फुलेरा गावात निवडणुकीचा थरार; पंचायत सिझन ४ चा ट्रेलर प्रदर्शित!

    11-Jun-2025   
Total Views |


trailer of panchayat season 4 released!


मुंबई :
अमेझॉन प्राइम व्हिडिओवरील सर्वाधिक लोकप्रिय वेबसिरीजपैकी एक असलेली 'पंचायत' पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येण्यासाठी सज्ज झाली आहे. जितेंद्र कुमार, नीना गुप्ता आणि रघुबीर यादव यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या मालिकेच्या चौथ्या सिझनचा ट्रेलर आज ११ जून रोजी प्रदर्शित करण्यात आला. या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

फुलेरा गावात निवडणुकीची रणधुमाळी
चौथ्या सिझनमध्ये फुलेरा गावात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. या निवडणुकीत माजी सरपंच मंजू देवी आणि विरोधी पक्षातील क्रांती देवी आमनेसामने उभ्या ठाकल्या आहेत. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार सुरू आहे. प्रत्येकजण विजयासाठी कोणतीही कसर ठेवायला तयार नाही. गावात राजकीय वातावरण तापलेले असतानाच, रिंकी आणि सचिव (जितेंद्र कुमार) यांच्या प्रेमकथेनेही वेग पकडला आहे.

प्रेमकथेचा नवा टप्पा?
या सिझनमध्ये रिंकी आणि सचिव यांच्यातील संबंध अधिक जवळीक साधताना दिसतात. ट्रेलरमध्ये त्यांच्यातील काही रोमँटिक दृश्येही दाखवण्यात आली आहेत. आता या दोघांचे नाते पुढे काय वळण घेणार? लग्न होणार का? हे सर्व जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना सिझन ४ ची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

प्रदर्शनाची तारीख जाहीर
'पंचायत' च्या तीनही सिझन्सना प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिले. आता, 'पंचायत ४' २४ जून रोजी प्राईम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे. केवळ १३ दिवसांचा अवधी उरलेला असल्याने चाहत्यांमध्ये उत्सुकता आणखी वाढली आहे.
 
कलाकार व निर्मिती
या सिझनमध्ये जितेंद्र कुमारसोबत नीना गुप्ता, रघुबीर यादव, फैसल मलिक, चंदन रॉय, संविका आणि इतर अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकांमध्ये झळकणार आहेत. ‘पंचायत ४’ चे लेखन चंदन कुमार यांनी केले असून दिग्दर्शनाची धुरा दीपक कुमार मिश्रा यांनी सांभाळली आहे.



अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

डिजिटल व्यवहारविश्वात हवे सायबर खबरदारीचे भान

जगभरात भारताच्या डिजिटल प्रगतीची प्रशंसा केली जाते. ‘युनिफाईड पेमेंट इंटरफेस’ (यूपीआय)ची सेवा जगभरातील काही देशांनी स्वीकारली आहे. भारताची डिजिटल क्षेत्रातील ही प्रगती विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे स्मार्ट पाऊल म्हणावे लागेल. मोदी सरकारला नुकतीच ११ वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने, सरकारच्या अनेक उपलब्धींपैकी एक असलेल्या डिजिटल व्यवहार प्रणालीचेही विशेषत्वाने कौतुक करण्यात आले. पण, अशापद्धतीने व्यवहार करताना बँक ग्राहकांनी ‘यूपीआय’ आणि ‘डिजिटल वॉलेट’ पेमेंट सिस्टममधील फरक समजून घेण्याबरोबरच खबरदारी ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121