समाजातील अत्यंजांपर्यंत पोहोचून त्यांच्या मूलभूत गरजांची पूर्तता
करणारी ‘सेवा सहयोग संस्था, मुंबई’ आणि परिसरातीलच नव्हे, तर
महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक, आरोग्य आणि महिला बाल सक्षमीकरणासाठी ‘सेवा
सहयोग संस्था’ काम करते. ‘सेवा सहयोग संस्था’ समाजाला ग्रासणार्या विविध
प्रश्नांना थेट सामोरी जाते. किशोरवयीन मुलींचे प्रश्न सध्या ऐरणीवर आहेत.
त्यांचे आरोग्य, सुरक्षा आणि एकंदर विकास यामध्ये ‘सेवा सहयोग’ महत्त्वाची
भूमिका निभावते. किशोरवयीन मुलींसाठी ‘सेवा सहयोग’चा किशोरी विकास प्रकल्प
सुरू आहे. त्या प्रकल्पासंदर्भात या लेखात मांडणी केली आहे.
गीता
मोघे - सेवा
सहयोग फाऊंडेशन’चा ‘किशोरी विकास’ प्रकल्प हा मुलांसोबत काम करताना
जाणवलेल्या गरजेतून निर्माण करण्यात आला. समाजातील बदललेली जीवनशैली,
कुटुंबव्यवस्था, समाजमाध्यामतून होणार्या माहितीचा ओघ, स्त्रीकडे
पाहण्याचा दृष्टिकोन या सर्वांमुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत.
पौगंडावस्थेतील मुलामुलींचे प्रश्न, बालक पालकांमधील कमी होत चाललेला संवाद
त्यातून निर्माण होणारे भय मुलांमध्ये अस्वस्थता निर्माण करीत असल्याचे
जाणवते. समाजात निर्माण झालेल्या गरजेतून ‘किशोरी विकास’ प्रकल्पाची
आवश्यकता भासते. वयवर्षे १२ ते १८ व्या वर्षांपर्यंत होणार्या शारीरिक,
मानसिक, भावनिक बदलांना सुयोग्य पद्धतीने सामोरे जाण्यासाठी किशोरींच्या
सोबत मैत्रिणीच्या नात्याने सोबत राहिले पाहिजे. मुलींना भावनिक मदत केली
पाहिजे. ‘किशोरी विकास’ प्रकल्पाच्या अभ्यासक्रमातून एक सक्षम, सजग,
तेजस्वी, तरुणी निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. या उपक्रमाची संकल्पना आहे
की मुलींच्या आयुष्यातील
१२ ते १८
वर्षांपर्यंतचा काळ हा संक्रमणाचा काळ असतो. या तिच्या आयुष्याचा प्रवास
एका वेगळ्या वळणाच्या वाटेवरून सुरू होतो. याच काळात मुलींमध्ये शारीरिक,
मानसिक बदल घडतच असतात. तसेच, याच काळात कुटुंबातील व्यक्ती आणि
आजूबाजूच्या लोकांचा या मुलींकडे पाहण्याचा किंवा विचार करण्याचा
दृष्टिकोन बदलतो. त्या बदलांना खंबीरपणे, सजगतेने सामोरे जाण्यासाठी
मुलींमध्ये आत्मविश्वास आणि सकारात्मक मानसिकता निर्माण करण्याची गरज आहे.
‘किशोरी विकास’ म्हणजे संस्कार, प्रबोधन याचबरोबर आधुनिक जगात वाटचाल
करताना किशोरींना जे जे आवश्यक असेल ते ते शिक्षण देते. या प्रकल्पाच्या
प्रमुख आहेत आरती नेमाणे.
या उपक्रमात स्फूर्तिगीते, वीरांगना,
खेळ, आरोग्य, आहार, व्यक्तिमत्व विकास, आणि लैंगिक शिक्षण आधारित सत्र,
मुक्तसंवाद, बौद्धिक चर्चा, मुलींना दैनंदिन आयुष्यात उपयोगी ठरतात. शहरी
तसेच ग्रामीण शाळा, वस्तीमध्ये किशोरी वर्ग सरू झाले आहेत. आठवड्यातून एक
तास महिन्यातून चार तास हा वर्ग होतो. या उपक्रमात सहभागी झालेल्या मुलींना
त्याचा फायदा होईल व जास्तीत जास्त किशोरी पुढे भविष्यात खंबीर,
कर्तव्यदक्ष, ‘आत्मनिर्भर’ आणि सजग होतील, यात शंका नाही.
‘किशोरी
विकास’ प्रकल्पाची पार्श्वभूमी आपण समजून घेऊ. ‘सेवा सहयोग’ संस्थेला हे
कार्य करण्याची गरज का भासली? सामाजिक पार्श्वभूमी काय होती? तर ‘किशोरी
विकास’ हा प्रकल्प पौगंडावस्थेतील म्हणजे
१२ ते १८
वयोगटाातील मुलींसाठी राबविला जातोे. सुमारे दहा वर्षांपूर्वी ‘सेवा सहयोग
संस्थे’ची स्थापना झाली. त्यावेळी शालेय विद्यार्थ्यांसाठी शाळेव्यतिरिक्त
अभ्यास आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या उद्देशाने ‘समुत्कर्ष प्रकल्पा’ची
सुरुवात झाली. हा प्रकल्प अनेक वस्त्यांमध्ये घेतला जाऊ लागला. त्यावेळी एक
गोष्ट लक्षात आली अभ्यासिकांमध्ये मुलींची उपस्थिती अतिशय कमी होती. ज्या
येत होत्या, त्याही अनियमित होत्या. एकूणच पालकांमध्ये मुलींच्या
शिक्षणाबाबत जागरुकता नव्हती. मग मुलींची उपस्थिती वाढावी, यासाठी प्रयत्न
करण्याचे ठरले. ज्या वस्त्यांमध्ये अनौपचारिक सर्वेक्षण केले, त्यातून अनेक
निष्कर्ष समोर आले.
- कुपोषण.
- लहान वयात बालविवाह.
- स्वत:बद्दल जाणी नसणे, आत्मजागृकतेचा अभाव असणे.
- लैंगिक भेदभाव जाणीवपूर्वक केला जातो.
- आई-वडील कामावर जात असल्यामुळे लहान वयात घरातील आणि लहान भावंडांच्या जबाबदार्या पार पाडणे.
- सभोवतालच्या वातावरणामुळे शारीरिक आणि लैंगिक असुरक्षितता जाणवणे.
- पालकांचा शैक्षणिक सामाजिक व आर्थिक स्तर निम्न असणे.
- शाळेपासून घरापर्यंतचे अंतर दूर असणे.