गेल्या २४ तासांत पडलेल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी जोरदार पाऊस झाला आहे. त्यापैकी महाबळेश्वरमध्ये सर्वात जास्त पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. येथे गेल्या २४ तासांत, ३२६ मिलीमीटर पाऊस झाला आहे.
मुंबईत पावसाचा जोर कमी असून शहरात आता एकच अंकी पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत पाऊस कमी झाला आहे आणि पुढील २ ते ३ दिवसांतही अशीच परिस्थिती दिसून येईल. त्यामुळे सध्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळू शकेल.
पवना, मुळा आणि मुठा येथील पाण्याची पातळी वाढल्यामुळे सोमवारी वाहतूक पोलिसांनी पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील ३० पैकी ६ पूल बंद केले होते. खडकवासला धरणातूनही मुठा नदीत ४५,४७४ क्युसेक दराने पाणी सोडले गेले, जे गेल्या ८ वर्षांतले सर्वाधिक प्रमाण आहे. लोकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यातील कमीतकमी ५,००० लोकांना सामुदायिक हॉल व शाळांमध्ये हलविले आहे. एनडीआरएफ आणि अग्निशमन दलाने ६०० हून अधिक लोकांना वाचवले.