इतक्या लवकर कोरोना बरा झाला? अनंत-राधिकाच्या रिसेप्शनला अक्षय कुमारच्या हजेरीवर प्रश्न

    16-Jul-2024
Total Views |

akshay kumar 
 
 
मुंबई : अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा थाटामाटात लग्न सोहळा १२ जुलै रोजी देश-विदेशातील पाहुण्यांच्या आणि कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. त्यानंतर १४ जुला रोजी अनंत-राधिकाच्या लग्नाचा रिसेप्शन सोहळा झाला ज्यात बऱ्याच कलाकार मंडळींनी हजेरी लावली होती. यावेळी अभिनेता अक्षय कुमारची उपस्थिती काहीशी भुवय्या उंचावणारी होती.
अक्षय कुमारला कोरोनाची लागम झाल्याचे सांगण्यात आले होते, मात्र तरीही त्याने अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्यात हजेरी कशी लावली असा प्रश्न सध्या केला जात आहे.
 
अनंत आणि राधिकाच्या लग्नाच्या दोन दिवसांआधी अक्षय कुमारला कोरोना झाला अशी बातमी समोर आली होती. पण कोरोना झाल्यानंतरही तो अनंत-राधिकाच्या रिसेप्शन सोहळ्याला हजर राहिला. त्यामुळे नेटकऱ्यांना सध्या प्रश्न पडले आहेत. दोन चार वर्षांपूर्वी ज्या महामारीने संपूर्ण देश हादरुन गेला होता, तो आजार अक्षयला झाला. तरीही तो रिसेप्शनला कसा हजर राहिला असा गंभीर प्रश्न सगळ्यांना पडला आहे.
 
दरम्यान अक्षय कुमारने बायको ट्विंकल खन्नासोबत रिसेप्शनला हजरी लावली होती. नुकताच अक्षयचा रिसेप्शनमधला व्हिडीओ समोर आला आहे. यावर अनेकांनी कमेंट्स करत दोन दिवसांत याचा कोरोना बरा कसा झाला असा प्रश्न उपस्थित केला आहे. नुकताच अक्षयची प्रमुख भूमिका असणारा सरफिरा चित्रपट प्रदर्शित झाला होता. 
 
akshay kumar 
 
'सरफिरा'च्या प्रोडक्शन हाऊसच्या एका सूत्राने हिंदुस्तान टाईम्स सिटीला ही माहिती दिली होती. यावेळी सूत्रांनी म्हटलं होतं की, “अक्षय कुमार त्याच्या ‘सरफिरा’ चित्रपटाचे प्रमोशन करत होता. प्रमोशनच्या वेळी त्याला अस्वस्थ वाटू लागले होते. मग असे लक्षात आले की, प्रमोशन करणाऱ्या टीमचे काही क्रू सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर अक्षने कोविड चाचणी केली आणि शुक्रवारी सकाळी त्याची चाचणी पॉझिटिव्ह आली होती.
अग्रलेख
जरुर वाचा
प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ;  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्हयात शुभारंभ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहणार उपस्थित

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ 16 जून रोजी पालघर जिल्हयात करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास वन मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक, कौशल्य विकास रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके, आदिवासी विकास राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आदिवासी क्षेत्र आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित, राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल, खासदार डॉ. हेमंत सवरा, ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121