हिंदू लोकसंख्येचे असंतुलन हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा – मिलिंद परांडे - विहिंप राबवणार देशव्यापी जनजागरण अभियान

    12-Jun-2025   
Total Views |


नवी दिल्ली, देशात हिंदूंच्या लोकसंख्येतील असंतुलन हा राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. विश्व हिंदू परिषद (विहिंप) त्याविरोधात देशव्यापी अभियान राबवणार आहे, अशी माहिती विहिंपचे राष्ट्रीय संघटनमंत्री मिलिंद परांडे यांनी झाशी येथे पत्रकारपरिषदेत दिली.

हिंदू लोकसंख्येच्या रचनेतील धार्मिक असंतुलन आता देशाच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि सुरक्षा व्यवस्थेसाठी गंभीर चिंतेचा विषय बनला आहे. या असंतुलनामागे अनेक नियोजित कारणे असून त्यामध्ये विशेषतः धार्मिक धर्मांतर, लव्ह जिहाद, बांगलादेश आणि म्यानमारमधून मुस्लिम घुसखोरी आणि हिंदू समाजात घटणारा जन्मदर यांचा समावेस आहे. आर्थिक प्रलोभने, कपट किंवा दबावाद्वारे मिशनऱ्यांनी केलेल्या नियोजित धर्मांतरामुळे अनेक भागात स्थानिक हिंदू लोकसंख्या कमी झाली आहे. सुनियोजित रणनीती अंतर्गत, मुस्लिमांचा एक गट हिंदू मुलींना अडकवून त्यांचे धर्मांतर करत आहे, जो केवळ वैयक्तिक नाही तर सांस्कृतिक हल्ला आहे. आसाम, पश्चिम बंगाल, त्रिपुरा सारख्या सीमावर्ती राज्यांमध्ये आणि आता दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान सारख्या राज्यांमध्ये रोहिंग्या मुस्लिम घुसखोरांची संख्या चिंताजनकपणे वाढत आहे, याकडे परांडे यांनी लक्ष वेधले.

शिक्षण आणि अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून जागरूक असलेल्या हिंदू समाजात कुटुंब मर्यादित ठेवण्याची प्रवृत्ती आहे, परंतु इतर वर्गांमध्ये यावर कोणतेही नियंत्रण नाही, ज्यामुळे असंतुलन आणखी वाढत आहे. अलिकडेच, संयुक्त राष्ट्र लोकसंख्या निधीच्या अहवालात भारतातील लोकसंख्या वितरणाचा सखोल आढावा सादर करण्यात आला आहे. अहवालानुसार, काही वर्गांमध्ये जन्मदर स्थिर किंवा वाढत असताना, हिंदू समाजात हा दर कमी होत आहे. त्यामुळे याविषयी देशभरात जनजागरण करण्यासाठी विहिंप देशव्यापी अभियान राबवणार असल्याचे परांडे यांनी नमूद केले.