'दंगल' पाकिस्तानमध्ये प्रदर्शित का झाला नाही? आमिर खानची स्पष्टवक्ती ''झेंडा आणि राष्ट्रगीत काढायला सांगितलं...

    14-Jun-2025   
Total Views | 13


why wasn


मुंबई : 'दंगल' हे २०१६ मध्ये प्रदर्शित झालेलं आमिर खानचं सर्वात यशस्वी चित्रपटांपैकी एक ठरलं. भारतातच नव्हे तर जगभर या चित्रपटाला प्रचंड लोकप्रियता मिळाली. मात्र, हा चित्रपट पाकिस्तानमध्ये कधीच प्रदर्शित झाला नाही. अनेकांना या गोष्टीचं आश्चर्य वाटलं होतं. अखेर, वर्षांनंतर आमिर खानने यामागचं कारण ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात उघड केलं आहे.

आमिरने सांगितलं की, ''दंगल प्रदर्शित होत असताना डिज्नी हे त्या चित्रपटाचे सादरकर्ते होते. पाकिस्तानच्या सेन्सॉर बोर्डाने त्यांना सांगितलं की, जेव्हा गीता फोगट सामना जिंकते, त्या दृश्यामधून भारतीय राष्ट्रध्वज आणि राष्ट्रगीत काढावं लागेल. अन्यथा हा चित्रपट आम्ही रिलीज करू शकणार नाही.'' ही मागणी ऐकून चित्रपटाच्या निर्मात्यांना आर्थिक नुकसान होईल का, याची चिंता वाटत होती. मात्र, आमिरने निर्णय घेण्यासाठी एक क्षणही घेतला नाही.

तो पुढे म्हणाला, ''मी लगेच सांगितलं, जर कोणी माझ्या देशाचा झेंडा आणि राष्ट्रगीत काढायला सांगत असेल, तर मला तिथे चित्रपट प्रदर्शित करण्यात कोणताही स्वारस्य नाही. त्यांनी म्हटलं, यामुळे बिझनेसवर परिणाम होईल, पण मी स्पष्टपणे सांगितलं की, त्याची मला पर्वा नाही.''

पाकिस्तानात प्रदर्शित न होतानाही 'दंगल' हा चित्रपट जगभरात सुपरहिट ठरला. केवळ भारतातच नव्हे, तर चीनसारख्या बाजारातही त्याने अनेक विक्रम मोडीत काढले. Sacnilk च्या आकडेवारीनुसार, या चित्रपटाने जगभरात तब्बल २,०७०.३ कोटी कमाई केली.

आमिर खानचा पुढचा चित्रपट 'सितारे ज़मीन पर'
'दंगल' आणि 'लाल सिंग चड्ढा' नंतर काही काळ चित्रपटसृष्टीपासून दूर असलेला आमिर आता पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पुनरागमन करत आहे. २० जून २०२५ रोजी त्याचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'सितारे ज़मीन पर' प्रदर्शित होणार आहे.

आर.एस. प्रसन्ना दिग्दर्शित या स्पोर्ट्स कॉमेडी-ड्रामामध्ये आमिर एका आत्मविश्वासपूर्ण आणि मजेशीर कोचच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याच्यासोबत जिनेलिया देशमुख प्रमुख भूमिकेत असून, या चित्रपटातून १० नवोदित कलाकार हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत आहेत. यामध्ये अरूष दत्ता, सम्वित देसाई, ऋषी शहानी, सिमरन मंगेशकर यांचा समावेश आहे.


अनिरुद्ध गांधी

ठाण्यातल्या के. जी. जोशी महाविद्यालयातून पत्रकारतेची पदवी प्राप्त. मुंबई विद्यापीठातून मराठी साहित्यात एम.ए पदवी प्राप्त. गेले ९ वर्ष मालिका, चित्रपट, नाटक यांमधून काम केले. लघुपट, नाटक लिखाणाची आवड. अभिनय क्षेत्रात राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121