दिल्ली : ( Cyclone Shakti in the Bay of Bengal ) भारतीय हवामान विभागाने अंदमान समुद्रावरील हवामानात चक्रीय वार्याचे क्षेत्र निर्माण होत असल्याचे निरीक्षण नोंदवले आहे. दि. 16 मे ते दि. 22 मे यादरम्यान हे क्षेत्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होण्याची अधिक शक्यता आहे.
पुढे बंगालच्या उपसागरात हे हवामान क्षेत्र विकसित होऊन दि. 23 मे ते दि. 28 मे यादरम्यान ’चक्रीवादळ शक्ती’मध्ये रूपांतरित होऊ शकते, असा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. याचा संभाव्य फटका भारतातील ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनारी भागांसह बांगलादेशमधील खुलना, चटग्राम या भागांना बसण्याची शक्यता आहे.