काँग्रेसमध्ये जुने, निष्ठावंत नाराज असंतोष वाढीला; माजी आ. कुणाल पाटील लवकरच भाजपत जाणार

    24-Jun-2025   
Total Views | 53

मुंबई : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका तोंडावर असताना, काँग्रेसमध्ये मोठी फूट पडण्याचे संकेत मिळत आहेत. संघटनात्मक गोंधळ, निर्णयक्षमतेचा अभाव आणि संवादाचा तुटलेला धागा, यामुळे नाराज नेते नव्या पर्यायाच्या शोधात आहेत. काँग्रेसचा पारंपरिक गड असलेल्या धुळे जिल्ह्यातूनही असाच सूर उमटत असून, माजी आमदार कुणाल पाटील कुस बदलण्याच्या तयारीत आहेत. ते येत्या २८ जून रोजी भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती उच्चपदस्थ सूत्रांनी दिली.

धुळे ग्रामीणमध्ये काँग्रेसचे राजकारण कुणाल पाटील यांच्या भोवती केंद्रित आहे. त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि युवकांमधील प्रभावामुळे स्थानिक संघटन त्यांच्या भोवती एकवटलेले आहे. अशा स्थितीत जर त्यांनी पक्ष सोडला, तर काँग्रेसला संघटनात्मक पातळीवर मोठा हादरा बसेल, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये त्याचा थेट फटका बसण्याची शक्यता आहे.

कुणाल पाटील यांचे घराणे काँग्रेसमध्ये निष्ठावान मानले जाते. त्यांचे वडील रोहिदास पाटील हे काँग्रेस सरकारमध्ये मंत्री होते. गांधी कुटुंबाशी त्यांचे थेट संबंध होते. राहुल गांधी यांनी धुळे भेटीत त्यांच्या घरी पाहुणचार घेतला होता. मात्र आता त्याच घराण्याचा वारस भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चेमुळे काँग्रेसची कोंडी झाली आहे.

रविंद्र चव्हाणांची भेट खासगी कामासाठी – कुणाल पाटील

विधानसभेतील पराभवापासून कुणाल पाटील हे काँग्रेसवर नाराज आहेत. काही स्थानिक नेत्यांनी या निवडणुकीत विरोधात काम केल्याची त्यांची भावना आहे. अशावेळी त्यांनी भाजपचे प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या. याविषयी त्यांना विचारले असता, “ती भेट खासगी कामासाठी होती, कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही,” असे त्यांनी स्पष्ट केले.

सुहास शेलार

'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये 'मंत्रालय प्रतिनिधी' म्हणून कार्यरत. मुंबई विद्यापीठातून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. गेल्या आठ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत. महाराष्ट्राचे राजकारण आणि त्यासंबंधीच्या वृत्तांकनामध्ये विशेष रस. २०१४, २०१९ आणि २०२४ सालच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे वार्तांकन. २०१८ साली राजस्थानमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या प्रत्यक्ष वार्तांकनाचा अनुभव.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, मला विचारल्याशिवाय...

राज ठाकरेंची पक्षसंघटनेवर आचारसंहिता! म्हणाले, "मला विचारल्याशिवाय..."

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षातील सर्व नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना एक ठाम आणि स्पष्ट आदेश दिला आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, "पक्षातील कोणताही नेता, कार्यकर्ता, प्रतिनिधी यांनी कोणत्याही वृत्तपत्र, वृत्तवाहिनी किंवा डिजिटल माध्यमांशी संपर्क साधू नये. तसेच, स्वतःचे मत व्हिडीओच्या माध्यमातून सोशल मीडियावर अपलोड करणेही थांबवावे." याशिवाय, त्यांनी पक्षाचे अधिकृत प्रवक्ते यांनाही इशारा दिला आहे. राज ठाकरे म्हणाले, "ज्यांना अधिकृत प्रवक्त्याची जबाबदारी दिली आहे त्यांनी सुद्धा माझी परवानगी घेतल्याशिवाय ..

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेची अधिसूचना जाहीर ; पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पाठपुराव्याला यश

राज्यातील विविध विकास कामे व प्रकल्पांना किनारी क्षेत्र नियमन (सीआरझेड) अंतर्गत वेळेवर मंजुरी मिळावी यासाठी महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचना व्हावी यासाठी राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यांच्या या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून, केंद्र सरकारच्या पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण पुनर्रचित करत अधिसूचना जारी केली आहे...

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121