उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर महानिर्मिती सज्ज

गेल्या आर्थिक वर्षात विक्रमी वीजनिर्मिती

    02-Apr-2025
Total Views | 11
 
Mahanimti for summer
 
 
मुंबई: ( Mahanimti for summer ) उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर विजेची मागणी वाढते. यासाठी दरवर्षी महानिर्मितीतर्फे सूक्ष्म नियोजन करण्यात येते. सद्यस्थितीत राज्याची विजेची एकूण मागणी २९ हजार, ५०० मेगावॅटच्या घरात पोहोचली असून यासाठी महानिर्मिती सज्ज आहे, अशी माहिती कंपनीच्यावतीने देण्यात आली आहे.
 
महानिर्मितीने मार्च २०२५ साली मासिक औष्णिक महत्तम ५ हजार, ३२८ दशलक्ष युनिट्स इतके विक्रमी वीज उत्पादन केले. तर उरण वायू वीज केंद्राने मागील पाच वर्षांतील सर्वात जास्त म्हणजे २ हजार, ४७३ दशलक्ष युनिट्स वीज उत्पादन केले आहे. ‘महाराष्ट्र राज्य वीज नियामक आयोगा’ने सन 2024-25 मध्ये निर्धारित केलेल्या लक्ष्यास अनुसरून महानिर्मितीच्या अपारंपरिक ऊर्जा, पुणे मंडळाने ४५४.५० दशलक्ष युनिट्स वीज उत्पादनाचे लक्ष्य गाठले आहे. एकूण सन २०२४-२५  या आर्थिक वर्षात ६१ हजार, ४५६ दशलक्ष युनिट्स इतकी विक्रमी वीजनिर्मिती झाली आहे. सन २०२३-२४ चा ६१ हजार, ४३९ दशलक्ष युनिट्स वीजनिर्मितीचा विक्रम तोडला आहे.
 
मुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, संचालक मंडळ आणि अधिकारी, तंत्रज्ञ, कर्मचारी राज्यातील जनतेला मागणीनुसार अखंडित वीज उत्पादन देण्यासाठी कटिबद्ध आहेत. महानिर्मितीने सातत्याने उच्चतम कामगिरी नोंदवत अनेक उच्चांक गाठले आहेत. औष्णिक संचांची उपलब्धता, आवश्यक देखभाल-दुरुस्ती, भांडवली स्वरूपाची कामे याकडे विशेष भर दिल्याने यावर्षी महानिर्मितीच्या १५ संचांतून १०० दिवसांपेक्षा जास्त अखंडित वीज उत्पादन झालेे आहे.
 
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवले तर...; पाकिस्तानच्या धमकीला आसामच्या मुख्यमंत्र्यांचं सडेतोड प्रत्युत्तर!

"जर चीनने ब्रह्मपुत्रेचे पाणी अडवले तर..."; पाकिस्तानच्या धमकीला आसामच्या मुख्यमंत्र्यांचं सडेतोड प्रत्युत्तर!

(India-Pakistan Tensions) पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने राबवलेल्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाने पाकिस्तानी प्रशासन आणि लष्करी यंत्रणांना पूर्णपणे हादरवून टाकले होते. तरीही पाकिस्तानचे भारताविरुद्ध सतत चिथावणीखोर विधाने करणे आणि पोकळ धमक्या देणे अद्याप सुरुच आहे. आणि आता पुन्हा चीनचे नाव पुढे करुन एक नवी धमकी दिली आहे. "जर भारताने सिंधू जल करारावरील स्थगिती मागे घेतली नाही, तर चीन ब्रह्मपुत्रा नदीचा प्रवाह अडवू शकतो, ज्यामुळे भारताला नुकसान सहन करावे लागेल", अशी पोकळ धमकी पाकिस्तानने ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121