वृक्षतोडीनंतर बोरिवली नॅशनल पार्कमधील 'त्या' भागावर ड्रोनने नजर

    10-Apr-2020
Total Views | 134

drone_1  H x W:

अवैध बांधकामावर लाॅकडाऊनंतरच कारवाई

 
 
 
मुंबई (विशेष प्रतिनिधी) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्यान' परिक्षेत्रातील साई बांगोडा गावाजवळ झालेल्या अवैध वृक्षतोडीनंतर प्रशासनाने या भागात ड्रोनच्या मदतीने नजर ठेवण्यास सुरुवात केली आहे. लाॅकडाऊननंतर पोलीसांचे संरक्षण मिळाल्यावर या भागातील बेकायदा बांधकामावर कारवाई करण्यात येणार आहे. गेल्या महिन्यात या भागामध्ये एका वन कर्मचाऱ्यावर हल्ला देखील झाला होता.
 
 
 
 
 
 
 
 
लाॅकडाऊन लागल्यानंतर विहार तलावाजवळील साई बांगोडा गावाजवळ अवैधरित्या वृक्षतोड झाल्याची घटना घडली होती. या परिसरात गस्तीवर असलेल्या वनकर्मचाऱ्यावर हल्ला देखील करण्यात आला होता. राष्ट्रीय उद्यानाच्या अखत्यारित येणाऱ्याया भागामध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदा बांधकाम झाल्याचे समोर आले आहे. प्लास्टिक आणि फाद्यांचे कुंपन घालून जमिनीच्या मोठ्या भागाची छोट्या-छोट्या तुकड्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. या बेकायदा बांधकामावर लाॅकडाऊननंतरच कारवाई करण्याची भूमिका प्रशासनाने घेतली आहे.
 
 
 
गेल्या महिन्यात या भागात गस्तीवर असलेल्या आमच्या एका कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याने हा संपूर्ण परिसर संवेदनशील झाला आहे. अशा परिस्थितीत त्याठिकाणच्या अतिक्रमणावर पोलिसांच्या संरक्षणामध्येच कारवाई करणे उचित ठरणार असल्याची माहिती एका अधिकाऱ्याने दै. 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. त्यामुळे लाॅकडाऊन संपल्यावर पोलीस संरक्षणाअंतर्गत या बांधकामावर कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर याच परिसरात झाडांची तोडही झाल्याचे समोर आले होते. यासाठी दर दिवसाआड ड्रोनच्या सहाय्याने या संपूर्ण परिसराची पाहणी करत असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले.
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही! - मंत्री आशिष शेलार; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची नाही! - मंत्री आशिष शेलार; राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

“महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून, राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही. तर, पूर्वीपासून पाचवी ते आठवीपर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली, तसेच अन्य पर्याय उपलब्ध करून दिले. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा अवाजवी, अतार्किक आणि अवास्तव आहेत. आम्ही मराठीचे आणि विद्यार्थी हिताचे खंदे पुरस्कर्ते आहोत”, अशी स्पष्ट भूमिका मुंबई भाजपचे अध्यक्ष आणि राज्याचे सांस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121