नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव पुन्हा वाढल्याचे चित्र सध्या आहे. भारत सरकारने नवी दिल्लीतील पाकिस्तान उच्चायुक्तालयातील एका पाकिस्तानी अधिकाऱ्याला 'पर्सोना नॉन ग्राटा' असल्याचे घोषित केले.
‘पर्सोना नॉन ग्राटा’ म्हणजे अशी व्यक्ती जी नियुक्त केलेल्या पदासाठी अमान्य किंवा अयोग्य असल्याची घोषणा करणे.
पाकिस्तानातील भारतीय अधिकाऱ्यावर त्याने पदाच्या मर्यादेबाहेर जाऊन कारवाया केल्या, असा आरोप केला आहे. म्हणून त्यांना २४ तासांच्या आत भारत सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
याबद्दल भारत सरकारने अधिकृत संकेतस्थळावर माहिती दिली आहे. याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तान उच्चायुक्तालयानेही भारतीय अधिकारी 'पर्सोना नॉन ग्राटा' असल्याचे घोषित केले. २४ तासाच्या आत पाकिस्तानबाहेर पडायचा आदेश दिला आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावामुळे असे कठोर निर्णय भारत सरकार घेताना दिसून येते आहे.
पहलगामवर झालेला भीषण हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर, भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले. त्यानंतरही पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांनी भारतीय सैन्य दलावर हल्ला करण्याचे अनेक प्रयत्न केले. ह्या हालचालींना प्रत्युत्तर देण्याताठी भारताने 'पर्सोना नॉन ग्राटा'चे पाऊल उचलण्यात आले आहे.
भारत पाकिस्तानातील तणाव हा अंतर्गत
भारत-पाकिस्तान तणाव आम्ही दूर केला, असा दावा करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना कडक शब्दांत परराष्ट्र मंत्रालयाने इशारा दिला आहे. भारत आणि पाकिस्तान संदर्भात जी युद्धविरामाची चर्चा आहे, किंवा करार आहेत, ते दोन देशांच्या अंतर्गत आहे. पीओके आणि इतर समस्या आम्ही द्विपक्षीय म्हणूनच सोडवणार असून तिसऱ्या मध्यस्थाची इथे गरज नाही, असेही अमेरिकेला सांगण्यात आले आहे.