मुंबई : दिवाळी सणाच्या काळात कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. या बोनसरुपी म्हणून काही कंपन्यांकडून कार, बाईक अशा महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. दरम्यान, दिवाळी बोनस जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरांपासून ते अगदी खाजगी कंपनी काम करणाऱ्यापर्यंत सर्वांनाच मिळत असतो. पण हा बोनस देण्याचा निर्णय केव्हापासून अतस्तित्वात आला याची एक रंजक गोष्ट आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.
खरंतर, बोनस देण्याची पध्दत ही ब्रिटिशांनी येथे रुजवली आहे. ब्रिटिश राजवटीत येथील कामगारांना विशेषतः सणासुदीच्या काळात काही भेट म्हणून देण्यात यावे, याकरिता भेटवस्तू देण्याची प्रथा रुजू झाली. एकंदरीत, दिवाळीच्या उत्साहवर्धक बोनससाठी आपण ब्रिटिशांचे आभार मानले पाहिजेत. भारतात जेव्हा ब्रिटीश राजवट सुरू झाली तेव्हा साप्ताहिकाऐवजी मासिक वेतन प्रणाली लागू करण्यात आली. म्हणजे कर्मचाऱ्यांना ५२ ऐवजी ४८ आठवड्यांचा पगार मिळू लागला. मग विरोध सुरू झाला म्हणून ज्यामुळे ब्रिटिशांना तोडगा काढावा लागला.
तेव्हापासून भारतात दिवाळी बोनस देण्यास सुरुवात होऊन काही ठिकाणी १३ व्या महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगारांना जेव्हा पगाराचं गणित समजलं तेव्हा महाराष्ट्रातील कामगारवर्ग आक्रमक झाला. आणि महाराष्ट्रातील कामगारांनी १३ महिन्यांचा पगार मिळावा अशी मागणी करत आंदोलन केले होते. कामगारांनी केलेल्या आंदोलनाची दखल इंग्रज सरकारने घेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
दरम्यान, दिवाळी सण हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण असल्याने या सणाच्या आधी एक पगार द्यायचे असे इंग्रज सरकारचे ठरवले. तो पगार म्हणजे दिवाळी बोनस म्हणून गणला जातो. त्यानुसार, ३० जून १९४० साली अशाप्रकारे पगार देण्याची पद्धत सुरू झाली, आणि त्याचा कायदा लागू देखील करण्यात आला होता.