भारतातून टोलनाके हद्दपार होणार ! काय आहे सरकारची योजना ?

    18-Dec-2020
Total Views | 292

toll plaza_1  H



नवी दिल्ली :
भारतातील रस्ते प्रवास अडथळ्यातून मुक्त करण्यासाठी व देशातील वाहनांचा मुक्त संचार सुरू करण्यासाठी केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय रस्ते, वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, येत्या दोन वर्षांत भारत टोल व अडथळ्यांपासून मुक्त होणार आहे. सरकार यासाठी जीपीएस (ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम) प्रणाली आणणार असल्याचे गडकरी यांनी गुरुवारी सांगितले. येत्या दोन वर्षांत वाहनांचा टोल तुमच्या लिंक केलेल्या बँक खात्यातूनच वजा केला जाणार असल्याचे ते म्हणाले.


एका कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले की, टोलसाठी जीपीएस प्रणालीचे काम चालू आहे, ज्यामध्ये प्रवास केलेल्या अंतरावरुन टोल आपोआपच बँक खात्यातून वजा करण्यात येईल.रशियन सरकारच्या मदतीने आम्ही लवकरच जीपीएस (GPS) सिस्टमचे काम पूर्ण करू. यानंतर, २ वर्षांत भारत पूर्णपणे टोलमुक्त होईल. यावेळी देशातील सर्व व्यावसायिक वाहने ट्रॅकिंग सिस्टमने सुसज्ज आहेत. त्याचबरोबर सर्व जुन्या वाहनांमध्ये जीपीएस सिस्टम तंत्रज्ञान बसविण्यासाठी सरकार वेगाने काम करेल. गेल्या वर्षभरात केंद्र सरकारने वाहनांचा मुक्त संचाराकरीता टोल प्लाझावर फास्टॅग अनिवार्य केला आहे. फास्टॅग अनिवार्य केल्यानंतर इंधन बचत होत असून प्रदुषणही कमी झाले आहे.


गेल्या काही महिन्यांत फास्टॅगचा वापर झपाट्याने वाढला आहे. नोव्हेंबरमध्ये प्रसिद्ध झालेल्या एनएचएआयच्या वृत्तानुसार, आतापर्यंत एकूण टोल संकलनात फास्टॅगचे योगदान आहे. याच काळात ती मागील वर्षीच्या ७०कोटींच्या तुलनेत ९२ कोटी रुपये होती. गडकरी म्हणाले, "काल रस्ते वाहतूक आणि महामार्ग आणि अध्यक्ष, एनएचएआय यांच्या उपस्थितीत टोल वसुलीसाठी जीपीएस तंत्रज्ञानाचा वापर करून एक सादरीकरण दिले. येत्या पाच वर्षांत आमच्या टोलचे उत्पन्न १,३४,००० कोटी होईल, अशी आमची अपेक्षा आहे.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121