मंत्रालयातील कर्मचारी घेणार प्लास्टिक न वापरण्याची शपथ

प्लास्टिक न वापरण्याची शपथ

    04-Jun-2025
Total Views |

Ministry employees will take a pledge not to use plastic


मुंबई : जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने गुरुवार, दि. ५ जून रोजी मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी हे त्यांच्या वापरातील एकल प्लास्टिक टाकून देणार असून, ‘प्लास्टिक वापरणार नाही’ अशी शपथ घेणार आहेत. पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे. यावेळी कापडी पिशव्यांचे वाटप केले जाणार आहे.

दरवर्षी दि. ५ जून रोजी जागतिक पर्यावरण दिवस साजरा केला जातो. या वर्षाची पर्यावरण दिवसाची संकल्पना (थीम) ‘जागतिक स्तरावर प्लास्टिक प्रदूषणाचा अंत करणे’ अशी आहे. ही संकल्पना केंद्र शासनाने स्विकारलेल्या मिशन लाईफशी संलग्न आहे. मिशन लाईफमध्ये पर्यावरणपूरक जीवनशैलीचा स्विकार करण्यात आला आहे. त्यामध्ये एकल वापराच्या प्लास्टिकला नकार देणे व प्लास्टिकचा कचरा रोखणे या बाबींचा समावेश आहे. पर्यावरणास सर्वात जास्त धोका प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदुषणाचा आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली राज्य शासनाचा पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग एकल वापराच्या प्लास्टिक बंदीसाठी वेगवेगळे उपक्रम राबवित आहे.

या मोहिमेची सुरुवात मंत्रालयापासून करण्यात येणार असून दि. ५ जून रोजी सकाळी मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात प्लास्टिकला पर्याय म्हणून कापडी पिशव्यांचे वाटप पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी मंत्रालयातील सर्व प्रशासकीय विभागातील अधिकारी - कर्मचारी या अभियानात सहभागी होऊन आपल्या प्रशासकीय विभागात असणारे एकल प्लास्टिक एकत्रित करुन त्रिमूर्ती प्रांगण येथे जमा करणार आहेत. यासाठी या ठिकाणी विशेष व्यवस्था करण्यात येणार आहे. यामध्ये कार्यालयात न वापरले जाणारे (निरुपयोगी) प्लास्टिक फोल्डर, पाण्याच्या प्लास्टिक बॉटल्स, प्लास्टिक पिशव्या आदींचा समावेश आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
महानिर्मिती १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

महानिर्मिती १०७१ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती राज्यात शाश्वत विकासास चालना देण्यासाठी महानिर्मितीतर्फे १,०७१ मेगावॅट क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प मुख्यमंत्री सौरऊर्जा प्रकल्प २.०अंतर्गत लवकरच कार्यान्वित होणार आहेत. या प्रकल्पांमुळे राज्यातील तीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शेतक-यांना सिंचनासाठी दिवसा अखंडित वीजपुरवठा देवून शेतीची उत्पादनक्षमता वाढविण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवित आहे. यामुळे पारंपरिक ऊर्जेवरील ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121