देशात मोदींचीच हवा : रामदास आठवले

    13-Nov-2018
Total Views | 17
 
 

मुंबई : देशात हवा कुणाची आहे हे मला अचूक कळतं; आणखी दहा वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचीच हवा राहणार आहे. काँग्रेसने मला केंद्रात मंत्रिपद दिले नाही मात्र प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी मला केंद्रीयमंत्रीमंडळात स्थान दिले आहे. त्यामुळे पुढील दहा वर्षे मी भाजपसोबत एनडीए मध्येच राहणार आहे. मात्र, राजकारणात हवा कुणाची आहे याचा अचूक अंदाज घेऊनच मी नेहमी निर्णय घेत असतो अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिली.

 

काँग्रेस सोबत १५ वर्ष होतो त्यामुळे भाजपसोबत आणखी १५ वर्ष राहणार आहे. त्यामुळे माझ्या विधानाचा कोणी विपर्यास करू नये. रिपब्लिकन पक्ष आगामी २०१९ मध्ये भाजप सोबत केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांना भक्कम साथ देणार आहे. त्यानंतरची दहा वर्षही आम्ही भाजपला साथ देणार असून त्यात कोणतीही शंका घेण्याचे कारण नाही असा खुलासा ना रामदास आठवले यांनी आज प्रसिद्धीपत्रकाद्वारे केला आहे.

 
 

मुंबईत कुर्ला येथे एका जाहीर कार्यक्रमात काँग्रेसचे आमदार मोहम्मद आरिफ नसीम खान यांनी रामदास आठवलेंनी युती तोडल्यामुळे काँग्रेसची सत्ता गेली त्यामुळे आठवलेंनी काँग्रेस सोबत पुन्हा युती करण्याचे आवाहन केले. त्याला उत्तर देताना ना रामदास आठवले यांनी आपण अजून दहा वर्ष भाजप सोबतच्या युतीमध्येच राहणार आहोत. तसेच अजून दहा वर्ष देशात प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचीच हवा राहणार असून अजून दहा वर्षे काँग्रेस सत्तेत परत येऊ शकत नसल्याचे रामदास आठवले यांनी स्पष्ट केले. यावेळी विचारमंचावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे उपस्थित होते.

 
 

माहितीच्या महापुरात रोजच्या रोज नेमका मजकूर मिळविण्यासाठी लाईक करा... facebook.com/MahaMTB/

 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121