
गेल्या तीन वर्षाच्या सरासरी तुलनेत मृत्यूचे प्रमाण कमी
मुंबई (विशेष वृत्त) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या कारवाईची इत्यंभूत माहिती देणारा अहवाल मुंबई महापालिकेने प्रकाशित केला आहे. अहवालातील आकडेवारीचे बारकाईने अध्ययन केल्यास मुंबईच्या मृत्यूचे प्रमाण कमी झाल्याचा सकारात्मक पैलू समोर येतो.
मृत्युदरात २४ टक्के कमी आल्याचे अहवालाने म्हंटले आहे. मार्च २०१७ मध्ये मुंबई शहरात ७८१० मृत्यू झाले होते तर २०१८ मार्च मध्ये ७४३६ व २०१९ च्या मार्च महिन्यात ७१५५ मुंबईकर मृत्यमुखी पडले होते. लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर मार्च २०२० मध्ये केवळ ५६६९ मुंबईकरांचे मृत्यू झाले आहेत. त्यामुळे कोरोनाची भीतीतही मुंबईकरांचे जीवनमान वाढल्याचे हे निदेशक आहे.
याखेरीज संबंधित अहवालात एकूण कोरनाबाधितांची संख्या, चाचणी क्षमता, मुंबईतील प्रभागवार कोरोनाचे रुग्ण , वस्तुस्थिती याविषयीची विस्तृत माहिती देण्यात आली आहे.