आरोग्य क्षेत्रात महाराष्ट्राची भरीव कामगिरी

    25-Jun-2019
Total Views | 28



निती आयोगाच्या आकडेवारीत राज्य तिसऱ्या स्थानावर



नवी दिल्ली : केंद्र सरकारचा थिंक टॅंक मानला जाणाऱ्या निती आयोगातर्फे राज्यनिहाय्य आकडेवारी जाहीर केली आहे. निती आयोगातर्फे सर्व राज्यांच्या आरोग्यविषयक परिस्थितीचा आढावा घेतला आहे. यात महाराष्ट्राचा पहिल्या तीन राज्यांमध्ये क्रमांक लागतो, तर केरळ सर्वात अग्रक्रमी आहे तर, उत्तर प्रदेश सर्वात शेवटी आहे. २०१८ मध्ये जारी करण्यात आलेल्या आकडेवारीतरी केरळ राज्याने बाजी मारली होती. मात्र, महाराष्ट्राने २०१५-१६ च्या तुलनेत सहाव्या स्थानावरून तिसऱ्या स्थानावर मजल मारली आहे. 



 

.

नीति आयोग आणि आरोग्य मंत्रालयाने एकत्र येत २३ विविध मुद्दे लक्षात घेत ही आकडेवारी जारी केली होती. त्या आधारे राज्यनिहाय्य आकडेवारी जारी करण्यात आली आहे. नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव कुमार यांनी ही माहीती जाहीर करत म्हटले की, लहान राज्यांच्या आकडेवारीचा तक्ता सुधारताना दिसत आहे.


 

 

मोठ्या राज्यांमध्ये हरियाणा, राजस्थान आणि झारखंड या राज्यांचा आलेख गेल्या वर्षाच्या तुलनेत सुधारला आहे. लहान राज्यांमध्ये सर्वात पुढे मिझोरामचा क्रमांक लागतो. त्रिपूरा आणि मणिपूर या राज्यांनीही आरोग्य क्षेत्रात समाधानकारक प्रगती केली आहे. महाराष्ट्र राज्याचा विचार करता, गतवर्षीच्या तुलनेत सुधारणा होत असल्याचे दिसून येत आहे. २०१५-१६ मध्ये महाराष्ट्र ६१.०७ गुणांसह सहाव्या स्थानावर होता. तर, २०१६-१७ मध्ये ६८.९९ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.

 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/ आणि फॉलो करा twitter.com/MTarunBharat

अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121