नवी दिल्ली : इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) ने सरकारी आणि काही जुन्या खाजगी पिढीतील बँक कर्मचार्यांसाठी १५ टक्के पगारवाढ प्रस्तावित केली आहे. तसेच लवकरच आठवड्यातून पाच दिवस काम सुरू करण्याचीही योजना आहे. दि.२६ ऑक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता, मात्र इतर बदलांसह पगारात आणखी वाढ करण्याची मागणी अनेक संघटना करत आहेत.
दुसरीकडे, PNB सारख्या बँकांनी पगार वाढीसाठी जास्त तरतुदी करण्यास सुरुवात केली आहे. या बँका पगारात १० टक्के वाढ करण्यासाठी वेगळे बजेट बनवत आहेत. तसेच १५ टक्के पगारवाढीसाठी रक्कम बाजूला ठेवली आहे. म्हणजेच हे दोन्ही प्रस्ताव मंजूर झाल्यास या बँकांच्या कर्मचाऱ्यांच्या पगारात २५ टक्क्यांनी वाढ होऊ शकते.
तसेच संघटना आणि कर्मचारी म्हणतात की,बँकांनी आर्थिक वर्ष २०२४ च्या सप्टेंबर तिमाहीत चांगला नफा कमावला आहे आणि कोविड दरम्यान, कर्मचार्यांनी कर्जदारांना परत रुळावर आणण्याबरोबरच सरकारी योजना काम करणे आणि पुढे नेण्यात चांगले काम केले आहे. अशा परिस्थितीत कर्मचार्यांना अधिक चांगल्या भरपाईची पात्रता आहे आणि त्यांच्या पगारात १५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली पाहिजे.
पुढील वर्षी सार्वत्रिक निवडणुका होणार असून अर्थ मंत्रालयाशी बोलणी करून त्यावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे. सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी कर्मचाऱ्यांच्या पगारवाढीचा प्रस्ताव मंजूर होण्याची शक्यता आहे. सरकारसोबत तीन वर्षांच्या दीर्घ वाटाघाटीनंतर २०२० मध्ये बँक कर्मचाऱ्यांच्या पगारात शेवटची वाढ करण्यात आली होती.
आठवड्यातून पाच दिवस काम
बँक कर्मचार्यांसाठी कामाबाबत आठवड्यातून पाच दिवसांचा नियम लागू करावा, असेही प्रस्तावित करण्यात आले आहे. हा प्रस्ताव लागू झाल्यानंतर कर्मचाऱ्यांचे कामाचे तास वाढतील आणि त्यानंतर त्यांना आठवड्यातून दोन दिवस सुट्टी मिळणार आहे.