नवी दिल्ली : कारगिल विजयाला २० वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक येथे 'विजय मशाल' प्रज्वलित केली. यावेळी सिंह आणि लष्कराचे प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकाजवळील अमर जवान ज्योतिवर पुष्पचक्र अर्पण करत शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिली. मोटारसायकल स्वारांची एक टीम 'विजय मशाल' घेऊन ११ शहरात मिरवणार आहेत. यानंतर २६ जुलै रोजी ही मशाल जम्मू कश्मीरमधील करगिल युद्ध स्मारक, द्रास येथे पोहचणार आहे.
Handed over the ‘Victory Flame’ to Indian Army at National War Memorial in Delhi today.
— Rajnath Singh (@rajnathsingh) July 14, 2019
This flame would reach Drass in Ladakh (Jammu and Kashmir) on Kargil Vijay Diwas.
On reaching Drass the ‘Victory Flame’ will be merged with the eternal flame at the ‘Kargil War Memorial’. pic.twitter.com/Mi1pPNzBX1
२६ जुलै रोजी असणाऱ्या कारगिल विजय दिनाच्या निमित्ताने आज १० विशेष रेल्वेगाड्या देशाच्या विविध भागांत रवाना करण्यात येणार आहेत. या रेल्वेगाड्यांच्या माध्यमातून कारगिल युद्धाच्या माहितीचा अमूल्य ठेवा प्रवाशांपुढे सादर केला जाणार आहे. विशेषत: देशासाठी बलिदान करणाऱ्या जवानांची माहिती याद्वारे देण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या प्रवक्तांनी सांगितले.
#कारगिल_विजय की 20वीं वर्षगांठ पर देश के वीर सपूतों को नमन् करते हुए,नई दिल्ली रेलवे स्टेशन पर #विनाइल_आवृत_रेल को हरी झंडी दिखाई।देशभर में चलाई जा रही इन रेलों में कारगिल युद्व में भारतीय शूरवीरों के शौर्य,साहस व युद्ध रणनीति की अमर गाथा को तस्वीरों में दर्शाया गया है @adgpi pic.twitter.com/oRT9GzegnO
— Dr Harsh Vardhan (@drharshvardhan) July 15, 2019
माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat