१ जूनपासून एसटी कर्मचाऱ्यांना ५३% महागाई भत्ता

एसटी कर्मचाऱ्यांना राज्य शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे महागाई भत्ता

    04-Jun-2025
Total Views | 14

st



मुंबई, दि.४: प्रतिनिधी 
एसटीच्या सुमारे ९० हजार कर्मचाऱ्यांना १ जून पासून राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ५३% महागाई भत्ता देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ते सह्याद्री अतिथीगृहावर परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी बोलावलेल्या सर्व एसटी कर्मचारी संघटनांच्या कृती समिती समोर बोलत होते.


यावेळी बैठकीला परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक माजी खासदार आनंदराव अडसूळ,आमदार सदाभाऊ खोत, अतिरिक्त मुख्य सचिव (परिवहन ) संजय सेठी ,एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह सर्व कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीमध्ये परिवहन खाते माझ्याकडे होते. त्यावेळी एसटीच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनामध्ये साडेसहा हजार रुपये वाढ करण्याचा धाडसी निर्णय घेण्यात आला. त्याचा लाभ १ लाख एसटी कर्मचाऱ्यांना झाला आहे. त्याचे समाधान निश्चितच आहे. परंतु त्याबरोबरच महिलांना तिकीट दर ५०% सवलत व ७५ वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास या शासनाने दिलेल्या सवलतीमुळे एसटीच्या प्रवासी संख्येत भरघोस वाढ झाली. त्यामुळे एसटीचे एकूण अर्थकारण बदलून ती नफ्याच्या दिशेने प्रवास करू लागली हा खूप मोठा बदल आपल्या काळात घडून आला. भविष्यात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या नेतृत्वाखाली एस टी महामंडळ हे निश्चित नफ्याच्या दिशेने वाटचाल करेल याबरोबरच प्रवासी सेवेचा दर्जा उंचावण्यास देखील मदत होईल असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.


या वेळी बोलताना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक म्हणाले की, राज्य शासनाची महात्मा फुले जन आरोग्य योजना व केंद्र शासनाची आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना त्यांचे एकत्रीकरण करून त्याचा ५ लाख रुपये पर्यंतचा कॅशलेस लाभ सर्व एसटी कर्मचाऱ्यांना देण्यात येईल. तसेच धर्मवीर आनंद दिघे आरोग्य योजने अंतर्गत शासकीय कर्मचाऱ्यांच्या प्रमाणे ९०% वैद्यकीय चाचण्या व खर्चाची प्रतिपुर्ती रक्कम देण्याची योजना सुद्धा कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येत आहे.
'मुंबई तरुण भारत'चं व्हॉट्सअप चॅनल फॉलो करा!
अग्रलेख
जरुर वाचा
राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यात १ लाख ३५ हजार ३७१ कोटींच्या गुंतवणूक प्रस्तावांना मंजुरी ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानाधारित उद्योगांचा समावेश

राज्यातील उद्योगांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी बुधवारी उद्योग विभागाच्या मंत्रीमंडळ उपसमितीने राज्यातील थ्रस्ट सेक्टर आणि उच्च तंत्रज्ञानावर आधारित उद्योगांच्या १ लाख ३५ हजार ३७१ कोटी ५८ लाख रुपयांच्या प्रस्तावांना मान्यता दिली. यामुळे राज्यात सुमारे १ लाख प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार आहे. या प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास व रोजगार निर्मितीला चालना मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले...

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

‘न्यू इंडिया’चे विलीनीकरण सप्टेंबर आधीच मार्गी लागणार; सारस्वत बँक, सर्व ठेवीदारांना पूर्ण संरक्षण देण्याची ग्वाही

घोटाळ्यात सापडलेल्या ‘न्यू इंडिया को‑ऑपरेटिव्ह बँके’चे विलीनीकरण सारस्वत बँकेमध्ये येत्या ऑगस्ट‑सप्टेंबर पर्यंत पूर्ण होणार आहे. सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले की, या प्रक्रियेत कोणत्याही गुंतवणूकदाराचे नुकसान होऊ देणार नाही. ठाकूर म्हणाले, “सर्व गुंतवणूकदारांना कोणत्याही रकमेचे नुकसान न होता मुलभूत रक्कम मिळेल.” सध्याच्या परिस्थितीत, ज्यांना त्यांच्या खात्यातून एकावेळी २५ हजार पेक्षा जास्त रक्कम काढता येत नाही, त्यांना विलीनीकरणानंतर त्यांच्या पूर्ण रकमेची खात्री दिली ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121