दिवाळी बोनस देण्याची पध्दत कुठून आली माहितीये का, जाणून घ्या

    11-Nov-2023
Total Views | 98
bonus-history-how-it-started-in-india-diwali

मुंबई :
  दिवाळी सणाच्या काळात कंपन्यांकडून आपल्या कर्मचाऱ्यांना बोनस दिला जातो. या बोनसरुपी म्हणून काही कंपन्यांकडून कार, बाईक अशा महागड्या वस्तू भेट म्हणून दिल्या जातात. दरम्यान, दिवाळी बोनस जवळपास सर्वच कर्मचाऱ्यांना सरकारी नोकरांपासून ते अगदी खाजगी कंपनी काम करणाऱ्यापर्यंत सर्वांनाच मिळत असतो. पण हा बोनस देण्याचा निर्णय केव्हापासून अतस्तित्वात आला याची एक रंजक गोष्ट आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत.

खरंतर, बोनस देण्याची पध्दत ही ब्रिटिशांनी येथे रुजवली आहे. ब्रिटिश राजवटीत येथील कामगारांना विशेषतः सणासुदीच्या काळात काही भेट म्हणून देण्यात यावे, याकरिता भेटवस्तू देण्याची प्रथा रुजू झाली. एकंदरीत, दिवाळीच्या उत्साहवर्धक बोनससाठी आपण ब्रिटिशांचे आभार मानले पाहिजेत. भारतात जेव्हा ब्रिटीश राजवट सुरू झाली तेव्हा साप्ताहिकाऐवजी मासिक वेतन प्रणाली लागू करण्यात आली. म्हणजे कर्मचाऱ्यांना ५२ ऐवजी ४८ आठवड्यांचा पगार मिळू लागला. मग विरोध सुरू झाला म्हणून ज्यामुळे ब्रिटिशांना तोडगा काढावा लागला.

तेव्हापासून भारतात दिवाळी बोनस देण्यास सुरुवात होऊन काही ठिकाणी १३ व्या महिन्याचा पगार बोनस म्हणून देण्यात येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कामगारांना जेव्हा पगाराचं गणित समजलं तेव्हा महाराष्ट्रातील कामगारवर्ग आक्रमक झाला. आणि महाराष्ट्रातील कामगारांनी १३ महिन्यांचा पगार मिळावा अशी मागणी करत आंदोलन केले होते. कामगारांनी केलेल्या आंदोलनाची दखल इंग्रज सरकारने घेत, त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न सुरु केले.

दरम्यान, दिवाळी सण हा भारतीय संस्कृतीतील मोठा सण असल्याने या सणाच्या आधी एक पगार द्यायचे असे इंग्रज सरकारचे ठरवले. तो पगार म्हणजे दिवाळी बोनस म्हणून गणला जातो. त्यानुसार, ३० जून १९४० साली अशाप्रकारे पगार देण्याची पद्धत सुरू झाली, आणि त्याचा कायदा लागू देखील करण्यात आला होता.
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121