'माझं कुटूंब माझी जबाबदारी'चा खरा अर्थ उघड! सुजित पाटकरवर ईडीचा मोठा ठपका!

    30-Sep-2023
Total Views | 91

sujit patkar 
 
 
मुंबई : कोविड सेंटर घोटाळा प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे. जुलै २०२० ते फेब्रुवारी २०२२ या काळात वरळी आणि दहिसर या दोन कोविड सेंटरमध्ये अनियमितता झाल्याचे ईडीने सांगितले आले. या कालावधीत ३२.४४ कोटी रुपये बेकायदेशीररित्या कमावले गेले. शुक्रवारी (२९ सप्टें.) विशेष न्यायालयाने लाइफलाइन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेसचीही दखल घेतली. ज्यांच्या विरोधात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.
 
 
या संपूर्ण प्रकरणावर भाजप मुंबईच्या ट्विटर अकाऊंटद्वारे ट्विट करण्यात आले आहे. "राजकीय हितसंबंधातूनच व्यावसायिक सुजित पाटकर याला जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळाले... अडीच वर्षांच्या काळात फक्त वसुली ,वाझेगिरी आणि माझे कुटुंब माझी जबाबदारी!" असा उल्लेख ट्विटमध्ये करण्यात आला आहे.
 
कंपनीच्या भागीदारांनी BMC अधिकारी आणि इतर लोकांमध्ये ६० लाख रुपयांपेक्षा जास्त किंमतीचे सोने वाटप केले होते. हे पैसे सोने, नाणी आणि बिस्किटांच्या रूपात देण्यात आले. ईडीने दावा केला आहे की, दहिसर केंद्रात केवळ ५० टक्के कर्मचारी ड्युटीवर होते.
 
वरळी आणि दहिसर या दोन केंद्रांचे कंत्राट २०२० मध्ये या फर्मला देण्यात आले होते. कंपनीच्या चार भागीदारांनी मिळून बेकायदेशीरपणे पैसे कमावल्याचा आरोप आहे. या चार जणांमध्ये संजय शहा आणि राजीव साळुंखे यांच्याशिवाय सुजित पाटकर, हेमंत गुप्ता यांचा समावेश आहे. कर्मचारी अरविंद सिंग आणि दहिसर केंद्राचे डीन डॉ. किशोर बिसुरे हे संशयाच्या भोवऱ्यात आहे.
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

धर्मांतरविरोधी कायदा आणि सध्याचा गोेव्यातील हिंदू समाज

गोवा म्हटले की नजरेसमोर येतात ती फुलांची आरस केलेली देवालये आणि नितांत सुंदर समुद्रकिनारे! मात्र, गेल्या काही वर्षांत हिंदू संस्कृतीच्या सर्व खुणा अभिमानाने मिरवणार्‍या गोव्यामध्ये, धर्मांतरणाच्या द़ृष्टचक्राने वेग घेतला आहे. इस्लामी आणि ख्रिस्ती धर्मांतरणामुळे भविष्यात गोव्यातील हिंदू लोकसंख्या धोक्यात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळेच धर्मांतरणविरोधी कायद्याची गरज नुकतीच गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी व्यक्त केली आहे. गोव्यातील धर्मांतरणाच्या या वाढत्या समस्येचा घेतलेला मागोवा.....

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

शिवदूर्गांचा जागतिक सन्मान: नेतृत्वाच्या प्रयत्नांची गाथा...

‘युनेस्को’ने शिवरायांच्या 12 गडकिल्ल्यांना जागतिक वारशाचा दर्जा नुकताच जाहीर केला. या घोषणेनंतर महाराष्ट्राची मान अभिमानाने पुन्हा एकदा उंचवली. त्याचबरोबर पुन्हा एकदा याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न, काहीजणांकडून जाणीवपूर्वक केला जात आहे. पण, प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या शिरपेचात आलेल्या या यशाचे खरे मानकरी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच आहेत, यात कोणतीही शंका नाही. मुळात या गडकिल्ल्यांना वारसा दर्जा मिळण्याची संपूर्ण प्रक्रिया लक्षात घेतली, तर हे आपल्या नक्कीच लक्षात..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121