला योजना’, ‘स्वच्छ भारत योजना’, ‘कौशल्य विकास योजना’, राष्ट्रीय मागासवर्गीय ‘ओबीसी’ आयोगाला घटनात्मक दर्जा देण्याचा निर्णय, तसेच सवर्ण समाजातील गरिबांना आर्थिक निकषावर आरक्षण देण्याचा कायदा मोदींनी केला आहे. अशी अगणित चांगली कामे मोदींनी केली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या संवैधानिक पदावर राहून समर्पित भावाने देशसेवा केली आहे. आज जगात सर्वाधिक लोकप्रिय नेते असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना त्यांच्या संवैधानिक पदावरील कारकिर्दीला २० वर्षे पूर्ण होत असल्याबद्दल माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा!





- रामदास आठवले












अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121