मित्रा पार्कमुळे ३ लाख लोकांना रोजगार मिळणार : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    20-Sep-2024
Total Views | 69
 
Devendra Fadanvis
 
वर्धा : मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे अमरावती जगाच्या नकाशावर येणार, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केले आहे. शुक्रवार, २० सप्टेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते पीएम मित्रा पार्कची पायाभरणी करण्यात आली. या कार्यक्रमात ते बोलत होते.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "आजचा दिवस अत्यंत महत्वाचा दिवस आहे. एकीकडे आज अमरावतीच्या मित्रा टेक्स्टाईल पार्कचे भूमिपूजन होत आहे तर दुसरीकडे आचार्य चाणक्य कौशल्य प्रशिक्षणाची यौजना सुरु होत आहे. त्याचबरोबर अहिल्याबाई होळकर स्टार्टअपची योजनाही सुरु होत आहे. पीएम विश्वकर्मा अंतर्गत राज्यातील दोन लाख लोकांना मदत मिळत आहे. आज या एका कार्यक्रमामध्ये साडे सहा लाख कुटुंबाचं चित्र बदलणार असून त्यांच्यापर्यंत रोजगार आणि अधिकारीता पोहोचणार आहे."
 
हे वाचलंत का? -  "आम्ही मोठे भाऊ आहोत असं वाटत असेल तर..."; संजय राऊतांचा काँग्रेसला घरचा आहेर
 
"ज्याला ज्याला आपल्या जीवनात परिवर्तन घडवायचं आहे त्या प्रत्येक व्यक्तीसाठी मोदीजींनी संधी तयार केली आहे. इतक्या वर्षात सूतार, लोहार, सोनार, कुंभार, मुर्तीकार, चर्मकार, मिस्त्री, न्हावी, टेलर, धोबी या सगळ्या घटकांचा विचार कुठल्याच सरकारने केला नव्हता. पण पंतप्रधान मोदी हे त्यांचा विचार करणारे देशातील एकमेव व्यक्ती आहेत. मित्रा टेक्स्टाईल पार्कमुळे अमरावतीला जगाच्या नकाशावर आणण्याचं काम होणार आहे. आम्ही पंतप्रधान मोदींना टेक्स्टाईल पार्क देण्याची विनंती केली होती. त्यानंतर त्यांनी देशातील सात पार्कपैकी एक पार्क अमरावतीमध्ये दिला. ज्यामुळे जवळपास ३ लाख लोकांना रोजगार मिळणार आहे," अशी माहिती त्यांनी दिली.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121