साताऱ्यातील आंधळी बोगद्याचे अस्तिरकरणाचे काम १६ दिवसात पूर्ण; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

    08-Jul-2025   
Total Views | 11

मुंबई : सातारा जिल्ह्यातील कै. लक्ष्मणराव इनामदार उपसा सिंचन योजना प्रकल्पांतर्गत आंधळी बोगद्याचे अस्तरीकरण करण्याचे काम फक्त १६ दिवसांत पूर्ण करण्यात आले असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवार, ८ जुलै रोजी विधान परिषदेत दिली.

विधान परिषद सदस्य शशिकांत शिंदे यांनी प्रश्नोत्तराच्या तासात हा प्रश्न विचारला होता. यावर बोलताना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, "बोगद्याचे काम करताना संबंधित विभागाच्या सर्व परवानग्या मिळाल्या असून याबाबत कोणत्याही तक्रारी प्राप्त झाल्या नाही. तसेच या १६ दिवस चाललेल्या क्रशरसाठी ५ लाख २४ हजार ८८ रुपये आणि त्यानंतर ५ लाख ६९ हजार ६०० आणि ६५ हजार रुपयांची रॉयल्टी भरली गेली आहे," असे त्यांनी सांगितले.


अवंती भोयर

विज्ञान शाखेतील पदवीनंतर भारतीय जनसंचार संस्थान (IIMC) अमरावतीतून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण. 'दै. मुंबई तरुण भारत'मध्ये वेब उपसंपादक या पदावर कार्यरत. शेती, साहित्य, राजकारण या विषयात विशेष रस. हस्तकला, संगीत आणि कविता लेखनाचा छंद....
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121