मोठी बातमी! 'या' विभागातील भरतीप्रक्रिया रद्द, लवकरच नवीन वेळापत्रक!

    15-Mar-2024
Total Views | 231
exam-paper-burst-case
 

 
मुंबई :   महाराष्ट्र शासनाच्या मृदा व जलसंधारण विभागातील रिक्त पदांकरिता भरतीप्रक्रिया राबविण्यात आली होती. सदर भरतीप्रक्रिया शासनाकडून रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी यासंदर्भात 'X'वर पोस्ट केली आहे. भरतीप्रक्रियेतील गैरप्रकार याबाबत पोलीस विभागाचा अहवाल पाहता हा निर्णय घेण्यात आल्याचे मंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे.



दरम्यान, राज्य शासनाने मृद व जलसंधारण विभागामधील दि. २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेतलेली परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. त्यामुळे अमरावती येथील परिक्षा केंद्रावरील गैरप्रकार व त्या अनुषंगाने दाखल गुन्ह्यामधील पोलीस विभागाचा अहवाल पाहता विद्यार्थ्यांचे हित जपणे तसेच शासनाची विश्वासार्हता जपण्यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.


हे वाचलंत का? -   पालिकेच्या कार्यालयात महिलांसाठी कौशल्य विकास विभाग!



सदर पदभरती परीक्षेबाबत लवकरच नवीन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात येईल, असेही मंत्री संजय राठोड यांनी आपल्या 'X'वरील पोस्ट म्हटले आहे. त्यामुळे सुधारित वेळापत्रक जाहीर होईपर्यंत उमेदवारांना वाट पाहावी लागणार आहे. दरम्यान, परीक्षा घेणाऱ्या टीसीएस या कंपनीतील या परीक्षा केंद्राशी संबंधित काही कर्मचारी या गैरप्रकारात सहभागी असल्याचे प्रथमदर्शनी आढळून आले. यामुळे एकूणच सदरहू परीक्षेची विश्वासार्हता व पारदर्शकता यावर काही अंशी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून या परीक्षेविषयी परीक्षार्थीच्या मनात संशय निर्माण होण्यास वाव मिळाला आहे.

सदर प्रकरणी अनेक उमेदवारांकडून दि. २० व २१ फेब्रुवारी, २०२४ रोजी घेण्यात आलेली परीक्षा रद्द करावी व सदर परीक्षेची प्रक्रिया पुन्हा नव्याने घ्यावी, अशी विनंती शासनाकडे विविध स्तरावर करण्यात आलेली आहे. यामुळे सदरहू परीक्षा रद्द करून फेर परीक्षा घेण्याची परीक्षार्थीची मागणी याबाबत सांगोपांग विचार होऊन, “जलसंधारण अधिकारी गट ब अराजपत्रित” या पदासाठी टी.सी.एस. (TCS) या कंपनीच्या माध्यमातून घेण्यात आलेली परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. फेरपरीक्षेबाबत व अनुषंगिक कार्यपद्धतीबाबत सविस्तर सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील, असे मृद व जलसंधारण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा
लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

लेखक जयेश मेस्त्री ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ने सन्मानित!

संत गाडगे महाराज विचार मंच महाराष्ट्र राज्य आणि ज्ञानज्योत फाऊंडेशन महाराष्ट्र यांच्या वतीने देण्यात येणारा ’संत गाडगे महाराज बाल साहित्य पुरस्कार २०२५’ या वर्षी लेखक, साहित्यिक जयेश मेस्त्री यांना प्राप्त झाला आहे. दरवर्षी प्रमाणे या वर्षी देखील साहित्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणार्‍या साहित्यिकांचा गौरव करण्यात आला. दिनांक ०७ जून २०२५ रोजी पुणे येथील सदाशिव पेठेतील वेदशास्त्रोत्तेजक सभागृह येथे हा सुंदर सोहळा पार पडला. या प्रसंगी प्रसिद्ध उद्योजक डॉ. रामदास कुटे हे उद्घाटक म्हणून उपस्थित होते. तसेच ..

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

साताऱ्याच्या मातीत बहरणार ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन!

: मराठी साहित्यातील प्रतिष्ठीत मानल्या जाणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनचा ९९ व्या सोहळा आगामी वर्षात साताऱ्यात पार पडणार आहे. ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजन करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे.अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121