(Covid Vaccine) कोरोनानंतर प्रौढांमध्ये अचानक वाढलेल्या मृत्यूंबाबत आयसीएमआर आणि एम्सने केलेल्या विस्तृत अभ्यासाचा हवाला देत केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने कोरोना लस आणि हृदयविकारामुळे होणाऱ्या मृत्यूंचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट केले आहे.
Read More
२०२५ मध्ये भारतात कोविड-१९ रुग्णसंख्या वाढत आहे. सध्या देशात ५,३६४ सक्रिय रुग्ण आहेत. गेल्या २४ तासांत ७६४ नवीन रुग्ण आढळले असून, ४ जणांचा मृत्यू झाला आहे. केरळ राज्यात सर्वाधिक १९२ नवीन रुग्ण नोंदवले गेले आहेत. महाराष्ट्रात ११४, गुजरातमध्ये १०७, पश्चिम बंगालमध्ये ५८, आणि दिल्लीमध्ये ३० नवीन रुग्ण आढळले आहेत.
‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’नेही व्यापारयुद्धाचा धोका काल प्रकर्षाने अधोरेखित केला. अमेरिकेच्या आयातशुल्क धोरणामुळे संपूर्ण जगावर हे व्यापारयुद्ध लादले गेले असून, त्याचे परिणाम हे ‘कोविड-19’ महामारीपेक्षा अधिक परिणामकारक असतील. त्यामुळे जगावर पुन्हा एकदा आर्थिक मंदीचे सावट तीव्र झाले आहे. भारत या संकटाला तोंड देण्यासाठी सक्षम असला, तरी हे व्यापारयुद्ध रोखणे हेच जागतिक हिताचे...
देशात कोरोना महामारी रुग्णांची संख्या चार हजारांवर पोहोचली असून ३ जून २०२५ रोजी, देशात ४,०२६ सक्रीय रुग्ण नोंदवले गेले आहेत. गेल्या २४ तासांत पाच नवे मृत्यू झाले आहेत. केरळमध्ये ८० वर्षांच्या एका वृद्धाचा मृत्यू झाला. त्यांना न्यूमोनिया झाला होता. महाराष्ट्रात ७० आणि ७३ वर्षांच्या दोन महिलांचा मृत्यू झाला. त्यांना मधुमेह होता. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये प्रत्येकी एक मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात सध्या आढळणाऱ्या सर्व कोरोनाबाधितांमध्ये सौम्य लक्षणे दिसून येत आहेत. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे. राज्यात जानेवारी २०२५ पासून १२ हजार ११ कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यात ८७३ रुग्ण बाधित आढळले. यापैकी ३६९ रुग्ण बरे झाले असून, सध्या सक्रिय रुग्णसंख्या ४९४ इतकी आहे. मुंबईत या काळात ४८३ रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबईतील कोविड रुग्णसंख्येत काही प्रमाणात वाढ होत असली, तरी घाबरण्याची गरज नाही. मात्र, ज्यांना मधुमेह, उच्च रक्तदाब किंवा गंभीर स्वरूपाचे आजार आहेत, त्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून मास्क वापरणे गरजेचे असल्याचे मत कोविडविषयक आढावा बैठकीत तज्ज्ञांनी व्यक्त केले. मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार, दि. २ जून रोजी ही बैठक संपन्न झाली
कोविड-१९ च्या जेएन.१ (JN.1) या व्हेरिएंटमुळे जगभरात पुन्हा चिंतेचे वातावरण तयार झालेय. कारण या पूर्वी आलेल्या कोरोनाच्या लाटेमुळे जगभरात लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. अनेकण यात मृत्यूमूखी पडले होते. थायलंडमध्ये सध्या नवीन व्हेरिएंटचे ३३ हजारपेक्षा अधिक प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर ब्रिटनमध्ये मृत्यूंची संख्या सर्वाधिक आहे. भारतातही या व्हेरिएंटच्या रुग्णांची नोंद झाल्याची माहिती आहे.
संपूर्ण जगात हाहाकार माजवणारा कोरोना व्हायरस पुन्हा एकदा जागा होताना दिसतो आहे. सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये कोरोनाबाधितांची संख्या झपाट्याने वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे. तर मुंबईतही दोन संशयित रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली आहे.
समाजातील दिव्यांग मुले आणि वयोवृद्धांसाठी आपले सर्वस्व अर्पण करणारे प्रा. महेश पाटील यांच्याविषयी...
'World Health Organization’ने नुकतेच एक महत्त्वाचे पाऊल उचलले. महामारी नियंत्रणासाठी एक आंतरराष्ट्रीय करार तयार करण्याबाबतचा प्रस्ताव या संघटनेने अंतिम केला आहे. या कराराचा उद्देश भविष्यातील साथरोगांचा धोका ओळखून, त्यावर तत्काळ प्रतिसाद देण्यासाठी जागतिक सहकार्याची नवी चौकट निर्माण करणे हा आहे. या मसुद्यात प्रभावी लसीकरण, वैद्यकीय संशोधन, माहितीचे पारदर्शक आदानप्रदान आणि सार्वजनिक आरोग्य यंत्रणांतील समन्वय यासंबंधी काही महत्त्वाचे मुद्दे मांडले गेले आहेत. पण, या प्रस्तावाची वेळ, स्वरूप, आणि त्यामागची ऐतिहास
सर्वांत आधी ‘भारती एअरटेल’ त्यानंतर ‘जिओ’ या दोन्ही कंपन्यांनी एलॉन मस्क यांचे बोट धरून, ‘स्टारलिंक’ला भारतात आणणार असल्याची घोषणा नुकतीच केली. भारतात ‘६जी’ आणण्याची प्रक्रिया सुरू असताना, नेमके ‘स्टारलिंक’ आल्याने काय होणार? त्याबद्दलचा हा सविस्तर आढावा...
व्यवस्थापनातील उच्चपदस्थांचे राजीनामे हे कंपन्यांच्या कामगिरीवर आणि एकूणच कार्यसंस्कृतीवर सर्वांगीण परिणाम करणारे ठरतात. विशेषकरुन ‘कोविड’ महामारीच्या काळात मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्यामुळे विविध कंपन्यांची अवस्था अधिक बिकट झाली होती. पण, सध्या अशा राजीनाम्यांची संख्या घटलेली दिसून येते. त्यानिमित्ताने व्यवस्थापन क्षेत्रातील मुख्याधिकार्यांच्या राजीनाम्याचे प्रमाण आणि त्याचे परिणाम यांचा आढावा घेणारा हा लेख...
भारतामध्ये आताच्या घडीला HMPV या व्हायरसचे एकूण ७ रूग्णं आढळले आहेत. HMPV हा मोठ्या प्रमाणात लहान मुलांमध्ये आढळून आल्याचे दिसून येत आहे. बेंगलुरू, नागपूर, चेन्नाई आणि अहमदाबाद या शहरांमधील बालकांना याची लागण झाल्याचे आढळून आले आहे. केंद्रीय मंत्री जे.पी.नड्डा यांनी माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार हा नवीन व्हायरस नसून, चिंता करण्याचे कुठलेही कारण नाही.
२०२० साली वर्षभर थैमान घालणाऱ्या कोविड व्हायरसने जगाला घाम फोडला होता. कोव्हिड काळात बसलेल्या आर्थीक तडाख्यातून बाहेर यायला खूप मोठा काळ जावा लागला. अशातच आता चीनमध्ये HMPV (ह्युमन मेटान्यूमोनोव्हायरस) आढळला असून यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चीनच्या अनेक रूगणालयांमध्ये रांगा लागल्या आहेत. अशातच आता भारतीय वैद्यकीय क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी मोठे वक्तव्यं केलं आहे.
(Asim sarode)“बदलापूरसारख्या संवेदनशीलप्रकरणी पोलिसांविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करणारे वकील असीम सरोदे उबाठाचे निकटवर्तीय असून, ते सिलेक्टिव्ह अॅक्टिव्हीझम करतात,” अशी घणाघाती टीका शिवसेना प्रवक्त्या मनीषा कायंदे यांनी शुक्रवार, दि. २७ सप्टेंबर रोजी केली. “चिमुरड्यांवर अत्याचार करणार्या नराधम अक्षय शिंदेचा सरोदे यांना एवढा पुळका का आला?” असा सवाल त्यांनी केला.
बायडेन प्रशासन आपल्यावर दबाव आणत होते. कोव्हिड काळातील माहिती दडपण्यासाठी मेटावर दबाव टाकण्यात आला, असा खुलासा मेटाचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांनी एका पत्रात नमूद केले आहे.
चीन विस्तारवादी देश आहे, यात काही शंका नाही. चीन दुसर्या देशांचे भूभाग हडपण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातो. चीन जमिनी चोरतो, हे सबंध जगाला माहीत होतेच, मात्र आता याच चीनमध्ये चक्क मृतदेह चोरणार्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा थाटामाटात लग्न सोहळा १२ जुलै रोजी देश-विदेशातील पाहुण्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर १४ जुला रोजी अनंत-राधिकाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा झाला ज्यात बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता अक्षय कुमारची उपस्थिती काहीशी भुवय्या उंचावणारी होती. अक्षय कुमारला कोरोनाची लागम झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तरीही त्याने अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी कशी लावली असा प्रश्न सध्या केला जात आहे.
‘कोविड’ महामारीच्या संकटानंतर आरोग्य विमा पॉलिसी घेणार्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विमा हा आजारपणानंतरच्या खर्चाचा दावा संमत व्हावा म्हणून काढला जातो. पण, विमा कंपनीकडून/टीपीए (थर्ड पार्टी अॅडमिनिस्ट्रेशन) कडून काही प्रकरणांत दावा मंजूर केला जात नाही/ फेटाळला जातो. पण, असे होऊ नये, आपला दावा संमत व्हावा, यासाठी नेमकी काय दक्षता घ्यावयास हवी, याची माहिती आजच्या लेखात करुन घेऊया.
मालदीव... पूर्वी कधीही फारसा चर्चेत नसलेला, हा 1 हजार, 192 बेटांचा देश, हल्ली दिवसाआड बातम्यांच्या केंद्रस्थानी झळकताना दिसतो. कधी भारताविरोधी फुटकळ बडबडीमुळे, तर कधी नवनिर्वाचित राष्ट्रपती मोहम्मद मोइज्जू यांना सहन कराव्या लागणार्या देशांतर्गत विरोधामुळे. मालदीवची सध्याची राजकीय स्थिती चिंताजनकच. पण, आता या द्वीपराष्ट्रावरील कर्जबोझा दिवसेंदिवस वाढत असल्याचे ‘आंतरराष्ट्रीय नाणेनिधी’ने (आयएमएफ) जाहीर केले आहे. त्यामुळे चीनच्या कवेत गेलेले, मालदीव हे बुडतीचे बेट ठरण्याचीच शक्यता बळावलेली दिसते. त्यामुळे माल
संजय राऊत, हसी मजाक करा पण कोविड घोटाळ्याचा हिशोब तर द्यावाच लागेल, असे प्रत्युत्तर भाजप नेते किरीट सोमय्यांनी उबाठा गटाचे खासदार संजय राऊतांना दिले आहे. संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर आरोप करत किरीट सोमय्यांनी त्यांच्याकडे हिशोब मागावा असे म्हटले होते. यावर आता सोमय्यांनी प्रत्युत्तर दिले आहे.
मुंबई महापालिकेतील घोटाळ्यासंदर्भात उबाठा गटावर आरोप होत आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या हे अनेक पुराव्यांचे दाखले देत ठाकरे सरकारच्या काळात झालेले घोटाळे पुढे आणत आहेत. यातच आता आदित्य ठाकरेंच्या मित्रावरही एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरीट सोमय्यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) उबाठा गटाचे खासदार संजय राऊत यांचे निकटवर्तीय सुजित पाटकर यांच्या नावावर असलेल्या म्युच्युअल फंड युनिट्स आणि बँक खात्यांसह शहरातील १२.२ कोटी रुपयांच्या तीन फ्लॅटची मालमत्ता जप्त केली आहे. सुजित पाटकर कोविड फील्ड हॉस्पीटल घोटाळ्यातील सहआरोपी आहेत.
२०२३ -२४ चा मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प हा ५० हजार कोटींहून अधिक रुपयांचा होता. म्हणजेच गोवा, सिक्कीम, नागालँड, त्रिपुरासारख्या छोट्या राज्यांच्या अर्थसंकल्पापेक्षाही मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाची रक्कम कित्येक पट्टींनी जास्त मानली जाते. त्यामुळेच आशियातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका म्हणून मुंबईची ओळख आहे. तसेच मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पातील ५० ते ७० टक्के खर्च हा पालिकेतील कर्मचारी, अधिकारी यांचा पगार आणि पेन्शन यावरच होतो. उर्वरीत खर्च विविध कामं, योजना यावर केला जातो, असं ही सांगितले जातं. मा
चीनमध्ये मागच्या काहीदिवसांपासून कोरोना सदृश महामारीने थैमान घातले आहे. तीव्र तापाबरोबरच दम लागणाऱ्या या आजारामुळे हजारो लहान मुलं रुग्णालयात दाखल झाले आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, हा आजारही कोरोनासारखा संसर्गजन्य आहे, एका व्यक्तीपासून दुसऱ्याला होतो.
मुंबई महानगरपालिकेतर्फे कोविडच्या चार हजार १५० कोटी रुपयांच्या खर्चाची आकडेवारी अखेर तपशीलवार जाहीर झाली आहे. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना स्वतः मुंबई महानगरपालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी दिली आहे. सर्वाधिक खर्च हा जम्बो सुविधा केंद्रावर १,४६६.१३ कोटी खर्च करण्यात आला आहे.
देशांतर्गत विमानवाहतूकीत १७ आणि १८ नोव्हेंबर रोजी विमानप्रवाशांच्या नव्या विक्रमाची नोंद करण्यात आली. खुद्द केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंदिया यांनी ही माहिती दिली. देशांतर्गत विमान उड्डाण करणाऱ्या प्रवाशांची संख्या रविवारी ४ लाख ५६ हजार ९१० इतकी झाली. शनिवारी हा आकडा ४ लाख ५६ हजार ७४८ इतका होता.
बाल हक्कासाठी लढा देणाऱ्या 'क्राय' संस्थेकडून देशभरातील विविध राज्यांमध्ये इंटरनेट वापर संदर्भात करण्यात आलेल्या सर्वेक्षणात महाराष्ट्रातील लहान मुलांकडून सर्वात जास्त इंटरनेटचा वापर करण्यात येत असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
शहरातील सर्व शासकीय आणि महानगरपालिका कोविड लसीकरण केंद्रांवर मंगळवार, दि. १४ नोव्हेंबर रोजी बलिप्रतिपदा/दीपावली पाडवा या सार्वजनिक सुटीमुळे कोविड लसीकरण बंद राहणार आहे. बुधवार, दि. १५ नोव्हेंबर २०२३ पासून लसीकरण मोहीम पूर्ववत सुरु राहणार आहे.
चीनच्या पोलादी पडद्यामागील घटनांचे अन्वयार्थ लावणे अवघड असतानाच चीनचे माजी पंतप्रधान ली केकियांग यांच्या मृत्यूची बातमी समोर आलेली आहे. त्यामुळे चीनच्या गूढ राजकारणात या बातमीचा मागोवा घेताना एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे, एखाद्या सरळ असू शकणार्या घटनेकडेही आता सरसकटपणे शंका घेतली जाऊ शकते, अशी ही परिस्थिती.
इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने सरकारी आणि काही जुन्या खाजगी पिढीतील बँक कर्मचार्यांसाठी १५ टक्के पगारवाढ प्रस्तावित केली आहे. तसेच लवकरच आठवड्यातून पाच दिवस काम सुरू करण्याचीही योजना आहे. दि.२६ ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र इतर बदलांसह पगारात आणखी वाढ करण्याची मागणी अनेक संघटना करत आहेत.
सध्या सुरू असलेले रशिया-युक्रेन, इस्रायल-‘हमास’ आणि अझरबैजान-आर्मेनिया हे तीनही संघर्ष मध्य आशिया प्रांताच्या अवतीभवतीच घडत आहेत. विशेषतः रशिया-युक्रेन आणि अझरबैजान-आर्मेनिया हे संघर्ष तर सोव्हिएतोत्तर देशांमध्येच सुरू आहेत. यामागे सोव्हिएत काळातील सदोष सीमा-आखणी आणि विविध वांशिक-धार्मिक गटांविषयीची चुकीची धोरणे, ही पार्श्वभूमी आहे. तसेच सीमा-वाद आणि भाषिक-वांशिक संघर्ष मध्य आशियातही आहेत. अशाप्रकारे लष्करी बळाच्या जोरावर प्रस्थापित सीमांमध्ये केलेले बदल संपूर्ण युरेशियन प्रांतालाच हादरवून टाकणारे आहेत.
पुण्याच्या ससून रुग्णालयातून कैद्याच्या पलायनाची घटना घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटल्या. पोलिसांच्या कारभाराइतकी किंवा कदाचित जास्तच चर्चा रुग्णालयाच्या कारभाराचीही झाली. पुण्यातील हे मोठे सार्वजनिक रुग्णालय नेहमीच चर्चेत असते.
आज पुन्हा एकदा कोविड काळातील मुंबई महापालिकेकडून कंत्राट घेतलेल्या कंपन्या आयकर विभागाच्या रडारवर असल्याची बातमी आली. मुंबई, पुणे, गुजरात आणि उत्तर प्रदेशसह १० ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली. आणि उबाठा गटाचे आदित्य ठाकरेंशी संबधित एका व्यक्तीवर कोविड घोटाळ्याप्रकरणी आयकर विभागाने धाड टाकली.आणि आता पुढचं नाव कोणाचं? कोण आहे कोविड घोटाळ्यातील पुढचा आरोपी? असे बरेच प्रश्न निर्माण झाले.
‘कोविड’ काळात उद्धव ठाकरे सरकारने भ्रष्टाचार केला, असा भंडाफोड उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केला. संभाजीनगर व नांदेड येथे घडलेल्या दुर्घटना अत्यंत दुर्दैवी आहेत परंतु, विरोधकांनी त्याचे राजकारण न करता सूचना कराव्यात, असे आवाहन उद्योगमंत्री सामंत यांनी केले. ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
या वर्षीचा २ ऑक्टोबर हा दिवस जगातील हजारो शास्त्रज्ञांच्या दृष्टीने सर्वार्थाने ऐतिहासिक ठरला. शरीरशास्त्र किंवा औषधशास्त्राचे ‘नोबेल’ पारितोषिक या दिवशी जाहीर झाले आणि वैद्यकीय क्षेत्रातील हजारो शास्त्रज्ञ ज्या क्षणाची वाट पाहत होते, तो क्षण सर्वांच्या अपेक्षेसारखा आला. यावर्षी कॅटालिन कारिको आणि त्यांचे सहकारी ड्रू वेईसमन या दोघांना वैद्यकीय क्षेत्रातील संशोधनकार्याचे ‘नोबेल’ पारितोषिक जाहीर झाले. त्यानिमित्ताने जगाला कोरोना महामारीतून तारणारे या संशोधनाविषयी आणि या दोन पुरस्कार्थींच्या आजवरच्या आव्हानात्
नांदेड, नागपूर, संभाजीनगर रुग्णालयातून मृतांची आकडेवारी सातत्याने वाढत आहे. या घटनेवर राजकीय वर्तुळातुन प्रतिक्रिया येत आहे. उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेत नांदेड प्रकरणावरुन सरकारवर ताशेरे ओढले आहेत. कोविड काळात आपण औषधं कानाकोपऱ्यात पोहोचवली. असं ठाकरे म्हणाले आहेत. कमी मनुष्यबळ असतानाही आम्ही कोरोनाचा सामना केला. मी मुख्यमंत्री असताना सर्वोच्च मुख्यमंत्री म्हणून माझं नाव येत होतं. असं ठाकरेंनी पत्रकार परिषदेत म्हटलं आहे.
करोनाकाळात माणसे मरत असताना मास्क लावून नोटा मोजणाऱ्यांनी आमच्या सरकारवर टिका करू नये, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री आणि उबाठाप्रमुख उध्दव ठाकरे यांना शुक्रवारी लगावला आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत कोविड काळातील ज्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देय आहे, ती ८ दिवसात न दिल्यास पिक विमा कंपन्यांनी नियमानुसार होणाऱ्या कारवाईची तयारी ठेवावी, असा इशारा कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिला आहे. सन २०२०-२१ मधील प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची नुकसान भरपाई देण्यास काही पिक विमा कंपन्यांकडून विलंब होत असल्याने त्याबाबत आढावा घेण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत धनंजय मुंडे बोलत होते. यावेळी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांसह विमा कंपन्यांचे प्रतिनिधी उप
जंबो कोविड सेंटर घोट्याळ्याप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रात म्हटले आहे की, पाटकर यांनी कंपनी स्थापन करण्यापूर्वी लाइफलाइन हॉस्पिटलचे लेटरहेड जयस्वाल यांना देण्यास वापरले. पाटकर यांनी संजय राऊत यांच्या नावाचा वापर करून टेंडर मिळवले, यासाठी जयस्वाल यांनी पाटकरांना मदत केली. पाटकर आपल्या राजकीय संपर्काचा वापर करून निविदा प्रक्रियेची पूर्वमाहिती मिळवत होता. वरळी आणि दहिसर कोविड जंबो रुग्णालयाच्या निविदा चर्चेसंदर्भात पाटकर यांनी जयस्वाल यांची भेट घेतल्याचे आरोपपत्रात म्हटले आहे.
एक काळ असा होता. जेव्हा राजेमहाराजे आपल्या आवडत्या सरदाराला बक्षिस म्हणून सोन्या - चांदीचे अलंकार, आभुषणे देत असतं. त्यावेळी हे सोने- चांदीचे दागिणी मिळवण्यासाठी अनेक सरदार आपल्या मालकाला खुश करण्यासाठी काम करत. आता ही असेच एक प्रकरण घडलंय. पण इथे मालक घोटाळे बाज आणि सरदार भ्रष्टाचारी आहेत. हाच काय तो फरक. नुकतेच कोरोना काळात जम्बो कोविड सेंटरमध्ये १०० कोटी रुपयांचा मोठा आर्थिक घोटाळा केल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आलाय. ईडीने जाहिर केलेल्या आरोपपत्रानुसार हा घोटाळा घडवून आणण्यासाठी बेकायदेशीर कॉन्ट्रक्टचा म
मराठी माणूस उद्योगात यायचे म्हटलं की, जरा विचारच करतो. आपल्या अनुभवांचा फायदा इतरांना व्हावा, यासाठी मार्गदर्शन करण्याचे काम डोंबिवलीकर केदार पाध्ये करीत आहेत, त्यांच्याविषयी...
कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत ३२.४४ कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी (२९ सप्टें.) विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.
कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या आरोेपपत्रात धक्कादायक आरोप करण्यात आले आहेत. बीएमसी अधिकारी आणि राजकीय नेत्यांना लाच म्हणून सोन्याचे बार, बिस्किटे आणि नाणी वाटण्यात आली, असा दावा ईडीनं केला आहे. जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत ३२.४४ कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी (२९ सप्टें.) विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्
'द कश्मिर फाईल्स', 'द केरला स्टोरी' या चित्रपटांच्या यशानंतर आता दिग्दर्शक विवेक अग्निहोत्री 'द वॅक्सिन वॉर' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहेत. करोना काळात जगाला वाचवण्यासाठी भारतीय शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या कॉवॅक्सिन लसीबद्दलची सत्य कथा मांडणारा हा चित्रपट सध्या चर्चेत आला आहे. त्यांनी त्यावरुन केलेलं एक धक्कादायक वक्तव्य वादाचा विषय झाला आहे. अग्निहोत्री यांनी कॉग्रेसचे खासदार शशी थरुर यांच्यावर केलेले आरोप सोशल मीडियावर वेगळ्याच चर्चेचे कारण झाला आहे.
पाश्चिमात्य देशांनी भारताकडे आजपर्यंत कायम एक बाजारपेठ म्हणून व्यावसायिक दृष्टीनेच पाहिले. पण, मागच्या नऊ वर्षांत केंद्र सरकारने ‘मेक इन इंडिया’, ‘मेड इन इंडिया’, ‘स्किल इंडिया’, ‘स्टार्टअप्स इंडिया’ यांसारख्या महत्त्वाकांक्षी योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करत, भारताला जगातील एक मुख्य उत्पादक देश बनवले. त्याचाच परिणाम आज आपल्याला भारताच्या निर्यातीवाढीतून दिसून येतो. त्याचेच हे आकलन...
अभिनेते नाना पाटेकर यांची प्रमुख भूमिका असलेला द वॅक्सिन वॉर चित्रपट २७ सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक अग्निहोत्री यांनी केले असून पल्लवी जोशी चित्रपटाच्या निर्मात्या आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला, यावेळी नाना पाटेकर यांनी पत्रकार परिषदेत एक महत्वाचे विधान केले आहे. नाना पाटेकर असं म्हणाले की, “स्मशानात लागणारी लाकडं गोळा करुन ठेवली आहेत”. त्यांच्या या वक्तव्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
प्रवास विमा तुमच्या प्रवासादरम्यान विविध जोखीमांपासून संरक्षण देतो आणि तुमचा प्रवास सुरक्षित होण्यासाठी फायदेशीर ठरतो. प्रवासादरम्यान सामानाची चोरी, वैद्यकीय आणीबाणी, प्रवासादरम्यान अपघात, पासपोर्ट हरवणे, उड्डाण विलंब किंवा उड्डाण रद्द होणे इत्यादी सर्व प्रकारच्या परिस्थितीत या विम्यापासून आर्थिक संरक्षण मिळते. म्हणूनच नियमित प्रवास करणार्या प्रवाशांना प्रवास विम्याजवळ माहिती असणे आवश्यक आहे.
आर्थिक वर्ष २०२० ते २०२३ या कालावधीत देशात एकूण ५.२ कोटी नवीन रोजगार निर्माण झाले असल्याची माहिती ‘स्टेट बँक ऑफ इंडिया’च्या अहवालातून नुकतीच समोर आली आहे. देशात बेरोजगारी वाढली असल्याचा खोटा दावा करणार्या विरोधकांना ही आकडेवारी म्हणजे एक सणसणीत चपराक. सर्वच क्षेत्रात रोजगारांची संख्या पुरेशा प्रमाणात वाढत असून, केंद्र सरकारचे उपक्रम रोजगाराला चालना देणारे असेच ठरले असल्याचे, यातून स्पष्ट होते.