भांडूप परिमंडलात विद्युत सुरक्षेबाबत जनजागृती कार्यक्रम
03-Jun-2025
Total Views | 11
मुंबई: महावितरणच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने ‘शुन्य अपघात महावितरण, शुन्य अपघात महाराष्ट्र’ ही संकल्पना घेऊन दि. १ ते ६ जून २०२५ या कालावधीत संपूर्ण राज्यात विद्युत सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २ जून २०२५ रोजी रहिवासी परिसरात विद्युत सुरक्षा विषयी जनजागृती कार्यक्रम राबविण्याचे योजिले होते. त्याप्रमाणे, भांडूप परिमंडलातील ठाणे, वाशी व पेण मंडळातील प्रत्येक विभागीय कार्यालयांतर्गत विविध ठिकाणी विद्युत सुरक्षा बाबत जनजागृती कार्यक्रम करण्यात आले व सदर कार्यक्रमाला ग्राहकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.
दैनंदिन जीवनात विजेशिवाय काम करता येत नाही. वीज वापराचे प्रमाण शहरी भाग तसेच ग्रामीण भागातही वाढत चालले आहे. आजच्या काळात, वीज ही मूलभूत गरज बनली आहे. शहरापासून ते ग्रामीण भागापर्यंत विजेपासून होणाऱ्या अपघातांच्या घटना पाहता अधिक सतर्कतेने व सुरक्षितपणे विजेचा वापर करणे अत्यंत आवश्यक आहे म्हणून विद्युत सुरक्षा सप्ताहाच्या निमित्ताने महावितरणच्या सर्व परिमंडलात आज दि. २ जून २०२५ रोजी विद्युत सुरक्षा बाबत जनजागृती कार्यक्रम राबविण्यात आले . रहिवासी परिसरात जसे कि गृहनिर्माण संस्था, बाजारपेठेत तसेच सार्वजनिक ठिकाणी जनजागृती करून ग्राहकांना विद्युत यंत्रणा हाताळताना घ्यावायचे विद्युत उपकरणे वापरताना आवश्यक ती खबरदारी कशी घ्यावी हे समजावून सांगितले.
“सामान्य जनतेमध्ये विद्युत उपकरणांबद्दल जागरूकता कमी असल्याने विद्युत अपघातांच्या घटना घडत असतात. म्हणूनच, याबद्दल जागरूकता पसरवणे खूप महत्वाचे आहे. सदर कार्यक्रमाद्वारे जनजागृती करणे हा सामाजिक बांधीलकी जपण्याचा महावितरणचा प्रयत्न आहे” असे महावितरण भांडूप परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री. संजय पाटील यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले कि, “ ग्राहकांनी विद्युत उपकरणे वापरताना आवश्यक ती खबरदारी घ्यावी. ”