मराठी भावगीत आणि भक्तीगीत खासगी रेडिओवरून नियमित प्रसारित करा

- सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची सूचना

    21-May-2025
Total Views | 10

मराठी भावगीत आणि भक्तीगीत खासगी रेडिओवरून नियमित प्रसारित करा

मुंबई, ग्रामोफोन आणि कॅसेटच्या जमान्यातील मराठी भावगीत, भक्तीगीते आजही मराठी मनावर अधिराज्य करणारी आहेत. त्यामुळे आजच्या नव्या रेडिओ स्टेशनवरून ही भावगीत आणि भक्तीगीते नियमित प्रसारित करा, अशी सूचाना सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी बुधवार, दि. २१ मे रोजी केली.

मंत्रालयातील दालनामध्ये शेलार यांनी खासगी रेडिओ क्षेत्रातील प्रतिनिधींशी संवाद साधला. रेडिओ या माध्यमातून मराठी भाषेला प्राधान्य मिळावे तसेच सरकार आणि खासगी रेडिओचे नवे जग यामध्ये समन्वय असावा, यासाठी हा संवाद आयोजित करण्यात आला होता. भाजपच्या पदाधिकारी हेतल मेहता यांच्या पुढाकाराने झालेल्या या बैठकीत रेड एफएम, रेडिओ सीटी ९१.१, यांच्यासह या क्षेत्रातील प्रतिनिधी, आरजे उपस्थित होते.

रेडिओ क्षेत्रातील आव्हाने आणि अडचणींबद्दल यावेळी चर्चा करण्यात आली. मंत्री शेलार यांनी सांगितले की, आमच्या बालपणीचा काळ हा आकाशवाणीवरुन लागणाऱ्या गीतांशी जोडलेला होता. आमची पिढी ही त्याकाळी रेडिओ वरुन वाजणाऱ्या गीतांच्या एका प्रभावात वाढलेली आहे. महाराष्ट्रातील दर्शक हे भाव आणि भक्तीगीतांशी एका वेगळ्या नात्याने जोडलेले आहेत. आजही शहरापासून खेड्या पर्यंत सत्यनारायणाची पुजा असली की, प्रल्हाद शिंदे यांची अजरामर गीते वाजल्याशिवाय सत्यनारायणाची पुजा आहे असे वाटतच नाही. अशाच प्रकारे कॅसेटच्या जमान्यातील भावगीत आणि भक्ती गीतांशी महाराष्ट्रातील तमाम श्रोतावर्ग जोडला गेलेला आहे त्यामुळे ही गाणी पुन्हा खाजगी रेडिओवरुन प्रसारित करा, महाराष्ट्र तुम्हाला नक्की प्रतिसाद देईल, असे मंत्री शेलार यांनी सांगितले.


अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121